प्रश्नसंच ८८ - [सामान्यज्ञान]

[प्र.१] सुर्य किरणांद्वारे येणाऱ्या अतिनील किरणांची तरंगलांबी किती असते?
१] १००-२०० nm
२] २८०-३१५ nm
३] ६४०-८२० nm
४] ८५०-९१० nm

उत्तर
२] २८०-३१५ nm
--------------------------------
[प्र.२] "परीसंस्थांशी संलग्न जनता" असे कोणास संबोधले जाते?
१] पर्यावरणवादी
२] पर्यावरण विशेषज्ञ
३] जंगलात रहाणारे आदिवासी
४] जुन्या पिढीतील शहरी लोक

उत्तर
३] जंगलात रहाणारे आदिवासी
--------------------------------
[प्र.३] कोणत्या राष्ट्रीय उद्यानास जवाहरलाल नेहरू राष्ट्रीय उद्यान असे नाव देण्यात आले?
१] पेंच
२] ताडोबा
३] मेळघाट
४] सह्याद्री

उत्तर
१] पेंच
--------------------------------
[प्र.४] खालीलपैकी कोणत्या प्रकारामध्ये "बिझार्ड" या नैसर्गिक आपत्तीचा समावेश करता येईल?
१] हवामानातील नैसर्गिक आपत्ती
२] पाण्यातील नैसर्गिक आपत्ती
३] जमिनीवरील नैसर्गिक आपत्ती
४] जैविक नैसर्गिक आपत्ती

उत्तर
१] हवामानातील नैसर्गिक आपत्ती
--------------------------------
[प्र.५] कोणता नेत्रदोष नेत्रगोल काहीसे लांबट होण्यामुळे उद्भवतो?
१] निकटदृष्टीता
२] दूरदृष्टीता
३] रंगांधळेपणा
४] वृद्धदृष्टीता

उत्तर
१] निकटदृष्टीता
--------------------------------
[प्र.६] इथेनॉल चे उत्पादन वाढवण्यासाठी भारताने अलीकडेच कोणत्या देशाबरोबर करार केला?
१] अमेरिका
२] इस्त्राईल
३] पेरू
४] फ़िलिपाइन्स

उत्तर
४] फ़िलिपाइन्स
--------------------------------
[प्र.७] महाराष्ट्र शासनाने 'ग्राम न्यायालय कायदा २००८' कधी लागू केला?
१] २ ऑक्टोबर २००८
२] १५ ऑगस्ट २००८
३] २ ऑक्टोबर २००९
४] १५ ऑगस्ट २००९

उत्तर
३] २ ऑक्टोबर २००९
--------------------------------
[प्र.८] आंध्र लेक कोणत्या जिल्ह्यात आहे?
१] ठाणे
२] बुलढाणा
३] पुणे
४] धुळे

उत्तर
३] पुणे
--------------------------------
[प्र.९] "Industrial association of western India" ची स्थापना कोणी केली?
१] म.गो.रानडे
२] पंजाबराव देशमुख
३] नारायण लोखंडे
४] मुकुंदराव पाटील

उत्तर
१] म.गो.रानडे
---------------------------------
[प्र.१०] सेंद्रिय शेतीचे फायदे कोणते?
अ] कमी खर्चाची शेती
ब] कमी वेळ लागतो
क] कमी मजूर लागतात

१] फक्त अ
२] अ आणि ब
३] अ आणि क
४] वरील सर्व

उत्तर
१] फक्त अ
--------------------------------