चालू घडामोडी - १५ व १६ नोव्हेंबर २०१४

·        जमिनीवरून शक्तीशाली मारा करणाऱ्या पृथ्वी- या आण्विक क्षेपणास्त्राची शुक्रवारी १४ नोव्हेंबर रोजी चंडीपूर येथे लष्कराकडून यशस्वी चाचणी घेण्यात आली.
·        ३५० किमीचा पल्ला असलेले पृथ्वी- हे स्वदेशी बनावटीचे क्षेपणास्त्र आहे.
·        पृथ्वी- या क्षेपणास्त्राची सुमारे ५०० ते १००० किलो स्फोटके वाहून नेण्याची क्षमता आहे.
·        पहिली नवीनीकरणीय ऊर्जा जागतिक गुंतवणूक बैठक १५  ते १७ फेब्रुवारीला नवी दिल्लीत पार पडली.
·        नवीनीकरणीय ऊर्जा क्षेत्रात गुंतवणूकीला प्रोत्साहन देण्यासाठी सरकारी पातळीवर होणारी ही पहिलीच बैठक होती.
·        भारत सरकारच्या सूक्ष्म,लघु मध्यम उद्योगमंत्रालयाने उद्योगाच्या वाढीसाठी केलेल्या चांगल्या कार्याबद्दल यामंत्रालयाला आयएसओ ९००१:२००८ हे प्रमाणपत्र मिळाले आहे.
·        मंगळमोहिमेचे यशस्वी संचालन करणारे डॉ. . . पिल्लाई यांना राष्ट्रपतींच्याहस्ते वर्ष २०१४ चा लाल बहादूर शास्त्री यांचे नांवे दिला जाणारा सर्वोत्कृष्ट सार्वजनिक प्रशासनाचा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
·        ज्येष्ठ क्रीडा पत्रकार चंद्रशेखर संत यांचे निधन झाले.
·        सुधारित एलपीजी थेट लाभ हस्तांतरण योजना पहिल्या टप्प्यात शनिवार १५ नोव्हेंबर रोजी  ५४  जिल्ह्यात सुरू करण्यात आली त देशाच्या उर्वरित भागात जानेवारी २०१५ रोजी लागू होईल.
·        बालदिना पासून १४ नोव्हेंबर ते ३१ डिसेंबर या कालावधीत राज्यात "स्वच्छ बालक अभियान" राबविले जाणार आहे.
·        यू एन विमेन्सचा गुडविल ब्रॅंड ऍम्बेसेडर म्हणून फरहान अख्तरची निवड करण्यात आली.
·        राज्यसभा सदस्य तथा माजी क्रिकेटपटू सचिन तेंडूलकरने आंध्र प्रदेशमधील नेलोरे जिल्ह्यातील पी.आर.कांडरिगा हे गाव सांसद आदर्श ग्राम योजने अंतर्गत दत्तक घेतले आहे.
·        सोनिया गांधी यांनी रायबरेलीमधील उर्वा हे गाव दत्तक घेतले, तर राहुल गांधी यांनी अमेठीमधील जगदीशपूर हे गाव दत्तक घेतले.
·        हिवाळी अधिवेशनापासून राज्यसभेत प्रश्नोत्तराचा तास सकाळी ११ ऐवजी दुपारी बारा ते एक या काळात होणार आहे. राज्यसभेच्या कामकाजाची वेळही एका तासाने वाढवून सायंकाळी पाचऐवजी सहा करण्यात आली आहे.
·        गोंधळ कमी होण्यासाठी प्रश्नोत्तराच्या तासाची वेळ बदलण्याचा राज्यसभाध्यक्षांचा हा तिसरा प्रयत्न असून, यापूर्वी पंधराव्या लोकसभा काळातील त्यांचे दोन प्रयत्न सपशेल अपयशी ठरले आहेत.
·        केंद्रीय विद्यालयातील हावी ते आठवीतील अभ्यासक्रमात तृतीय भाषा म्हणून जर्मनऐवजी संस्कृतभाषा अंर्तभूत केली.
·        गुजरात पाठोपाठ आता कर्नाटकातही निवडणुकीत मतदान सक्तीचे केले जाणार आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा