प्रश्नसंच १३२ - चालू घडामोडी

MT Quiz
[प्र.१] भारतातील पहिले “महिला संकट निवारण केंद्र” कोठे सुरु करण्यात आले?
१] मुंबई
२] दिल्ली
३] भोपाळ
४] अहमदाबाद


३] भोपाळ
[गौरवी हे भारतातील पहिले “महिला संकट निवारण केंद्र” भोपाळ (मध्यप्रदेश) येथे सुरु करण्यात आले. त्याचे उद्घाटन अमिर खान यांच्या हस्ते झाले.]
----------------
[प्र.२] अमेरिकेतील भारताचे राजदूत म्हणून नुकतीच कोणाची नियुक्ती करण्यात आली?
१] एस. जयशंकर
२] अरुण सिंह
३] रिचर्ड वर्मा
४] नॅन्सी पॉवेल


२] अरुण सिंह
[अधिक माहितीसाठी MPSC Toppers ब्लॉगवरील १ व २ मार्च २०१५ च्या चालू घडामोडी वाचा.]
----------------
[प्र.३] महिलांच्या सुरक्षित प्रवासाठी महिला चालक असणारी स्वतंत्र रेडिओ कॅब सेवा कोणत्या शहरात उपलब्ध होणार आहे?
१] मुंबई
२] दिल्ली
३] बंगळूर
४] पुणे


४] पुणे
[अधिक माहितीसाठी MPSC Toppers ब्लॉगवरील २७ फेब्रुवारी २०१५ च्या चालू घडामोडी वाचा.]
----------------
[प्र.४] रेल्वेतर्फे सुरु करण्यात आलेल्या ‘गो इंडीया’ स्मार्ट कार्ड योजनेबद्दल योग्य विधाने ओळखा.
अ] सुरुवातीला दिल्ली-मुंबई आणि दिल्ली-कोलकाता (हावडा) या दोन मार्गांवर ही योजना चालू करण्यात आली आहे.
ब] ‘गो कार्ड’ची कमाल मर्यादा वीस हजार रुपये एवढी असेल. म्हणजे एका वेळी वीस हजार रुपयांपर्यंतची तिकिटे या कार्डाद्वारे काढणे शक्‍य होईल.

१] फक्त अ
२] फक्त ब
३] वरील दोन्ही
४] यापैकी नाही


१] फक्त अ
[‘गो कार्ड’ची कमाल मर्यादा दहा हजार रुपये एवढी असेल. म्हणजे एका वेळी दहा हजार रुपयांपर्यंतची तिकिटे या कार्डाद्वारे काढणे शक्‍य होईल. अधिक माहितीसाठी MPSC Toppers ब्लॉगवरील ३ मार्च २०१५ च्या चालू घडामोडी वाचा.]
----------------
[प्र.५] नुकताच कोणत्या पाकिस्तानी गायकाचा भारतीय नागरिकत्वासाठी दुसऱ्यांदा केलेला अर्ज फेटाळण्यात आला?
१] आतिफ असलम
२] अदनान सामी
३] अली झफर
४] राहत फतेह अली खान


२] अदनान सामी
----------------
[प्र.६] योग्य विधाने ओळखा.
अ] महाराष्ट्रातील पहिले पोस्ट एटीएम पुणे येथे सुरु झाले.
ब] दिल्लीनंतरचे ते देशातील दुसरे पोस्ट एटीएम आहे.

१] फक्त अ
२] फक्त ब
३] वरील दोन्ही
४] वरीलपैकी एकही नाही.


४] वरीलपैकी एकही नाही.
[महाराष्ट्रातील पहिले पोस्ट एटीएम चेंबूर येथे सुरु झाले. दिल्ली व चेन्नईनंतरचे ते देशातील तिसरे पोस्ट एटीएम आहे.]
----------------
[प्र.७] योग्य विधाने ओळखा.
अ] ललिता कुमारमंगलम कॉंग्रेस कार्यकारिणीच्या सदस्य आहेत.
ब] नुकतीच त्यांची राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षपदी नियुक्ती झाली.
क] त्या मूळच्या कर्नाटकच्या आहेत.
ड] त्या संजीवनी नावाचा एनजिओ चालवतात.

१] फक्त अ, ब आणि ड
२] फक्त ब, क आणि ड
३] फक्त ब
४] फक्त अ आणि ड


३] फक्त ब
[ललिता कुमारमंगलम भाजप कार्यकारिणीच्या सदस्य आहेत. त्या मूळच्या तमिळनाडूच्या आहेत. त्या प्रकृती नावाचा एनजिओ चालवतात.]
----------------
[प्र.८] खालीलपैकी अयोग्य विधाने ओळखा.
अ] शक्तीदेवी या पंजाब पोलीस दलातील एक महिला पोलीस निरीक्षक आहेत.
ब] त्यांना संयुक्त राष्ट्राचा आंतरराष्ट्रीय महिला शांतीसैनिक पुरस्कार जाहीर झाला.
क] अफगाणिस्तानमधील त्यांच्या कामाबद्दल त्यांना हा पुरस्कार मिळाला.

१] फक्त अ
२] फक्त ब
३] अ आणि क
४] वरीलपैकी एकही नाही.


१] फक्त अ
[शक्तीदेवी या जम्मू काश्मीर पोलीस दलातील एक महिला पोलीस निरीक्षक आहेत. गेली १४ वर्षापासून त्या जम्मू काश्मीर पोलीस दलात काम करत आहेत. सोव्हियत रशियाने आक्रमण केल्यापासून अफगाणिस्तान अराजकतेच्या खाईत होरपळत असताना येथील प्रशासनाला सहाय्य करण्यासाठी संयुक्त राष्ट्राने आखलेल्या मोहिमेमध्ये शक्तीदेवी यांचा भारतातर्फे समावेश करण्यात आला होता.]
----------------
[प्र.९] जम्मू काश्मीर राज्याला कलम ३७० नुसार विशेष राज्याचा दर्जा देताना काही तरतुदी करण्यात आल्या आहेत. त्यासंबंधी खालीलपैकी योग्य विधान ओळखा.
अ] राष्ट्रपतींना या राज्याची घटना बरखास्त करण्याचा अधिकार नाही.
ब] दुसऱ्या कोणत्याही राज्यातील लोक या राज्यात जमिनी विकत घेऊ शकत नाहीत.
क] शिक्षणाचा अधिकार या राज्यास लागू नाही.
ड] राज्याच्या विधानसभेचा कार्यकाळ सहा वर्षे असेल.

१] फक्त अ, ब आणि क
२] फक्त ब, क आणि ड
३] फक्त ब आणि क
४] वरील सर्व


४] वरील सर्व
----------------
[प्र.१०] ऑक्टोबर २०१४ मध्ये पार पडलेल्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीबाबत योग्य विधाने ओळखा.
अ] ही महाराष्ट्राची तेरावी विधानसभा निवडणूक होती.
ब] विधानसभेवर एकूण २० महिला आमदार निवडून आल्या.
क] याआधीच्या विधानसभेत केवळ ११ महिला आमदार होत्या.
ड] विधानसभेतील सर्वाधिक १२ महिला आमदार भाजप पक्षाच्या आहेत.

१] फक्त अ, ब आणि क
२] फक्त अ, ब आणि ड
३] फक्त अ आणि क
४] वरील सर्व


४] वरील सर्व
----------------

1 टिप्पणी: