चालू घडामोडी - ४ एप्रिल २०१५


  • केंद्र सरकारने १ एप्रिल २०१५ रोजी फास्टर एडॉप्शन अँड मॅन्यूफेक्चरिंग ऑफ हाइब्रिड अँड इलेक्ट्रिक वेहिकल्स (फेम) इंडिया योजनेची सुरुवात केली. 
  • ही योजना देशातील पर्यावरण अनुकूल वाहनांच्या विक्रीला प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने सुरु करण्यात आली आहे. ही योजना ‘राष्ट्रीय इलेक्ट्रिक मोबिलिटी मिशन प्लॅन’चा भाग आहे.
  • या योजनेद्वारे २०२० पर्यंत वीज आणि हायब्रिडचलित वाहनांच्या निर्मिती आणि विक्रीकरिता ७९५ कोटी रुपयाची तरतूद करण्यात आली आहे.
  • फेम इंडिया योजनेची वैशिष्ट्ये
    • या योजनेचा कार्यकाळ ६ वर्षाचा असून २०२० पर्यंत ही योजना २ टप्प्यांमध्ये राबविण्यात येणार आहे.
    • पहिला टप्पा २०१५-१६ आणि २०१६-१७ या कालावधीत राबविण्यात येईल. पहिल्या टप्प्यातील अनुभवाचा अभ्यास करून ३१ मार्च २०१७ नंतर पुढील टप्पा राबविण्यात येईल.
    • या योजनेचे चार महत्वाचे उद्देश : तंत्रज्ञान विकास, प्रकल्प मार्गदर्शन, मागणीची निर्मिती, पायाभूत सुविधांचा विकास
    • अवजड उद्योग मंत्रालयांतर्गत ही योजना राबविण्यात येत आहे.
  • नॅशनल इलेक्ट्रिक मोबिलिटी मिशन प्लॅन:
    • केंद्र सरकारने २०१३ मध्ये राष्ट्रीय इलेक्ट्रिक मोबिलिटी मिशन प्लॅन-२०२० (एनईएमएमपी) चे उद्घाटन केले. 
    • देशात हाइब्रिड आणि इलेक्ट्रिक वाहनांना प्रोत्साहन देऊन इंधन बचत करण्यासाठी एनईएमएमपीची सुरुवात केली गेली. 
    • या योजनेंतर्गत २०२० पर्यंत ६-७ लाख हाइब्रिड आणि इलेक्ट्रिक वाहनांच्या विक्रीचे लक्ष्य आहे.

  • भारताचा परकीय चलनसाठा २७ मार्च रोजी संपलेल्या आठवड्यात १.३९ अब्ज डॉलरने वाढून ३४१.३७८ अब्ज डॉलर या विक्रमी उच्चांकी पातळीवर पोहोचला आहे.
  • परकीय चलन मालमत्तेत (फॉरिन करेन्सी असेट्स-एफसीए) वाढ झाल्याने परकीय चलनसाठा वाढला आहे. आता परत परकीय चलनसाठा आतापर्यंतच्या उच्चांकी पातळीवर पोहोचला आहे.
  • देशातील सोन्याचा साठा १९.८४ अब्ज डॉलर इतका कायम आहे. 
  • आरबीआयने दिलेल्या आकडेवारीनुसार या आठवड्यात भारताचा आंतरराष्ट्रीय नाणेनिधीतील राखीवसाठा १.२९ अब्ज डॉलरवर पोहोचला आहे.

  • आंध्रप्रदेश राज्याच्या नवीन राजधानीचे नाव अमरावती असेल. विजयवाडा-गुंटूर परिसरात या शहराचा विकास केला जाणार आहे.
  • आंध्रप्रदेशचे मुख्यमंत्री एन. चंद्राबाबू नायडू यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. 
  • याचबरोबर या गावाच्या विकासासाठीच्या मास्टर प्लॅनच्या पहिल्या टप्प्याला मंजुरी देण्यात आली. हा प्लॅन सिंगापूर सरकारने तयार केला आहे.
  • अमरावतीची वैशिष्ट्ये :
    • कृष्णा नदीकाठी वसलेले हे गाव २००० वर्षापूर्वी ४०० वर्षाकरिता सातवाहन साम्राज्याच्या राजधानीचे ठिकाण होते. त्यामुळे या गावाला ऐतिहासिक व अध्यात्मिक महत्व प्राप्त झाले आहे. 
    • गावातील अमरेश्वराच्या मंदिरामुळे याला अमरावती असे नाव पडले. तसेच या गावाला ‘दक्षिण काशी’ म्हणून ओळख प्राप्त आहे.
    • या गावाला गौतम बुद्ध, सम्राट अशोक तसेच चीनी प्रवासी ह्युएन त्संग यांनी भेटी दिल्या आहेत.

  • केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या तंबाखूविरोधी मोहिमेची ‘पोस्टरगर्ल’ ठरलेल्या सुनीता तोमर या महिलेचे तोंडाच्या कर्करोगाची लढा देत असताना मध्य प्रदेशात निधन झाले. 
  • तंबाखूविरोधी मोहिमेच्या जाहिरातीत त्यांनी आपले वैयक्तिक अनुभव सांगून कॅन्सरबाबत जागरुकता निर्माण करण्याच्या कामी आपले योगदान दिले होते.

  • शहरी भागात राहणाऱ्या गरिबांना माफक दरामध्ये जेवणाची सुविधा उपलब्ध व्हावी म्हणून ओडिशा राज्य सरकारने १ एप्रिलपासून ‘आहार’ योजना सुरू केली आहे.
  • १ एप्रिल या ओडिशा राज्याच्या स्थापनेच्या दिवशी (उत्कल दिवस) ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनाईक यांनी आहार योजनेचे उद्घाटन केले.
  • प्रायोगिक तत्वावर या योजनेअन्वये कटक, भुवनेश्वर, संभळपूर, बेहरामपूर आणि राऊरकेला पाच जिल्ह्यांमधील नागरिकांना पाच रुपयांमध्ये डाळ-भात उपलब्ध करून दिला जाईल.
  • अशा प्रकारची योजना सुरू करणारे ओडिशा हे तामिळनाडू (अम्मा कॅन्टिन), कर्नाटक (अण्णा कॅन्टिन) व आंध्रप्रदेश (अण्णा कॅन्टिन) नंतर देशातील चौथे राज्य ठरले आहे. 

  • ‘सेंट्रल कौन्सिल ऑफ होमिओपॅथी कायदा, १९७३’मध्ये सुधारणा करण्याविषयी निर्णय केंद्रीय कॅबिनेटच्या बैठकीत घेण्यात आला.
  • त्यामुळे सोयीसुविधा तसेच गुणवत्तापूर्ण शिक्षणाचा अभाव असलेल्या देशातील होमिओपॅथी कॉलेज बंड करण्याचा अधिकार आता केंद्र सरकारला प्राप्त होणार आहेत.
  • दोन वर्षांपूर्वी कौन्सिलने केलेल्या पाहणीत १८८ (महाराष्ट्रात ४५) पैकी १०२ कॉलेजमध्ये सोयीसुविधा नसल्याचे आढळून आले होते.

  • ‘प्यू रिचर्स सेंटर’ने जगातील धार्मिक लोकसंख्येचा अभ्यास केला. या अभ्यासाचा अहवाल प्रसिद्ध करण्यात आला. त्यानुसार इ.स. २०५० पर्यंत जगातील हिंदूंच्या लोकसंख्येत ३४ टक्क्यांपर्यंत वाढ होण्याची शक्यता आहे.
  • जगाच्या एकूण लोकसंख्येच्या तुलनेत इ.स. २०५० पर्यंत हिंदूंची लोकसंख्या तिसऱ्या क्रमांकावर असेल, तर भारत हा सर्वाधिक मुस्लिम लोकसंख्या असलेला जगातील पहिलाच देश ठरेल, अशी माहिती या अहवालातून समोर आली आहे.
  • भारतातील मुस्लिमांच्या लोकसंख्या वाढीचा दर अन्य धर्मियांपेक्षा अधिक असल्याचे या अहवालातून दिसून आले आहे.

  • निवडणूक आयोगाने ‘टोटलायझर’ या मतदान यंत्राचा प्रस्ताव कायदा मंत्रालयाकडे ठेवला होता. 
  • या यंत्रामुळे मतदानावेळी आणि नंतरही मतदानाबाबतच्या गुप्ततेची पुढील पातळी वाढून त्याचा कल ओळखणेही टाळता यावे, अशी आयोगाची अपेक्षा आहे. 
  • कायदा मंत्रालय हे निवडणूक यंत्रणेच्या प्रशासकीय कामास जबाबदार असते. कायदा मंत्रालयाने जरी या प्रस्तावाला पाठिंबा दर्शविला असला, तरी केंद्र सरकारने याबाबत अद्याप विचार केलेला नाही.

  • मल्ली मस्तान बाबू हा भारतीय गिर्यारोहक अर्जेंटिना व चिलीदरम्यान असलेल्या पर्वतरांगांतील एका पर्वतावर चढताना २४ मार्चला बेपत्ता झाला होता. त्याचा मृतदेह त्याच्या सहकाऱ्यांना सापडला आहे.
  • मुळचा आंध्र प्रदेशातील नेळ्ळोर येथील रहिवासी असलेला मल्ली बाबू याने आयआयटी खरगपूरमधून पदवी मिळविली होती. 
  • त्याला गिर्यारोहणाची प्रचंड आवड होती. त्याने २००६ मध्ये १७२ दिवसांत सात शिखरे सर केली होती. त्यामुळे त्याची ओळख ‘७ समिटर’ अशी झाली होती.

  • स्त्रीभ्रूण हत्येप्रकरणी वॉशिंग्टन येथील न्यायालयाने एका भारतीय वंशाच्या पूर्वी पटेल या महिलेला तुरुंगवासाची शिक्षा ठोठावली आहे. 
  • पटेल यांच्यावरील आरोप सिद्ध झाल्याने त्यांना २० वर्षांची शिक्षा ठोठावण्यात आली. त्या मूळ भारतीय वंशाच्या असून इंडियाना येथे राहत होत्या.

  • साईना नेहवालला मलेशियन ओपन बॅडमिंटन स्पर्धेच्या उपांत्य फेरीत पराभवाला सामोरे जावे लागले. 
  • साईनाचा उपांत्य फेरीत अग्रमानांकित चीनच्या ली झुएरुई हिने १३-२१, २१-१७, २२-२० असा पराभव केला.

  • बंदी असलेले गुंगी आणणारे औषध घेतल्याप्रकरणी एका वर्षात तब्बल २१ भारतीय वेटलिफ्टरर्सची घेण्यात आलेली चाचणी सकारात्मक आढळून आली आहे.
  • त्यांना तात्पुरते निलंबित करण्यात आले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा