चालू घडामोडी : २५ जानेवारी


मोहननाथ गोस्वामी यांना अशोकचक्र

    Lance-Naik-Mohan-Nath-Goswami
  • काश्मीरमध्ये दहशतवाद्यांबरोबर लढताना हुतात्मा झालेले लष्कराचे कमांडो लान्स नाईक मोहननाथ गोस्वामी यांना शांततेच्या काळात सर्वोच्च मानला जाणारा अशोकचक्र सन्मान जाहीर करण्यात आला.
  • तसेच मोहनसिंह व शिपाई जगदीश चांद (मरणोत्तर) यांना कीर्ती चक्र सन्मान तर मेजर अनुरागकुमार, नाईक सतीशकुमार (मरणोत्तर), शिपाई धर्माराम यांना (मरणोत्तर) शौर्य पुरस्कार जाहीर झाला.
  • प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर संरक्षण दलांतील अधिकाऱ्यांना ३६५ शौर्य आणि अन्य पदके जाहीर करण्यात आली. त्यात १ अशोकचक्र, ४ कीर्तिचक्रे, ११ शौर्यचक्रे, ४८ सेना पदके, ४ नौसेना पदके, २ वायुसेना पदके, २९ परमविशिष्ट सेवा पदके, ५ उत्तम युद्धसेवा पदके आणि ४९ अतिविशिष्ट सेवापदकांसह अन्य पदकांचा समावेश आहे.
  • उत्तर काश्मीरमधील कुपवाडा जिल्ह्यातील हापुरदा येथे २ सप्टेंबर २०१५ रोजी दहशतवाद्यांसोबत झालेल्या चकमकीत लान्स नाईक गोस्वामी यांच्याबरोबरचे दोन कमांडो जखमी झाले होते.
  • गोळ्यांचा वर्षाव होत असतानाही त्यांनी आपल्या दोन सहकाऱ्यांना वाचविण्यासाठी धाव घेतली. दहशतवाद्यांच्या गोळीबारात गंभीर जखमी होऊनही लान्स नाईक गोस्वामी यांनी दोन दहशतवाद्यांचा खातमा केला. मात्र, गंभीर जखमांमुळे लान्स नाईक गोस्वामी यांनाही प्राण गमवावे लागले.
  • असामान्य शौर्याची लष्कराची परंपरा त्यांनी बलिदानातून सिद्ध केल्याचे संरक्षण मंत्रालयाने नमूद केले आहे. दहा दिवसांत दोन मोहिमांत सहभागी झालेल्या लान्स नाईक गोस्वामी यांनी दहा दहशतवाद्यांना ठार करून आपल्या असामान्य शौर्याचा प्रत्यय दिल्याचेही मंत्रालयाने म्हटले आहे.

जैतापूरमध्ये दोनऐवजी सहा अणुभट्ट्या

  • जैतापूर येथील भारत-फ्रान्स संयुक्त अणुवीजनिर्मिती प्रकल्पात आता फ्रान्सकडून दोनऐवजी सहा अणुभट्ट्या विकत घेण्यात येणार असून, त्यासंदर्भातील सुधारित समझोता करार करण्यात आला आहे. यापूर्वी भारत दोन अणुभट्ट्या विकत घेणार होता.
  • उभय देशांदरम्यान या प्रकल्पाबाबत चर्चा होऊन २०१६ म्हणजेच या वर्षअखेरीपर्यंत तो पूर्ण करून २०१७मध्ये या प्रकल्पाच्या अंमलबजावणीस सुरवात करण्याचेही ठरविण्यात आले आहे. 
  • उभय देशांमध्ये चंडीगडमध्ये १६ तर नवी दिल्ली येथे १४ अशा मिळून तीस करारांवर सह्या करण्यात आल्या आहेत.
  • जैतापूरच्या संदर्भात फ्रान्सची ‘इडीएफ’ ही विद्युतनिर्मिती कंपनी आणि भारताच्या अणुवीज महामंडळादरम्यान करार करण्यात येऊन जैतापूर येथे सहा ‘युरोपियन प्रेशराइज्ड रिऍक्टर्स’ (इपीआर) उभारण्याचे निश्चित करण्यात आले.
 भारत-फ्रांस चर्चेतील महत्त्वाच्या बाबी 
  • १९९८मध्ये प्रस्थापित करण्यात आलेली सामरिक भागीदारी वाढवणे
  • दहशतवादविरोधी सहकार्य आणि अंतर्गत सुरक्षेविषयी चर्चा
  • ३६ रफाल लढाऊ विमानांच्या खरेदीचा इंटरगव्हर्नमेंटल अॅग्रीमेंट (आयजीए)
  • जैतापूर प्रकल्प, तसेच आणखी अणुप्रकल्पांवर चर्चा
  • हवामान बदलांसंदर्भात संशोधन करणाऱ्या उपग्रहाच्या प्रक्षेपणात सहकार्य
  • जागतिक सौर युती आणि अपारंपरिक ऊर्जेसंदर्भातील करार
  • स्मार्ट सिटी, रेल्वे ट्रॅक यांसारख्या विषयांवरही चर्चा
  • करचुकवेगिरी रोखण्यासाठी माहितीचे आदानप्रदान मजबूत

सुधारित अनूसुचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा

  • अनूसुचित जाती (एससी) आणि जमातींवरील (एसटी) अत्याचारांच्या विरोधात किंवा अशा वर्गांतील व्यक्तींच्या आत्मसन्मानाला ठेच पोचेल असे वर्तन करणाऱ्यांच्या विरोधात कठोर कारवाई करण्याची तरतूद असलेल्या सुधारित कायद्याची २६ जानेवारीपासून अंमलबजावणी करण्यात येणार आहे.
  • अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती (अत्याचाराचा प्रतिबंध) दुरुस्ती कायदा २०१५ हा अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती (अत्याचाराचा प्रतिबंध) कायदा १९८९ चे स्थान घेईल.
  • अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती (अत्याचार प्रतिबंधक) कायद्यात (ऍट्रॉसिटीज ॲक्ट) दुरुस्ती करण्यात आली असून, यामुळे ‘एससी’, ‘एसटीं’वरील सामाजिक आणि आर्थिक बहिष्काराच्या विरोधातही आता कठोर कारवाई करणे शक्य होणार आहे.
  • अनुसूचित जाती आणि जमातीमधील व्यक्तींचे मुंडन करणे किंवा व्यक्तीच्या प्रतिष्ठेला हानी पोचविल असे वर्तन आता सुधारित कायद्यानुसार गुन्हा ठरणार आहे.
  • त्याचबरोबर या वर्गांतील महिलांचे कपडे फाडणे, घर किंवा गाव सोडण्यास भाग पाडणे, अश्लील हावभाव करणे, मत देण्यास किंवा न देण्यासाठी दबाव टाकणे अशा अनेक गोष्टी सुधारित कायद्यानुसार गुन्हा ठरणार आहेत.

भारताचे व्हिएतनाममध्ये उपग्रह केंद्र

  • चीन आणि दक्षिण चिनी समुद्रावर लक्ष ठेवण्यासाठी भारत आता दक्षिण व्हिएतनाममध्ये उपग्रह केंद्र उभारणार आहे. या सॅटेलाइट ट्रॅकिंग आणि इमॅजिंग सेंटरद्वारे भारताला छायाचित्रे मिळण्यास मदत होणार आहे.
  • भारत आणि व्हिएतनामचे गेल्या अनेक वर्षांपासून चीनसोबत सीमारेषेवरून वाद सुरू आहेत. दक्षिण चिनी समुद्रात चीनच्या कुरापती वाढत असल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे.
  • या सॅटेलाइट स्टेशनच्या मदतीने व्हिएतनामला चीन आणि दक्षिण चीन महासागर परिसरावर नजर ठेवणे शक्य होणार आहे. तर भारताला स्वतःचा विस्तार व क्षमता वाढवता येणार आहे.
  • हो ची मिन्ह या शहरात हे केंद्र उभारण्यासाठी ‘इस्रो’ निधी देणार असून, या प्रकल्पाची एकूण किंमत २.३ कोटी डॉलरपर्यंत जाण्याची शक्यता आहे.
  • सध्या भारताची उपग्रह केंद्रे अंदमान आणि निकोबार बेटांवर, ब्रुनेई, बिआक आणि मॉरिशसमध्ये आहेत. व्हिएतनाममधील केंद्रामुळे भारताच्या अंतराळ मोहिमांना फायदा होणार आहे.
 इतर करार 
  • भारताकडून हनोईला पेट्रोलिंग बोटी खरेदी आणि सुरक्षेसाठी दहा कोटी डॉलर्सचे कर्ज.
  • हनोईकडून भारताला व्हिएतनाम नजीकच्या समुद्रात तेल खाणी शोधण्यासाठी परवानगी. 
  • भारतीय उपग्रहाने पाठवलेली छायाचित्रे व्हिएतनामला पाहता येणार, तसेच याबाबतचे प्रशिक्षणही दिले जाणार.

अरुणाचल प्रदेशात अखेर राष्ट्रपती राजवट

  • अरुणाचल प्रदेशातील राजकीय अस्थिरतेच्या पार्श्वभूमीवर अखेर तेथे राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली आहे. अरुणाचलमधील राजकीय अशांतता पाहता तेथे राष्ट्रपती राजवट लागू करावी या केंद्र सरकारच्या शिफारशीवर राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी शिक्कामोर्तब केले.
  • अरुणाचल प्रदेश विधानसभेतील काँग्रेसच्या २१ बंडखोर आमदारांनी भाजपच्या ११ आणि दोन अपक्ष आमदारांशी हातमिळवणी केल्यामुळे १६ डिसेंबर २०१५ला राज्यात राजकीय वाद निर्माण झाला होता.
  • त्यावेळी अविश्वास ठरावाच्या लढाईतही मुख्यमंत्री नबाम तुकी यांचा पराभव झाला होता. त्यानंतर राज्यात राजकीय अस्थिरता निर्माण झाली होती. विधानसभा भंग न करता जुळवाजुळव करून सरकार टिकवण्यासाठी काँग्रेसचे शर्थीचे प्रयत्न सुरू होते.
  • या निर्णयाविरोधात काँग्रेसने सर्वोच्च न्यायालयात दाद मागणार असल्याचे जाहीर केले आहे.

'द स्पोर्टस हिरोज'

  • कसोटीपटू आणि मुंबईचा माजी डावखुरा फिरकी गोलंदाज नीलेश कुलकर्णीच्या संकल्पनेतून साकारलेल्या 'द स्पोर्टस हिरोज' या भारतातल्या प्रख्यात खेळाडूंनी गायलेल्या राष्ट्रगीताच्या व्हिडीओ अल्बमचे उदघाटन सचिन तेंडूलकरच्या हस्ते करण्यात आले. 
  • नीलेश कुलकर्णी, त्याची पत्नी रसिका यांनी खेळाडूंचा सहभाग असलेल्या राष्ट्रगीताची ही संकल्पना प्रत्यक्षात आली. 
  • यामध्ये सचिन तेंडूलकरसह, माजी क्रिकेटपटू लिटल मास्टर सुनील गावसकर, माजी हॉकीपटू धनराज पिल्ले, नेमबाज गगन नारंग, टेनिसपटू महेश भूपती व सानिया मिर्झा, माजी फुटबॉलपटू बायचुंग भुतिया आणि कुस्तीपटू सुशीलकुमार यांचा सहभाग आहे.
  • हा व्हिडीओ अभिजित पानसरे यांनी दिग्दर्शित केला असून संगीत राम संपत यांचे आहे.

भारताने पहिला अंध टी-२० आशिया कप जिंकला

  • भारताच्या अंध क्रिकेट संघाने पाकिस्तानला ४१ धावांनी पराभूत करत टी-२० आशिया कप जिंकला आहे.
  • पहिल्यांदाच आशिया कप खेळलेल्या भारतीय अंध संघाने पाकिस्तानच्या अंध संघाचा पराभव केला आहे.
  • प्रथम फलंदाजी करताना भारतीय संघाने २० षटकांत २०९ धावा केल्या. २१० धावांचे आव्हान पेलताना पाकिस्तानचा संघ अवघ्या १६९ धावांवर गारद झाला.

  • शेतकऱ्यांसाठी उभे आयुष्य लढा देणारे नेते दिवंगत शरद जोशी यांच्या कुटुंबियांसह सुप्रसिद्ध तमिळ लेखक बी जयमोहन आणि पत्रकार विरेंद्र कपूर यांनी २५ जानेवारी रोजी जाहीर झालेले पद्म पुरस्कार स्वीकारण्यास नकार दिला आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा