चालू घडामोडी : २५ जून

राजकोट : नॅशनल अर्थ अवर कॅपिटल २०१६

  • कार्बनचे उत्सर्जन कमी करण्याबरोबर नवीकरणीय ऊर्जा वापरास दिलेले प्राधान्य यामुळे गुजरातमधील राजकोट शहराला ‘नॅशनल अर्थ अवर कॅपिटल २०१६’ पुरस्कारने गौरविण्यात आले आहे.
  • ‘वर्ल्ड वाइल्ड फंड फॉर नेचर’च्या (डब्ल्यूडब्ल्यूएफ)वतीने आयोजित ‘ग्लोबल अर्थ अवर सिटी चॅंलेज’ (ईएचसीसी) स्पर्धेत २१ देशांतील १२५ शहरांचा सहभाग होता,
  • या वेळी ग्लोबल अर्थ अवर कॅपिटल पुरस्कारासाठी समितीने फ्रान्सची राजधानी पॅरिस या शहराची निवड केली.
  • हवामान बदलाविरोधात लढा देण्यासाठी दीर्घकालीन प्रयत्न करणाऱ्या शहरांची निवड ईएचसीसी स्पर्धेतून केली जाते.
  • यंदा राजकोटला हा मान मिळाला असून, विविध देशांतील इतर १७ शहरांनाही नॅशनल अर्थ अवर कॅपिटल पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
  • विकास साधताना कार्बनचे उत्सर्जन कमी करणे, नवीकरणीय ऊर्जा वापरास प्राधान्य देणे यासाठी राजकोटने अवलंबलेली धोरणे उल्लेखनीय असून, त्याची दखल घेत या शहराची निवड करण्यात आली.
  • या स्पर्धेत राजकोटशिवाय भारतातील ११ शहरांनीही सहभाग दर्शविला होता. त्यापैकी पुणे, कोइमतूर या शहरांनी अंतिम फेरीतपर्यंत मजल मारली होती.
  • या स्पर्धेत सहभागी होणाऱ्या शहरांचे मूल्यमापन करून जगातील एका शहराची ग्लोबल अर्थ अवर कॅपिटलप्रत्येक देशातील एका शहराची नॅशनल अर्थ अवर कॅपिटल या पुरस्कारांसाठी निवड केली जाते.
  • यापूर्वी ठाणे, कोइमतूर तसेच नवी दिल्ली या शहरांना नॅशनल अर्थ अवर कॅपिटल हा सन्मान प्राप्त झाला आहे.

मेहबुबा मुफ्ती विजयी

  • जम्मू-काश्मीरमधील अनंतनाग विधानसभा पोटनिवडणुकीत जम्मू-काश्मीरच्या मुख्यमंत्री व पीडीपीच्या नेत्या मेहबुबा मुफ्ती यांनी विजय मिळवला आहे.
  • मुफ्ती यांनी त्यांचे निकटचे प्रतिस्पर्धी काँग्रेसचे हिलाल शाह अहमद यांचा ११ हजार मतांच्या फरकाने पराभव केला. नॅशनल कॉन्फरन्सचे उमेदवार इफ्तिकार हुसेन मिसगर तिसऱ्या स्थानावर फेकले गेले.
  • मुफ्ती मोहम्मद सईद यांच्या निधनामुळे अनंतनाग विधानसभेची जागा रिक्त झाली होती. सईद यांच्या निधनानंतर मुख्यमंत्रिपदी आलेल्या मेहबुबा यांनी येथून निवडणूक लढविली.

बांगलादेशातील श्रोत्यांसाठी आकाशवाणी मैत्री

  • भारत व बांगलादेशातील श्रोत्यांसाठी ‘आकाशवाणी’ येत्या २८ जूनपासून ‘आकाशवाणी मैत्री’ नावाची नवी वाहिनी सुरू करणार आहे.
  • राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या हस्ते कोलकत्यात होणाऱ्या समारंभात या बंगाली भाषेतील वाहिनीचे उद्घाटन होणार आहे. 
  • या वाहिनीवर भारत व बांगलादेशातील कला, संस्कृती, साहित्य, संगीत, क्रीडा संबंधित कार्यक्रम प्रसारित केले जाणार आहेत.
  • पश्चिम बंगाल सरकारच्या ‘बांगलादेश बेतार’ या वाहिनीकडे येथील कार्यक्रमांसाठी कंटेंट तयार करण्यात येणार आहे. 
  • या वाहिनीवर संगीत कार्यक्रम तसेच प्रश्नमंजुषा, विविध विषयांवर चर्चा अशांसारखे कार्यक्रम प्रसारित केले जातील. त्यामध्ये भारत व बांगलादेशातील नागरिक एकाचवेळी सहभाग घेऊ शकणार आहेत.
  • पश्चिम बंगाल व बांगलादेशातील शेती तसेच निसर्ग साधारणतः सारखाच आहे, त्यामुळे दोन्ही भागांतील शेतकऱ्यांना या वाहिनीचा लाभ होणार आहे.
  • बांगलादेशातील अनेक लोक भारतात आरोग्य सुविधा घेण्यास येतात, त्यांच्यासाठीही कार्यक्रम सादर केले जाणार आहेत. 
  • साधारणपणे दिवसभरात साडेसहा तास या वाहिनीवरून कार्यक्रम प्रसारित केले जातील. त्यानंतर हा कालावधी सोळा तासांपर्यंत वाढविला जाणार आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा