चालू घडामोडी : २३ ऑक्टोबर

भारत तिसऱ्यांदा कबड्डी विश्वकप विजेता

  • पहिल्या सत्रात पिछाडीवर असणाऱ्या भारताने इराणवर रोमहर्षक विजय मिळवत सलग तिसऱ्यांदा विश्वचषकावर आपले नाव कोरले.
  • कठीण परिस्थितीत अजय ठाकूरने केलेल्या तुफानी आणि निर्णायक चढायांच्या जोरावर भारताने इराणचे आव्हान ३८-२९ असे मोडून काढले
  • इराणचा कर्णधार मेराज शेखच्या दमदार कामगिरीमुळे पहिल्या सत्रात भारत अडखळताना दिसला.
  • पहिल्या सत्रात भारत १८-१३ ने पिछाडीवर होता. मात्र दुसऱ्या सत्रात भारताने सर्वच आघाड्यांवर दमदार कामगिरी करत विजय मिळविला.
  • या एका सामन्यात चढायांमध्ये १२ गुण मिळवणारा अजय ठाकूर भारताच्या विजयाचा शिल्पकार ठरला.
  • याआधी भारताने २००४ आणि २००७ मध्ये कबड्डी विश्वचषकावर आपले नाव कोरले आहे.
  • महाराष्ट्रात पहिल्या दोन विश्वचषक कबड्डी स्पर्धा झाल्यानंतर सुमारे ९ वर्षांनंतर अहमदाबादमध्ये कबड्डी विश्वकप २०१६चे आयोजन करण्यात आले होते. 
  • आतापर्यंतच्या तिन्ही विश्वकप अंतिम सामन्यामध्ये भारताने अंतिम फेरीत इराणचाच पराभव केला आहे.

 कबड्डी विश्वकपबद्दल 
  • २००७नंतर १० वर्षांनी पुन्हा एकदा तिसरा कबड्डी विश्वकप (Indoor) भारतात अहमदाबाद, गुजरात येथे होत आहे.
  • हा विश्वकप गुजरातमध्ये होत असला तरी त्याची बीजे महाराष्ट्रातच रोवली गेली. महाराष्ट्रानेच कबड्डी ही सातासमुद्रापार नेण्याचे काम केले.
  • १९८१मध्ये प्रथमच कबड्डी भारताबाहेर म्हणजे जपानला गेली. त्यावेळी दोन पुरुष व दोन महिला संघ असे चार संघ जपानला गेले होते.
  • महाराष्ट्रात २००४ व २००७मध्ये प्रथम विश्वकपचे यशस्वी आयोजन करण्यात आले. त्यानंतर २०१६पर्यंत विश्वकप होऊ शकला नाही.
  • २००४मध्ये साऊथ कॅनरा स्पोर्टस क्लबच्या सुवर्ण महोत्सवानिमित्त शिवछत्रपती पुरस्कार विजेते जया शेट्टी यांच्या प्रयत्नाने भारतीय क्रीडा मंदिर, वडाळा येथे विश्वकप झाला.
  • नंतर २००७मध्ये विवेक पाटील यांच्या कर्नाळा स्पोर्टस क्लबने पनवेल येथे ही स्पर्धा भरवली.
  • २००४मध्ये १२ तर २००७मध्ये १६ संघ स्पर्धेत सहभागी झाले. पाकिस्तान मात्र एकही विश्वकपमध्ये खेळू शकलेला नाही.
  • या दोन्ही स्पर्धांसाठी शरद पवार यांच्या मदतीने सहभागी देशातील खेळाडूंना येण्याजाण्याच्या प्रवासाची तिकिटे देण्यात आली.
  • २००४मधील स्पर्धेच्या अखेरच्या दिवशी आंतरराष्ट्रीय कबड्डी फेडरेशनची स्थापना झाली आणि त्यावेळी जनार्दनसिंह गेहलोत त्याचे अध्यक्ष बनले.
  • या दोन विश्वकपमध्ये शैलेश सावंत, गौरव शेट्टी, पंकज शिरसाट हे महाराष्ट्राचे खेळाडू खेळले होते. परंतु यंदाच्या विश्वकपमध्ये महाराष्ट्राचा एकही खेळाडू भारतीय संघात नाही.
  • एकूणच जागतिक स्तरावर कबड्डीला नेण्यात महाराष्ट्राचे योगदान खूप मोठे आहे. 

प्रसिद्ध अभिनेत्री अश्विनी एकबोटे यांचे निधन

  • रंगमंचावर नृत्य सादर करताना अचानक हृदयविकाराचा झटका आल्याने प्रसिद्ध अभिनेत्री, नृत्यांगना अश्विनी एकबोटे यांचे निधन झाले.
  • भरत नाट्य मंदिर येथे नाट्यत्रिविधा हा नृत्य, नाट्य, संगीताचा विशेष कार्यक्रम २२ ऑक्टोबर रोजी सायंकाळी आयोजिण्यात आला होता.
  • यात अश्विनी एकबोटे यांच्यासह डॉ. रेवा नातू, चिन्मय जोगळेकर अनुपमा बर्वे या कलावंतांचा समावेश होता.
  • हरहुन्नरी अभिनेत्री असलेल्या एकबोटे यांनी चित्रपट, नाटक, मालिका या तीनही माध्यमांत आपल्या अभिनयाचा ठसा उमटविला होता.
  • अभिनयाबरोबरच शास्त्रीय नृत्यावरही त्यांचे तितकेच प्रेम होते. त्या नृत्यसंस्थाही चालवत होत्या.
  • चित्रपट : देबू, महागुरू, बावरा प्रेम हे, तप्तपदी, आरंभ, हायकमांड, एक पल प्यार का, क्षण हा मोहाचा, मराठा टायगर्स
  • मालिका : दुहेरी, दूर्वा, राधा ही बावरी, तू भेटशी नव्याने, कशाला उद्याची बात, अहिल्याबाई होळकर, ऐतिहासिक गणपती 
  • नाटक : त्या तिघींची गोष्ट, एका क्षणात, संगीत बावणखणी

वडोदरा देशातील दुसरे हरित विमानतळ

  • पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वडोदरा येथे नव्या एकात्मिक विमानतळ टर्मिनलचे उद्घाटन केले. कोचीनंतर आता हे देशातील दुसरे हरित विमानतळ आहे.
  • अशा प्रकारचे पहिले विमानतळ कोची येथे असून वडोदरामधील दुसरे विमानतळ देशाला अर्पण करण्यात आले आहे.
  • यावेळी मोदी यांनी वडोदरामध्ये पहिले रेल्वे विद्यापीठ स्थापन करण्याचा महत्त्वाचा निर्णयदेखील जाहीर केला.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा