चालू घडामोडी : १४ जुलै

देशातील पहिल्या सोलर डीईएमयू ट्रेनचे उद्घाटन

  • देशातील सौर उर्जेवर चालणाऱ्या पहिल्या डीईएमयू (डिझेल इलेक्ट्रॉनिक मल्टिपल युनिट) ट्रेनला १४ जुलै रोजी रेल्वे मंत्री सुरेश प्रभू यांनी सफदरजंग रेल्वे स्टेशनवरून हिरवा झेंडा दाखवला.
  • सध्या दिल्लीच्या सराई रोहिला ते हरयाणाच्या फारुख नगर या मार्गावर ही ट्रेन धावेल. या रेल्वेसाठी अद्याप नवे मार्ग आणि प्रवास भाडे ही ठरवण्यात आलेले नाही.
  • १६०० हॉर्स पॉवर असलेल्या या ट्रेनमध्ये एकूण १० कोच आहेत. या रेल्वेतील एका कोचमधून ८९ लोक प्रवास करू शकतात.
  • १० पैकी ८ कोचच्या छतावर १६ सोलर पॅनल बसवलेले आहेत. सौरऊर्जेमुळे या सोलर पॅनलमधून ३०० वॅट ऊर्जा निर्मिती होणार आहे.
  • त्यामुळे कोचमध्ये बसवलेला बॅटरी चार्ज होणार आहे. याद्वारेच या रेल्वेतील सर्व दिवे, पंखे आणि माहिती यंत्रणा चालणार आहे.
  • या ट्रेनमध्ये पावर बॅकअपची सुविधा असून, एकदा पूर्ण चार्ज झाल्यानंतर ही रेल्वे ७२ तास बॅटरीवर चालू शकते.
  • ही रेल्वे चेन्नईतल्या इंटीग्रील कोच फॅक्ट्रीमध्ये तयार करण्यात आली आहे. तर इंडियन रेल्वेज ऑर्गनायजेशन ऑफ अल्टरनेटिव फ्यूअल या संस्थेने यासाठी सोलर पॅनल बनवले आहे.
  • या सोलर पॅनलची निर्मिती मेक इन इंडिया कार्यक्रमातंर्गत करण्यात आली असून, त्यासाठी ५४ लाख रुपये खर्च करण्यात आले आहेत. पुढील २५ वर्षांची या सोलर सिस्टीमची वॉरंटी असणार आहे. 
  • या रेल्वेच्या निर्मितीसाठी १३.५४ कोटी रूपये इतका खर्च आला आहे. एका प्रवासी कोचची किंमत सुमारे १ कोटी रूपये आहे.
  • ही रेल्वे प्रत्येक वर्षी २१ हजार लीटर डीझेलची बचत करणार आहे. तसेच दरवर्षी ९ टन कार्बन उत्सर्जनही कमी होणार आहे. त्यामुळे या ट्रेनमुळे प्रदूषणही थांबवण्यास बऱ्याच अंशी मदत होणार आहे.
  • या रेल्वेच्या माध्यमातून, जगात प्रथमच रेल्वेमध्ये सोलर पॅनलचा विद्युत ग्रीड म्हणून वापर करण्यात आला आहे.
  • २०१६-१७च्या रेल्वे बजेटमध्येच अशा ट्रेनचा उल्लेख करण्यात आला होता. पुढच्या ६ महिन्यांत असे आणखी २४ कोच वाढवण्यात येणार आहेत.

नोबेलविजेते लेखक लियू शाबो यांचे तुरुंगवासात निधन

  • चीनच्या नागरिकांना मुलभूत मानवी व लोकशाही हक्क मिळावेत यासाठी लढा देणारे नोबेल शांतता पुरस्कारविजेते ज्येष्ठ लेखक लियू शाबो यांचे १३ जुलै रोजी वयाच्या ६१व्या वर्षी तुरुंगवासातच निधन झाले.
  • चीन सरकारने सन २००९मध्ये लियू यांना राष्ट्रद्रोहाबद्दल दोषी ठरवून ११ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा ठोठावली होती.
  • मुलभूत मानवी हक्क मिळावेत व चीनची एकपक्षीय राजकीय व्यवस्था अधिक खुली व लोकाभिमुख करावी यासाठी ‘चार्टर ०८’ नावाची स्वाक्षरी मोहीम चालविल्याबद्दल त्यांना राष्ट्रद्रोही ठरविले गेले.
  • तुरुंगात असतानाच त्यांना शांततेचे नोबेल जाहीर झाले. मात्र ओस्लो येथे सन २०१०मध्ये झालेल्या नोबेल सोहळ्यात त्यांना सहभागी होता आले नव्हते.
  • सुमारे महिनाभरापूर्वी लियू शाबो यांना यकृताचा कर्करोग असल्याचे जाहीर करण्यात आले व त्यांची रवानगी रुग्णालयात करण्यात आली. परंतु योग्य उपचार न मिळाल्याने त्यांचे निधन झाले.
  • लियू शाबो यांना सन २००९मध्ये अटक झाल्यानंतर त्यांची पत्नी लिऊ शाबो यांना काही महिन्यांतच त्यांच्या राहत्या घरात स्थानबद्ध करण्यात आले. त्या आजतागायत नजरकैदेतच आहेत.
  • १९८९मध्ये बीजिंगस्थित तियानानमेन चौकातील ऐतिहासिक लोकशाहवादी आंदोलनातही त्यांनी सहभाग घेतला होता.
  • जगभर गौरव झालेले परंतु स्वदेशातील छळामुळे तुरुंगातच अखेरचा श्वास घ्यावा लागलेले लियो हे दुसरे नोबेल शांतता पुरस्कारविजेते ठरले आहेत.
  • याआधी जर्मनीचे शांततावादी कार्ल व्हॉन ओस्सिएत्सी यांचे जुलमी नाझी राजवटीच्या तुरुंगात सन १९३८मध्ये निधन झाले होते.

भारतीय शास्त्रज्ञांकडून दिर्घीकांच्या महासमूहांचा शोध

  • सुमारे २ कोटी अब्ज सूर्याएवढे वस्तूमान असणाऱ्या ‘सरस्वती’ दिर्घीकांच्या महासमूहांचा शोध भारतीय शास्त्रज्ञांनी लावला आहे.
  • इंटर-युनिव्हर्सिटी सेंटर फॉर अ‍ॅस्ट्रोनॉमी अ‍ॅण्ड अ‍ॅस्ट्रोफिजिक्सतील (आयुका) शास्त्रज्ञ जॉयदीप बागची यांच्या नेतृत्त्वाखाली देशातील शास्त्रज्ञांच्या गटाने आंतरराष्ट्रीय स्तरावरील हे संशोधन जगासमोर मांडले आहे.
  • त्यामुळे विश्वाच्या निर्मिती विषयी मांडण्यात आलेल्या खगोलीय घटनांचा नव्याने अभ्यास करावा लागणार आहे.
  • आयुकासह इंडियन इस्टिट्यूट ऑफ सायन्स अ‍ॅण्ड एज्युकेशन रिसर्च (आयसर), नॅशनल इंन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (एनआयटी) जमशेदपूर व केरळमधील न्यूमन कॉलेजमधील विद्यार्थी व संशोधक प्राध्यापकांनी ‘सरस्वती’ दिर्घीकांचा शोध लावला आहे.
  • आयुकाचे शास्त्रज्ञ जॉयदीप बागची यांनी २००२मध्ये दिर्घीकांच्या समूहाविषयीचे संशोधन सुरू केले होते.
  • मात्र, पुढील काही वर्षात याबाबतची अधिक माहिती समोर आली होती. त्यानंतर देशातील विविध संशोधन संस्थांमधील शास्त्रज्ञांच्या सहकार्याने त्यांनी सलग २-३ वर्षात हे संशोधन पूर्ण केले.
  • आकाशगंगेमध्ये एवढ्या मोठ्या दिर्घीकांचा समूह असण्याबाबतची माहिती प्रथमच समोर आली आहे. या दिर्घीकांची व्याप्ती ६० कोटी प्रकाशवर्ष एवढी असण्याची शक्यता आहे.
  • तसेच या दिर्घीकांचा समूह मीन राशीमध्ये असल्याचे शोध प्रबंधात स्पष्ट करण्यात आले आहे. ४३ दिर्घीकांच्या या समूहाला ‘सरस्वती’असे नाव देण्यात आले आहे.

जगात भारतीय जनतेचा सरकारवर सर्वाधिक विश्वास

  • जगप्रसिद्ध फोर्ब्स मासिकाने लोकशाही असलेल्या जगातील प्रमुख ३४ देशांमध्ये सरकारविषयी लोकांमध्ये असलेल्या विश्वासाबद्दल सर्वेक्षण केले आहे. यामध्ये भारताने प्रथम क्रमांक पटकावला आहे.
  • देशातील ७३ टक्के जनतेचा सरकारवर विश्वास असल्याची आकडेवारी सर्वेक्षणातून पुढे आली आहे.
  • जगातील इतर देशांमधील लोकांच्या तुलनेत भारतीय जनतेचा देशातील सरकारवर अधिक विश्वास असल्याचे सर्वेक्षणातून समोर आले आहे.
  • आर्थिक सहकार्य आणि विकास संस्थेत समावेश होणाऱ्या देशांचे फोर्ब्सकडून सर्वेक्षण करण्यात आले आहे. यामध्ये लोकशाही असलेल्या ३४ देशांचा समावेश आहे.
  • लोकांच्या मनात सरकारबद्दल असलेल्या विश्वासाची पडताळणी सर्वेक्षणातून करण्यात आली आहे. यामध्ये भारताने पहिला क्रमांक मिळवला आहे.
  • भारतापाठोपाठ कॅनडाचा दुसरा क्रमांक लागतो तर तुर्कस्तान आणि रशिया संयुक्तपणे तिसऱ्या स्थानावर आहेत. यानंतर जर्मनी, दक्षिण आफ्रिका, ऑस्ट्रेलिया, युनायटेड किंग्डम, जपान यांचा क्रमांक लागतो.
  • अमेरिका तसेच स्पेनमधील अवघ्या ३० टक्के जनेतेने सरकारबद्दल विश्वास दाखवला आहे.
  • अमेरिका स्पेननंतर, फ्रान्स (२८ टक्के), ब्राझील (२६ टक्के), दक्षिण कोरिया (२४ टक्के) आणि ग्रीस (१३टक्के) यांचा क्रमांक लागतो.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा