चालू घडामोडी : १६ सप्टेंबर

फील्ड मार्शल अर्जन सिंह कालवश

  • भारतीय हवाईदलाचे मार्शल आणि ‘फाइव्ह स्टार रँक’ प्राप्त अधिकारी अर्जन सिंह यांचे वयाच्या ९८व्या वर्षी १६ सप्टेंबर रोजी दिल्लीतील लष्कराच्या रुग्णालयात हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले.
  • ‘मार्शल ऑफ द इंडियन एअर फोर्स’ हा सर्वोच्च पंचतारांकित सन्मान मिळवणारे ते भारताचे पहिले व एकमेव अधिकारी आहेत.
  • १९१९मध्ये त्यांचा पाकिस्तानमधील पंजाब प्रांतात जन्म झाला होता. भारत सरकारने त्यांना पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानित केले होते.
  • १९६५च्या भारत पाक युद्धात त्यांनी महत्वाची भूमिका निभावली होती. वयाच्या ४५व्या वर्षी सर्वात तरुण हवाईदल प्रमुख होण्याचा मान त्यांना मिळाला होता.
  • अर्जन सिंग यांच्याच काळात भारतीय हवाई दलाच्या प्रमुखांचे पद एअर चीफ मार्शल या दर्जाचे झाले आणि ते त्या पदावरील पहिले भारतीय होते. 
  • त्यांच्या ९७व्या वाढदिवसादिवशी पश्चिम बंगालमधील पानागड येथील हवाई दलाच्या एअर बेसला त्यांचे नाव देण्यात आले होते. जिवंतपणी एका विमानतळाला नाव देण्यात आलेले ते एकमेव अधिकारी आहेत.
  • भारत स्वतंत्र झाल्यावर १५ ऑगस्ट १९४७ रोजी पहिल्या स्वातंत्र्य दिनी हवाई दलाच्या १०० विमानांनी लाल किल्ल्यावरून केलेल्या ‘प्लायपास्ट’चे नेतृत्व अर्जन सिंग यांनी केले होते.
  • आपल्या गौरवशाली कारकीर्दीत त्यांनी ६० विविध प्रकारची विमाने उडवली होती. १९६९साली अर्जन सिंह सेवानिवृत्त झाले.
  • हवाई दलातून निवृत्तीनंतर ते स्वित्झर्लंडमधील भारताचे राजदूत व केनियामधील उच्चायुक्त होते. त्यानंतर त्यांनी दिल्लीचे नायब राज्यपाल म्हणूनही जबाबदारी सांभाळली.
  • ते जेव्हा एअर स्टाफचे प्रमुख होते त्या वेळी आयएएफमध्ये सुपरसॉनिक फायटर्स, टॅक्टिकल ट्रान्सपोर्ट एअरक्राफ्ट आणि असॉल्ट हेलिकॉप्टर्सचा समावेश करण्यात आला होता.

कोकण रेल्वेमार्गावर व्हिस्टाडोम कोच

  • प्रवाशांना कोकणातील निसर्गाचा आनंद घेता यावा यासाठी मध्य रेल्वेच्या ताफ्यातील ‘व्हिस्टाडोम’ कोच कोकण रेल्वेच्या मार्गावर धावणार आहे.
  • दादर-मडगाव जनशताब्दी एक्स्प्रेसला हा डबा जोडण्यात येणार असून या डब्यातून दादर ते रत्नागिरी प्रवासासाठी १,४८० रुपये तर दादर ते मडगावसाठी २,२३५ रुपये मोजावे लागतील.
  • काचेचे छत असलेली पहिली ट्रेन विशाखापट्टणम ते आराकू व्हॅली या हिल स्टेशन दरम्यान धावत आहे.
  • अशा प्रकारचा एक डबा प्रायोगिक तत्त्वावर मध्य रेल्वेच्या ताफ्यात दाखल करण्याचा आणि तो कोकण रेल्वेवरील जनशताब्दी एक्स्प्रेसला जोडावा असा प्रस्ताव मध्य रेल्वेने दिला होता.
  • या प्रस्तावाला अखेर मंजुरी मिळाली असून, १८ सप्टेंबरपासून हा डबा जनशताब्दी एक्स्प्रेसला जोडण्यात येणार आहे.
  • या डब्याची बांधणी ही चेन्नईतील रेल्वेच्या इंटिग्रल कोच कारखान्यात करण्यात आली. या डब्यात ४० सीट्स असून त्या १८० टक्के रोटेटेबल आहेत.
  • काचेच्या मोठ्या खिडक्या, १२ एलसीडी, एक फ्रिज, एक फ्रीजर, एक ओव्हन, एक ज्युसर ग्राईंडर, प्रवाशांच्या सामानासाठी जागा, निसर्ग पाहण्यासाठी स्वतंत्र जागा या डब्यात आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा