चालू घडामोडी : ८ मार्च

ज्येष्ठ साहित्यिक वसंत नरहर फेणे यांचे निधन

  • साहित्य विश्वात मोलाचे योगदान देणारे ज्येष्ठ साहित्यिक वसंत नरहर फेणे यांचे वयाच्या ९२व्या वर्षी मुंबईत निधन झाले.
  • मुंबईतील जोगेश्वरी या ठिकाणी त्यांचा जन्म झाला होता. फेणे यांनी अनेक अडथळ्यांवर मात करत साहित्य विश्वास स्वतःचे स्थान निर्माण केले.
  • ‘काना आणि मात्रा’ हा त्यांचा पहिला कथासंग्रह १९७२मध्ये प्रसिद्ध झाला. त्यानंतर वयाच्या ९१व्या वर्षापर्यंत ते लेखन करत होते.
  • वयाच्या ३५ व्या वर्षी त्यांनी लेखन करण्यास सुरुवात केली. त्यांच्या वयाच्या ९१व्या वर्षी त्यांची ‘कारवारी माती’ ही कादंबरी प्रसिद्ध झाली.
  • संवेदनशील लेखक अशी ओळख असलेल्या वसंत नरहर फेणे यांनी काही काळ राष्ट्र सेवादलातही काम केले.
  • नोकरीच्या निमित्ताने कोल्हापूर, विजापूर, पुणे, नाशिक या ठिकाणी त्यांना फिरावे लागले. भटकंतीच्या काळातील अनुभवांमधूनच त्यांच्यातला लेखक प्रगल्भ बनत गेला.
  • कथा, नाटक, विनोदी लेखन, अनुवाद, कादंबरी अशा अनेक साहित्य प्रकारात त्यांनी विपुल लेखन केले.
  • त्यांनी सर्वसामान्य माणसाचे अनुभवविश्व प्रत्ययकारक रीतीने आपल्या कथां-कादंबऱ्यांतून उलगडले. साडेपाच दशकभरांच्या काळात सुमारे साठ कथा व दहा कादंबऱ्या त्यांनी लिहिल्या.
  • हे झाड जगावेगळे, ज्याचा त्याचा क्रूस, मावळतीचे मृदगंध, ध्वज, निर्वासित नाती, पहिला अध्याय, विश्वंभरे बोलविले, शतकान्तिका, सहस्रचंद्रदर्शन अशी अनेक पुस्तके त्यांनी लिहिली.
  • अमेरिकी विचारवंत सिडने हुक याच्या ‘स्टडीज इन कम्युनिझम’ या पुस्तकाचा ‘साम्यवाद-एक अभ्यास’ हा अनुवाद फेणे यांनी केला होता.
  • वसंत फेणे यांच्या ‘काना आणि मात्रा’ कथासंग्रहाला महाराष्ट्र शासनाच्या उत्कृष्ट वाङमय पुरस्काराने गौरविण्यात आले होते. तर ‘विश्वंभर बोलविले’ कादंबरीसाठी त्यांना ना. सी. फडके पुरस्कार मिळाला होता.
  • एकूण लेखकीय कारकीर्दीसाठी मुंबईतील ‘शब्द : द बुक गॅलरी’च्या वतीने देण्यात येणाऱ्या भाऊ पाध्ये साहित्य गौरव शब्द पुरस्कारानेही वसंत फेणे यांचा सन्मान करण्यात आला होता.
  • त्यांच्या जाण्याने साहित्यविश्वात कधीही भरून न येणारी पोकळी निर्माण झाली आहे.

मुंबई व दिल्ली जगातील प्रथम क्रमांकाचे विमानतळ

  • मुंबईतील छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळ जगातील प्रथम क्रमांकाचे विमानतळ ठरले आहे. मुंबईसोबतच दिल्ली विमानतळानेही हा मान पटकावला आहे.
  • एअरपोर्ट काऊन्सिल इंटरनॅशनल (ACI)ने विमानतळ सेवेच्या गुणवत्तेवरून दिलेल्या क्रमवारीनुसार हा मान मुंबई व दिल्ली विमानतळाला मिळाला आहे.
  • मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर दरवर्षी ४० दशलक्ष प्रवाशांचा राबता असतो. या निकषावर मुंबई आणि दिल्ली विमानतळाला हा मान मिळाला आहे.
  • एअरपोर्टचा अॅक्सेस, चेक-इन, सुरक्षा स्क्रीनींग, विश्रामगृह, सामानाची व्यवस्था, रेस्टॉरंट आदी ३४ निकषांवर जागतिक पातळीवर हे सर्वेक्षण करण्यात आले.
  • त्या खालोखाल ५ ते १५ दशलक्ष प्रवाशांना सेवा देणाऱ्या हैदराबाद विमानतळाचा क्रमांक आहे.
  • दिल्ली आणि हैदराबाद विमानतळ जीएमआर समूह तर मुंबई विमानतळ जीव्हीके समूह चालवतात.

अ‍ॅक्सिस बँक व आयओबीला रिझर्व्ह बँकेकडून दंड

  • रिझर्व्ह बँकेने अनुत्पादक भांडवलाच्या (एनपीए) वर्गीकरण नियमांचा भंग केल्याबद्दल अ‍ॅक्सिस बँकेला ३ कोटींचा तर, केवायसी नियमांचा भंग केल्याप्रकरणी इंडियन ओव्हरसीज बँकेला (आयओबी) २ कोटी रुपयांचा दंड ठोठावला आहे.
  • ३१ मार्च २०१६च्या वित्तीय स्थितीच्या आधारे अ‍ॅक्सिस बँकेचे वैधानिक परीक्षण करण्यात आले. बँकेने एनपीएविषयक अनेक नियमांचे उल्लंघन केल्याचे आढळल्याने बँकेवर ही कारवाई करण्यात आली आहे.
  • रिझर्व्ह बँकेच्या ‘इन्कम रिकग्निशन अँड अ‍ॅसेट क्लासिफिकेशन’ नियमांचे अ‍ॅक्सिस बँकेने पालन केलेले नाही.
  • सरकारी मालकीच्या इंडियन ओव्हरसीज बँकेने केवायसी नियमांचे पालन न केल्याचे एका परीक्षणात आढळून आले आहे.
  • या बँकेच्या व्यवहारांत इतरही काही अनियमिमता आढळून आल्या आहेत. त्यामुळे बँकेला २ कोटींचा दंड ठोठावण्यात आला आहे.
  • पंजाब नॅशनल बँकेतील घोटाळ्याच्या पार्श्वभूमीवर रिझर्व्ह बँकेने व्यावसायिक बँकांवरील निगराणी वाढविली आहे.
  • बँकांनी नियमांचे काटेकोर पालन केल्यास घोटाळ्यांना आळा घालणे शक्य होईल, असे रिझर्व्ह बँकेला वाटते.

मनू भाकेरचा सुवर्णपदकाचा डबल धमाका

  • आयएसएसएफ विश्वचषक नेमबाजी अजिंक्यपद स्पर्धेत मनू भाकेरने १० मीटर एअर पिस्टल मिश्र सांघिक प्रकारात ओम प्रकाश मिथरवासह दुसरे सुवर्णपदक आपल्या नावावर केले आहे.
  • यापूर्वी मनूने याच स्पर्धेच्या महिलांच्या १० मीटर एअर पिस्टल प्रकारात सुवर्णपदकावर नाव कोरले होते.
  • मेक्सिको येथे सुरू असलेल्या या स्पर्धेत मनूने आपल्या पदार्पणातच वरिष्ठ गटात दोन सुवर्णपदक जिंकली आहेत.
  • भारतीय नेमबाजीच्या इतिहासात सर्वांत कमी वयात (१६ वर्षे) दोन सुवर्णपदक आपल्या नावे करणारी मनू पहिली नेमबाज ठरली आहे.
  • या कामगिरीमुळे मनू ऑक्टोबरमध्ये ब्युनस येथे होणाऱ्या युथ ऑलिम्पिक स्पर्धेसाठी पात्र ठरलेली पहिली युवा नेमबाज आहे.
  • दुसरीकडे दीपक कुमार आणि मेहूली घोष या भारतीय जोडीने चमकदार कामगिरी करताना १० मीटर रायफल मिश्र प्रकारात कांस्यपदक जिंकले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा