चालू घडामोडी : ३० नोव्हेंबर


मराठा आरक्षण विधेयक विधिमंडळात मंजूर

  • महाराष्ट्र विधानसभा आणि विधान परिषदेत मराठा आरक्षण विधेयक कोणत्याही चर्चेविना मंजूर करण्यात झाले. त्यामुळे मराठा समाजाला सरकारी नोकरी आणि शिक्षणात १६ टक्के आरक्षण मिळणार आहे.
  • न्या. एम. जी. गायकवाड यांच्या अध्यक्षतेखालील राज्य मागासवर्ग आयोगाच्या अहवालावरील कृती अहवाल विधानसभेत सादर करण्यात आला. 
  • त्यांनतर मराठा समाजासाठी स्वतंत्र प्रवर्ग तयार करून १६ टक्के आरक्षणाची तरतूद करणारे विधेयक राज्य विधिमंडळात मंजूर करण्यात आले.
  • हे विधेयक मंजूर झाल्यामुळे राज्यातील आरक्षण टक्केवारी आता ६८ टक्के होणार आहे.
मराठा आरक्षण विधेयकातील महत्त्वाच्या तरतुदी
  • मराठा समाजाला १६ टक्के आरक्षण
  • अल्पसंख्याक शैक्षणिक संस्था वगळून इतर शैक्षणिक संस्था आणि अनुदानित अथवा विनाअनुदानित शैक्षणिक संस्थांमधील एकूण जागांच्या १६ टक्के आरक्षण.
  • राज्याच्या नियंत्रणाखालील लोकसेवांमधील आणि पदांवरील सरळसेवा प्रवेशाच्या एकूण नियुक्त्यांच्या १६ टक्के.
  • मात्र, केंद्रीय सेवांमध्ये मराठा समाजाला तूर्तास आरक्षण देण्यात येणार नाही.
मागासवर्ग आयोगाच्या अहवालातील आकडेवारी
  • एकूण मराठा समाजापैकी ७६.८६ टक्के मराठा कुटुंब हे उपजीविकेसाठी शेती आणि शेतमजुरी करतात.
  • सरकारी, निमसरकारी सेवेत मराठा समाजाचा हिस्सा केवळ ६ टक्के, त्यातही जादातर नोकऱ्या ड वर्गात
  • ७० टक्के मराठा कुटुंब हे कच्या घरात राहतात.
  • ३१.७९ टक्के कुटुंबाकडे अजून गॅस नाही.
  • ३५.३९ टक्के कुटुंबाकडे नळ जोडणी नाही.
  • मराठा समाजातील व्यक्तींपैकी १३.४२ टक्के निरक्षर.
  • ३५.३१ टक्के प्राथमिक शिक्षण घेतलेले.
  • ४३.७९ टक्के १० वी १२ वी शिक्षण घेतलेले.
  • ६.७१ टक्केच पदवीधर व पदव्युत्तर शिक्षण घेतलेले तांत्रिक व व्यावसायिक शिक्षण घेतलेल्याचे प्रमाण ०.७१ टक्के.
  • ९३ टक्के मराठा समाजाचे उत्पन्न १ लाखांच्यापेक्षा कमी.
  • मराठा समाजाची बीपीएल टक्केवारी २४.२ टक्के.
  • ७१ टक्के मराठा शेतकरी अल्पभूधारक.
या अहवालातील ३ प्रमुख शिफारसी
  • मराठा समाज सामाजिक व आर्थिकदृष्ट्या मागासलेला आहे आणि या समाजाला शासकीय, निमशासकीय नोकऱ्यांमध्ये पुरेसे प्रतिनिधित्व नाही.
  • मराठा सामाजाला सामाजिक आणि शैक्षणिक मागास म्हणून घोषित केल्यामुळे भारतीय संविधानाच्या कलम १५(४) व १६(४) मधील तरतुदीनुसार हा समाज आरक्षणाचे लाभ घेण्यासाठी पात्र ठरतो.
  • एकूण आरक्षण ५० टक्क्यांपेक्षा अधिक होत असल्यास, सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार असाधारण व अपवादात्मक परिस्थितीचा निकष मराठा समाजाला लागू होतो.
महाराष्ट्रात आरक्षणाची सद्यस्थिती
  • अनुसूचित जमाती (ST) - ७ टक्के
  • अनुसूचित जाती (SC) - १३ टक्के
  • इतर मागासवर्गीय (OBC) - १९ टक्के
  • भटक्या जमाती (NT) - ११ टक्के
  • विशेष मागास वर्ग (SBC) - २ टक्के

लॉजिक्‍स इंडिया २०१९च्या लोगोचे अनावरण

  • केंद्रीय वाणिज्य व उद्योग आणि नागरी उड्डाण मंत्री सुरेश प्रभु यांनी २८ नोव्हेंबर रोजी नवी दिल्ली येथे लॉजिक्‍स इंडिया २०१९चा लोगो आणि माहिती पुस्तिकेचे अनावरण केले.
  • लॉजिक्‍स इंडिया २०१९चे आयोजन नवी दिल्ली येथे ३१ जानेवारी ते २ फेब्रुवारी २०१९ दरम्यान भारतीय निर्यात संघटनेद्वारे (एफआयईओ) केले जाणार आहे. या कार्यक्रमात २० देश सहभागी होतील.
  • लॉजिक्‍स इंडिया २०१९चा उद्देश: जागतिक व्यापारासाठी लॉजिस्टिक्सचा खर्च कमी करणे व परिचालन सामर्थ्य सुधारणे. यामुळे मालवाहतूक खर्च कमी करण्यात मदत होईल.
  • इतर व्यावसायिक क्षेत्रांवर अवलंबून असलेल्या वस्तूंचा कुशल आणि किफायतशीर प्रवाह सुनिश्चित करण्यासाठी लॉजिक्स इंडिया उपयोगी ठरेल.
लक्षात ठेवण्यासारखे मुद्दे
  • जागतिक बँकेच्या विश्व लॉजिस्टिक्स प्रदर्शन निर्देशांक २०१८मध्ये भारत ४४व्या स्थानावर आहे.
  • आर्थिक पाहणी २०१७-१८नुसार भारताच्या लॉजिस्टिक्स उद्योगाचा आकार १६० अब्ज अमेरिकन डॉलर आहे.
  • पुढील २ वर्षात भारताच्या लॉजिस्टिक्स उद्योग २१५ अब्ज डॉलरच्या अमेरिकेच्या लॉजिस्टिक्स उद्योगाला मागे टाकू शकतो.
  • लॉजिस्टिक्स क्षेत्र २२ दशलक्षांहून अधिक लोकांना रोजगार प्रदान करतो आणि पुढील ५ वर्षात हे क्षेत्र १०.५ टक्के दराने वाढण्याची अपेक्षा आहे.
आवश्यकता का?
  • भारतात इतर विकसित देशांच्या तुलनेत लॉजिस्टिक्सवरील (व्यावसायिक वस्तूंची वाहतूक) खर्च लक्षणीय आहे.
  • लॉजिस्टिक्सचा खर्च अधिक असल्यामुळे देशांतर्गत आणि विदेशी बाजारात भारतीय वस्तू अधिक महाग होतात, परिणामी ते इतर देशांच्या उत्पादनांबरोबर स्पर्धा करू शकत नाहीत.

कोकण-१८: भारत-ब्रिटन संयुक्त नौदल सराव

  • भारत आणि इंग्लंडच्या नौदलांचा संयुक्त सराव कोंकण-१८ २८ नोव्हेंबर रोजी गोव्याच्या किनाऱ्यावर सुरु झाला.
  • हा सराव ६ डिसेंबर २०१८पर्यंत चालणार आहे. यात दोन्ही देशांच्या नौदल तुकड्यांनी सहभाग घेतला आहे.
  • या सरावात इंग्लंडच्या रॉयल नेव्हीचे प्रतिनिधीत्व एचएमएस ड्रॅगन ही विनाशकारी युद्धनौका आणि वाइल्डकॅट हेलीकॉप्टर करणार आहे.
  • तर भारतीय नौदलाचे प्रतिनिधीत्व भारताची अत्याधुनिक विनाशिका युद्धनौका आयएनएस कोलकाता करत आहे.
  • त्याशिवाय समुद्रावर गस्त घालणारे नौदलाची विमाने सीकिंग आणि डॉर्नियर या युद्ध सरावात सहभागी झाले आहे.
  • या युद्ध सरावाचा उद्देश दोन्ही देशांच्या नौदलांचे तंत्रज्ञान आणि अनुभवांचा परस्परांना लाभ मिळवून देणे हा आहे.
  • या सरावात समुद्र आणि बंदरांवर वेळोवेळी नौदल क्षमता जातील. तसेच युद्ध कौशल्य आणि सागरी कारवाई, पाणबुडी वापरण्याचे तंत्रज्ञान याची परस्परांना देवाण-घेवाण होणार आहे.
  • भारत आणि ब्रिटन यांच्यातल्या प्रदीर्घ राजकीय संबंधांवर हा संयुक्त सराव आधारलेला आहे.
  • द्विपक्षीय युद्ध सराव कोकणची सुरुवात २००४मध्ये झाली. या युद्ध अभ्यासामुळे दोन्ही देशांच्या नौदालांना बंदरावरील आंतर-कार्यक्षमता विकसित करण्याची आणि अनुभवांचे आदान-प्रदान करण्याची संधी मिळते.

कोप इंडिया २०१९: भारत-अमेरिका हवाई युद्ध अभ्यास

  • भारत आणि अमेरिकेच्या वायुसेनेदरम्यान कोप इंडिया २०१९ हा हवाई युद्ध अभ्यास पश्चिम बंगालमध्ये ३ ते १४ डिसेंबर दरम्यान आयोजित केला जाणार आहे.
  • हा द्विपक्षीय उड्डाण कार्यक्रम एअरबेस कलाईकुंडा आणि अर्जुन सिंह या पश्चिम बंगालमधीलच्या २ महत्त्वाच्या हवाई तळांवर आयोजित केला जाईल.
  • कोप इंडिया २०१९ या अभ्यासाचा उद्देश: दोन्ही देशांच्या वायुदलाच्या दरम्यान परस्पर सहकार्याला चालना देणे आणि कौशल्यांची देवाणघेवाण करणे.
  • या अभ्यासात, अमेरिकेचे २०० वायुसैनिक १५ विमानांसह सहभागी होतील.
कोप इंडिया
  • हा आंतरराष्ट्रीय हवाई दल युद्ध अभ्यास आहे. याचे आयोजन भारतामध्ये भारतीय आणि अमेरिकन हवाई दलांदरम्यान केले जाते.
  • पहिल्यांदा हा युद्ध अभ्यास फेब्रुवारी २००४मध्ये ग्वाल्हेर येथे आयोजित करण्यात आला होता. यानंतर २००५, २००६ आणि २००९मध्ये या सरावाचे आयोजन करण्यात आले आहे.

इफ्फी २०१८चा समारोप

  • ४९व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव ‘इफ्फी २०१८’चा गोव्याची राजधानी पणजीमधील श्यामाप्रसाद मुखर्जी स्टेडीयममध्ये २८ नोव्हेंबर रोजी समारोप झाला.
  • यावर्षी इफ्फीची मुख्य संकल्पना ‘न्यू इंडिया’ होती. या महोत्सवात खेळ, इतिहास, अॅक्शन यांसारख्या विविध श्रेणींमधील चित्रपट दाखविण्यात आले.
  • ४९व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचा इस्रायल हा भागीदार देश होता. तर यावर्षी झारखंड हे विशेष राज्य म्हणून निश्चित करण्यात आले होते.
  • या चित्रपट महोत्सवात ६८ देशांचे २१२ चित्रपट प्रदर्शित करण्यात आले. इंडियन पॅनोरमा विभागांतर्गत २६ फिचर (कथाधारित) आणि २१ नॉन-फीचर (कथाबाह्य) चित्रपट दाखवण्यात आले.
  • या चित्रपट महोत्सवात शशी कपूर, श्रीदेवी, एम. करुणानिधी व कल्पना लाजमी या हिंदी चित्रपट क्षेत्रातील दिवंगत व्यक्तींना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
  • सुवर्णमयूर, रौप्यमयूर, जीवनगौरव पुरस्कार आणि इंडियन पर्सनॅलिटी ऑफ द इयर पुरस्‍कार या महोत्सवात प्रदान करण्यात आले.
पुरस्कारविजेते
  • चित्रपट क्षेत्रातल्या अमूल्य योगदानाबद्दल सलीम खान यांना इफ्फी विशेष पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. त्यांना पुरस्करस्वरूप १० लाख रुपये, प्रमाणपत्र आणि शाल प्रदान करण्यात आली.
  • इस्राएलचे चित्रपट निर्माता डेन वोलमन यांना जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
  • सर्गेई लोझनित्सा दिग्दर्शित युक्रेनियन चित्रपट ‘डॉनबास’ला इफ्फी २०१८चा सर्वोत्कृष्ट चित्रपट सन्मान (सुवर्ण मयूर) प्राप्त झाला. सुवर्ण मयूर, मानपत्र आणि ४० लाख रुपये असे या पुरस्काराचे स्वरुप आहे.
  • ‘इ मा योव्ह’ या चित्रपटासाठी लिजो जोस पेलिस्सरी यांना सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक म्हणून १५ लाख रुपये आणि रौप्य मयूर देऊन सन्मानित करण्यात आले.
  • ॲनास्ताशिया पुश्‍तोवित यांना ‘व्हेन द ट्रीज फॉल’ या युक्रेनियन चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्री पुरस्काराने गौरवण्यात आले.
  • चेंबन विनोद या ‘इ मा योव्ह’ चित्रपटासाठी पुरस्कार प्रदान करण्यात आला.
  • प्रत्येकी १० लाख रुपये व रौप्य मयूर पुरस्काराने सर्वोत्कृष्ट अभिनेता आणि अभिनेत्रीला गौरवण्यात आले.
  • ‘अगा’ या याकूत चित्रपटासाठी मिल्को लाझारोव्ह यांना विशेष ज्युरी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. १५ लाख रुपये आणि रौप्य मयूर असे या पुरस्काराचे स्वरुप आहे.
  • ‘रेस्पेटो’ या फिलिपिनो चित्रपटासाठी अल्बेर्टो मॉन्टेरस द्वितीय यांना फिचर फिल्मसाठीचा उत्तम दिग्दर्शक पदार्पणासाठीचा शताब्दी पुरस्कार प्रदान करण्यात आला.
  • प्रवीण मोरछले दिग्दर्शित ‘वॉकिंग विथ द विंड’ या लडाखी चित्रपटाला आयसीएफटी युनेस्को गांधी पदकाने सन्मानित करण्यात आले.
  • पॅरिस इथल्या इंटरनॅशनल कौन्सिल फॉर फिल्म, टेलिव्हिजन ॲण्ड ऑडिओ व्हिज्युअल कम्युनिकेशन आणि युनेस्को यांच्या वतीने हा पुरस्कार देण्यात येतो.
  • शांतता आणि सलोखा ही गांधीवादी मूल्ये मांडणाऱ्या चित्रपटाला हा सन्मान प्रदान करण्यात येतो.
कंट्री आणि स्टेट ऑफ फोकस
  • एखाद्या देशातल्या सर्वोत्कृष्ट कलाकृती आणि त्या देशाचे योगदान दर्शवणाऱ्या चित्रपटांचा ‘कंट्री ऑफ फोकस’मध्ये समावेश केला जातो.
  • ४९व्या इफ्फीमध्ये इस्रायल हा देश कंट्री ऑफ फोकस राहणार आहे. इस्रायलच्या वाणिज्य दुतावासाच्या सहकार्याने १० चित्रपटांना कंट्री फोकस पॅकेजसाठी निवडले आहेत.
  • इफ्फीमध्ये भारताच्या एका राज्यावर व त्यातल्या कला आणि संस्कृतीवर प्रकाश टाकणाऱ्या चित्रपटांचा ‘स्टेट ऑफ फोकस’मध्ये प्रथमच समावेश केला आहे.
  • ४९व्या इफ्फी २०१८मध्ये ‘स्टेट ऑफ फोकस’ म्हणून झारखंड या राज्याची निवड करण्यात आली असून महोत्सवाचा भाग म्हणून २४ नोव्हेंबरला झारखंड दिन साजरा करण्यात येणार आहे.
  • झारखंड पॅकेजमधील चित्रपटांमध्ये एम एस धोनी-द अनटोल्ड स्टोरी, डेथ इन गंज, रांची डायरी, बेगम जान यांचा समावेश आहे.
भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव
  • इंग्रजी: इंडियन इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल (इफ्फी)
  • या चित्रपट महोत्सवाचे आयोजन केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्रालय, चित्रपट महोत्सव संचालनालय आणि गोवा सरकारद्वारे केले जाते.
  • भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाची स्थापना १९५२मध्ये झाली. तेव्हापासून प्रतिवर्षी गोव्यामध्ये हा चित्रपट महोत्सव आयोजित केला जात आहे.
  • या चित्रपट महोत्सवाद्वारे चित्रपट क्षेत्राला जगभरात आपली चित्रपट कला प्रदर्शित करण्याची संधी प्राप्त होते.

अनिल नायक: एनएसडीसीचे नवे अध्यक्ष

  • केंद्र सरकारने अनिल मणिभाई नायक यांची राष्ट्रीय कौशल्य विकास महामंडळ (एनएसडीसी) अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. ते सध्या लार्सन अँड टुब्रो ग्रुपचे अध्यक्ष आहेत.
  • २००९मध्ये देशाच्या आर्थिक विकासासाठी त्यांच्या योगदानांसाठी त्यांना पद्मभूषण पुरस्कार देऊन गौरवण्यात आले होते.
राष्ट्रीय कौशल्य विकास महामंडळ (एनएसडीसी)
  • एनएसडीसी ही भारतातील पहिली आणि एकमेव संस्था आहे जिचा मूलभूत उद्देश कौशल्य विकास आहे..
  • एनएसडीसी सार्वजनिक-खाजगी भागीदारी अंतर्गत विना-नफा कंपनी आहे. केंद्रीय कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्रालयाअंतर्गत ही कंपनी कार्य करते. या कंपनीची स्थापना २००८मध्ये विना-नफा संस्था म्हणून झाली.
  • विविध क्षेत्रामध्ये कुशल मनुष्यबळ उपलब्ध करून देण्याचे कार्य ही कंपनी करते. एनएसडीसीमध्ये ४९ टक्के हिस्सा केंद्र सरकारचा असून, उर्वरित ५१ टक्के हिस्सा खाजगी क्षेत्रातील कंपन्यांकडे आहे.
  • एनएसडीसीचा उद्देश देशातील युवकांना कौशल्य प्रदान करणे आहे. या कंपनीचे २०२२पर्यंत १५० दशलक्ष लोकांना प्रशिक्षित करण्याचे लक्ष्य आहे.

अर्जेंटीनामध्ये जी-२० परिषदेचे आयोजन

  • अर्जेंटीनाची राजधानी बुएनोस एरेस येथे ३० नोव्हेंबर ते १ डिसेंबर दरम्यान जी-२० परिषद २०१८चे आयोजन करण्यात आले. ही दक्षिण अमेरिकेतील जी-२० देशांचे पहिलेच शिखर संमेलन आहे.
  • ही जी-२० गटाची १३वी बैठक आहे. यावर्षी जी-२० परिषदेचे अध्यक्ष अर्जेंटीनाचे राष्ट्रपती मौरिसियो मक्री आहेत.
  • चिली, जमैका, नेदरलँड, पापुआ न्यू गिनी, रवांडा, सिंगापूर आणि स्पेन यांनाही या परिषदेमध्ये आमंत्रित करण्यात आले आहे. या बैठकीत भारताचे प्रतिनिधित्व पंतप्रधान नरेंद्र मोदी करतील.
जी-२०
  • जी-२० हा जगातील २० प्रमुख देशांच्या अर्थमंत्री व मध्यवर्ती बँकेच्या गव्हर्नरांचा एक गट आहे. वास्तविकपणे या गटात १९ देश व युरोपियन युनियनचा सहभाग आहे.
  • युरोपीय युनियनचे अध्यक्ष व युरोपीय मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष युरोपियन संघाचे जी-२० मध्ये प्रतिनिधित्व करतात.
  • जी-२० सदस्य देशांचा एकत्रित जीडीपी जगाच्या ८५ टक्के आहे व हे २० देश एकूण जागतिक व्यापाराच्या ८५ टक्के व्यापारासाठी कारणीभूत आहेत.
  • जी-२०ची स्थापना २६ सप्टेंबर १९९९ रोजी झाली. या गटाचा उद्देश त्याच्या सदस्य राष्ट्रांना जागतिक अर्थव्यवस्थेच्या समस्यांवर चर्चा करण्यासाठी एकत्र करणे आहे.
  • जी-२०चे सदस्य: भारत, अर्जेटिना, ऑस्ट्रेलिया, ब्राझिल, कॅनडा, चीन, फ्रान्स, जर्मनी, इंडोनेशिया, इटली, जपान, मेक्सिको, रशिया, सौदी अरेबिया, दक्षिण आफ्रिका, दक्षिण कोरिया, तुर्की, युनायटेड किंग्डम, अमेरिका आणि युरोपियन युनियन

एनपीसीसीला मिनीरत्न श्रेणी-१ दर्जा प्रदान

  • केंद्र सरकारने नॅशनल प्रोजेक्ट्स कंस्ट्रक्शन कॉर्पोरेशन लिमिटेडला (एनपीसीसी) मिनीरत्न श्रेणी-१ हा दर्जा प्रदान केला.
  • हा दर्जा मिळाल्यामुळ कंपनीचे सशक्तीकरण होईल आणि निर्णयप्रक्रियाही जलद होण्यास मदत मिळेल.
  • एनपीसीसी ही जल संसाधन मंत्रालयाच्या प्रशासकीय नियंत्रणाखाली अनुसूची ‘बी’मधील केंद्रीय सार्वजनिक क्षेत्रातील कंपनी आहे. तिची स्थापना १९५७मध्ये झाली होती.
  • या कंपनी देशाच्या आर्थिक विकासासाठी पायाभूत सुविधा विकासाच्या क्षेत्रात कार्य करते. या कंपनीला ISO ९००१:२०१५ प्रमाणन प्राप्त आहे. २००९-१०पासून एनपीसीसी सतत नफ्यामध्ये आहे.
  • महत्वाच्या राष्ट्रीय प्रकल्पांच्या निर्मितीसाठी आवश्यक मनुष्यबळ आणि तंत्रज्ञान उपलब्ध करून देणे आणि खाजगी क्षेत्रासाठी किंमत नियंत्रक म्हणून आपली भूमिका पार पाडणे, हे या कंपनीचे उद्दिष्ट आहे.
पार्श्वभूमी
  • केंद्रीय अवजड आणि सार्वजनिक उद्योग मंत्रालयाच्या अंतर्गत सार्वजनिक उद्योग विभागाद्वारे सार्वजनिक क्षेत्रातील कंपन्यांना महारत्न, नवरत्न आणि मिनीरत्न दर्जा देण्यात येतो.
  • हा दर्जा या सार्वजनिक कंपन्यांनी मिळविलेल्या नफ्याच्या आधारावर देण्यात येतो.
  • या दर्जासह संबंधित कंपन्यांपैकी अधिक आर्थिक आणि प्रशासकीय अधिकार देखील प्रदान केले जातात.
  • सध्या देशात ८ महारत्न, १६ नवरत्न, ६० मिनिरत्न श्रेणी-१ आणि १५ मिनीरत्न श्रेणी-२ कंपन्या आहेत.
  • ८ महारत्न कंपन्या: भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेड (भेल), कोल इंडिया लिमिटेड, गॅस अथोरिटी ऑफ इंडिया लिमिटेड (गेल), इंडियन ऑयल कारपोरेशन लिमिटेड, एनटीपीसी लिमिटेड, ऑयल अँड नॅच्युराळ गॅस कारपोरेशन लिमिटेड, भारतीय इस्पात प्राधिकरण लिमिटेड आणि भारत पेट्रोलियम कारपोरेशन लिमिटेड.
  • १६ नवरत्न कंपन्या: भारत इलेक्ट्रानिक्स लिमिटेड, भारतीय कंटेनर निगम लिमिटेड, इंजीनियर्स इंडिया लिमिटेड, हिंदुस्तान एयरोनॉटिक्स लिमिटेड, भारतीय पेट्रोलियम निगम लिमिटेड, महानगर टेलीफोन निगम लिमिटेड, राष्ट्रीय अल्युमीनियम कं. लिमिटेड, राष्ट्रीय भवन निर्माण निगम लिमिटेड, एनएमडीसी लिमिटेड, नेवेली लिग्नाइट कॉर्पो. लिमिटेड, ऑयल इंडिया लिमिटेड, पावर फायनांस कॉर्पो. लिमिटेड, पावर ग्रिड कॉर्पो. ऑफ इंडिया लिमिटेड, राष्ट्रीय इस्पात निगम लिमिटेड, ग्रामीण विद्युतीकरण निगम लिमिटेड आणि भारतीय नौवहन निगम लिमिटेड.

दक्षिण आशिया प्रादेशिक युवा शांती संमेलन

  • अलीकडेच, महात्मा गांधींच्या १५०व्या जयंतीच्या निमित्ताने नवी दिल्ली येथे ३ दिवसीय दक्षिण आशिया प्रादेशिक युवा शांती संमेलन आयोजित करण्यात आले.
  • गांधी स्मृती व दर्शन समिती, युनेस्को महात्मा गांधी शिक्षण, शांती व शाश्वत विकास संस्था (MGIEP) आणि STEP (Standing Together to Enable Peace) यांनी संयुक्तपणे या संमेलनाचे आयोजन केले होते.
  • या संमेलनाचे उद्घाटन महात्मा गांधी यांचे पणतू कृष्णा जी कुलकर्णी यांनी केले.
  • अफगाणिस्तान, बांगलादेश, मालदीव, भूतान, नेपाळ आणि श्रीलंका येथील प्रतिनिधींनी या संमेलनात भाग घेतला.
  • दक्षिण आशिया आणि भारताच्या वेगवेगळ्या भागांतील सुमारे १०० तरुण नेत्यांनी यात सहभाग घेतला आणि शांततेच्या विविध पैलूंवर चर्चा केली.
  • या परिषदेत अन्न सुरक्षा, धार्मिक सद्भावना, डिजिटल मीडिया, कला व लोकशाही या विषयांवर चर्चा केली गेली.
दक्षिण आशिया युवा शांती मंच
  • याचा उद्देश सर्व लहान-मोठ्या मुद्द्यांवर चर्चा करणे, आव्हाने चिन्हांकित करणे, कारवाई योजना तयार करणे व तरुण नेत्यांचे नेटवर्क तयार करणे हा आहे.
  • या फोरमद्वारे, तरुणांना शांतता, शिक्षण इत्यादींवर आधारावर कौशल्य प्रदान केले जाते.
  • दक्षिण आशियातील युवकांना या क्षेत्रात शांततेला चालना देण्यासाठी हा मंच उपलब्ध करून देण्यात आला आहे.

सलोम जुराबिश्विली: जॉर्जियाच्या पहिल्या महिला राष्ट्रपती

  • सलोम जुराबिश्विली या जॉर्जियाच्या पहिल्या महिला राष्ट्रपती बनल्या आहेत. याआधी त्या देशाच्या परराष्ट्र मंत्रीही होत्या.
  • सलोम जुराबिश्विली यांनी प्रतिस्पर्धी उमेदवार ग्रिगोल वाशाद्जे यांना पराभूत केले. जुरीशिश्विली यांना राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत ५९.५ टक्के मते मिळाली.
  • १६ डिसेंबर २०१८ रोजी सलोम जुराबीश्विली राष्ट्रपती पदाचा कार्यभार सांभाळणार आहेत.
सलोम जुराबिश्विली
  • जुराबीश्विली यांचा जन्म १८ मार्च १९५२ रोजी झाला. २० मार्च २००४ ते १९ ऑक्टोबर २००५ दरम्यान त्या जॉर्जियाच्या परराष्ट्र मंत्री होत्या.
  • नोव्हेंबर २०१० ते ऑक्टोबर २०१३ दरम्यान त्या संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या इराण प्रतिबंध समितीच्या सदस्या होत्या.
जॉर्जिया
  • जॉर्जिया हे यूरेशियामध्ये स्थित देश आहे. त्याचे क्षेत्रफळ ६९,७०० चौकिमी आहे. त्बिलिसी ही जॉर्जियाची राजधानी व सर्वात मोठे शहर आहे.
  • कॉकेशस भौगोलिक प्रदेशामध्ये वसलेल्या जॉर्जियाच्या उत्तरेला रशिया, दक्षिणेला तुर्कस्तान आणि आर्मेनिया, पूर्वेला व आग्नेय दिशेला अझरबैजान हे देश तर पश्चिमेला काळा समुद्र आहेत. 
  • जॉर्जियाने ९ एप्रिल १९९१ रोजी सोव्हिएत युनियनकडून स्वातंत्र्य मिळाल्याचे घोषित केले होते.

चालू घडामोडी : २९ नोव्हेंबर

मराठा आरक्षण विधेयक विधिमंडळात मंजूर

  • महाराष्ट्र विधानसभा आणि विधान परिषदेत मराठा आरक्षण विधेयक कोणत्याही चर्चेविना मंजूर करण्यात झाले. त्यामुळे मराठा समाजाला सरकारी नोकरी आणि शिक्षणात १६ टक्के आरक्षण मिळणार आहे.
  • न्या. एम. जी. गायकवाड यांच्या अध्यक्षतेखालील राज्य मागासवर्ग आयोगाच्या अहवालावरील कृती अहवाल विधानसभेत सादर करण्यात आला.
  • त्यांनतर मराठा समाजासाठी स्वतंत्र प्रवर्ग तयार करून १६ टक्के आरक्षणाची तरतूद करणारे विधेयक राज्य विधिमंडळात मंजूर करण्यात आले.
  • हे विधेयक मंजूर झाल्यामुळे राज्यातील आरक्षण टक्केवारी आता ६८ टक्के होणार आहे.
मराठा आरक्षण विधेयकातील महत्त्वाच्या तरतुदी
  • मराठा समाजाला १६ टक्के आरक्षण
  • अल्पसंख्याक शैक्षणिक संस्था वगळून इतर शैक्षणिक संस्था आणि अनुदानित अथवा विनाअनुदानित शैक्षणिक संस्थांमधील एकूण जागांच्या १६ टक्के आरक्षण.
  • राज्याच्या नियंत्रणाखालील लोकसेवांमधील आणि पदांवरील सरळसेवा प्रवेशाच्या एकूण नियुक्त्यांच्या १६ टक्के.
  • मात्र, केंद्रीय सेवांमध्ये मराठा समाजाला तूर्तास आरक्षण देण्यात येणार नाही.
मागासवर्ग आयोगाच्या अहवालातील आकडेवारी
  • एकूण मराठा समाजापैकी ७६.८६ टक्के मराठा कुटुंब हे उपजीविकेसाठी शेती आणि शेतमजुरी करतात.
  • सरकारी, निमसरकारी सेवेत मराठा समाजाचा हिस्सा केवळ ६ टक्के, त्यातही जादातर नोकऱ्या ड वर्गात
  • ७० टक्के मराठा कुटुंब हे कच्या घरात राहतात.
  • ३१.७९ टक्के कुटुंबाकडे अजून गॅस नाही.
  • ३५.३९ टक्के कुटुंबाकडे नळ जोडणी नाही.
  • मराठा समाजातील व्यक्तींपैकी १३.४२ टक्के निरक्षर.
  • ३५.३१ टक्के प्राथमिक शिक्षण घेतलेले.
  • ४३.७९ टक्के १० वी १२ वी शिक्षण घेतलेले.
  • ६.७१ टक्केच पदवीधर व पदव्युत्तर शिक्षण घेतलेले तांत्रिक व व्यावसायिक शिक्षण घेतलेल्याचे प्रमाण ०.७१ टक्के.
  • ९३ टक्के मराठा समाजाचे उत्पन्न १ लाखांच्यापेक्षा कमी.
  • मराठा समाजाची बीपीएल टक्केवारी २४.२ टक्के.
  • ७१ टक्के मराठा शेतकरी अल्पभूधारक.
या अहवालातील ३ प्रमुख शिफारसी
  • मराठा समाज सामाजिक व आर्थिकदृष्ट्या मागासलेला आहे आणि या समाजाला शासकीय, निमशासकीय नोकऱ्यांमध्ये पुरेसे प्रतिनिधित्व नाही.
  • मराठा सामाजाला सामाजिक आणि शैक्षणिक मागास म्हणून घोषित केल्यामुळे भारतीय संविधानाच्या कलम १५(४) व १६(४) मधील तरतुदीनुसार हा समाज आरक्षणाचे लाभ घेण्यासाठी पात्र ठरतो.
  • एकूण आरक्षण ५० टक्क्यांपेक्षा अधिक होत असल्यास, सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार असाधारण व अपवादात्मक परिस्थितीचा निकष मराठा समाजाला लागू होतो.
महाराष्ट्रात आरक्षणाची सद्यस्थिती
  • अनुसूचित जमाती (ST) - ७ टक्के
  • अनुसूचित जाती (SC) - १३ टक्के
  • इतर मागासवर्गीय (OBC) - १९ टक्के
  • भटक्या जमाती (NT) - ११ टक्के
  • विशेष मागास वर्ग (SBC) - २ टक्के

लॉजिक्‍स इंडिया २०१९च्या लोगोचे अनावरण

  • केंद्रीय वाणिज्य व उद्योग आणि नागरी उड्डाण मंत्री सुरेश प्रभु यांनी २८ नोव्हेंबर रोजी नवी दिल्ली येथे लॉजिक्‍स इंडिया २०१९चा लोगो आणि माहिती पुस्तिकेचे अनावरण केले.
  • लॉजिक्‍स इंडिया २०१९चे आयोजन नवी दिल्ली येथे ३१ जानेवारी ते २ फेब्रुवारी २०१९ दरम्यान भारतीय निर्यात संघटनेद्वारे (एफआयईओ) केले जाणार आहे. या कार्यक्रमात २० देश सहभागी होतील.
  • लॉजिक्‍स इंडिया २०१९चा उद्देश: जागतिक व्यापारासाठी लॉजिस्टिक्सचा खर्च कमी करणे व परिचालन सामर्थ्य सुधारणे. यामुळे मालवाहतूक खर्च कमी करण्यात मदत होईल.
  • इतर व्यावसायिक क्षेत्रांवर अवलंबून असलेल्या वस्तूंचा कुशल आणि किफायतशीर प्रवाह सुनिश्चित करण्यासाठी लॉजिक्स इंडिया उपयोगी ठरेल.
लक्षात ठेवण्यासारखे मुद्दे
  • जागतिक बँकेच्या विश्व लॉजिस्टिक्स प्रदर्शन निर्देशांक २०१८मध्ये भारत ४४व्या स्थानावर आहे.
  • आर्थिक पाहणी २०१७-१८नुसार भारताच्या लॉजिस्टिक्स उद्योगाचा आकार १६० अब्ज अमेरिकन डॉलर आहे.
  • पुढील २ वर्षात भारताच्या लॉजिस्टिक्स उद्योग २१५ अब्ज डॉलरच्या अमेरिकेच्या लॉजिस्टिक्स उद्योगाला मागे टाकू शकतो.
  • लॉजिस्टिक्स क्षेत्र २२ दशलक्षांहून अधिक लोकांना रोजगार प्रदान करतो आणि पुढील ५ वर्षात हे क्षेत्र १०.५ टक्के दराने वाढण्याची अपेक्षा आहे.
आवश्यकता का?
  • भारतात इतर विकसित देशांच्या तुलनेत लॉजिस्टिक्सवरील (व्यावसायिक वस्तूंची वाहतूक) खर्च लक्षणीय आहे.
  • लॉजिस्टिक्सचा खर्च अधिक असल्यामुळे देशांतर्गत आणि विदेशी बाजारात भारतीय वस्तू अधिक महाग होतात, परिणामी ते इतर देशांच्या उत्पादनांबरोबर स्पर्धा करू शकत नाहीत.

कोकण-१८: भारत-ब्रिटन संयुक्त नौदल सराव

  • भारत आणि इंग्लंडच्या नौदलांचा संयुक्त सराव कोंकण-१८ २८ नोव्हेंबर रोजी गोव्याच्या किनाऱ्यावर सुरु झाला.
  • हा सराव ६ डिसेंबर २०१८पर्यंत चालणार आहे. यात दोन्ही देशांच्या नौदल तुकड्यांनी सहभाग घेतला आहे.
  • या सरावात इंग्लंडच्या रॉयल नेव्हीचे प्रतिनिधीत्व एचएमएस ड्रॅगन ही विनाशकारी युद्धनौका आणि वाइल्डकॅट हेलीकॉप्टर करणार आहे.
  • तर भारतीय नौदलाचे प्रतिनिधीत्व भारताची अत्याधुनिक विनाशिका युद्धनौका आयएनएस कोलकाता करत आहे.
  • त्याशिवाय समुद्रावर गस्त घालणारे नौदलाची विमाने सीकिंग आणि डॉर्नियर या युद्ध सरावात सहभागी झाले आहे.
  • या युद्ध सरावाचा उद्देश दोन्ही देशांच्या नौदलांचे तंत्रज्ञान आणि अनुभवांचा परस्परांना लाभ मिळवून देणे हा आहे.
  • या सरावात समुद्र आणि बंदरांवर वेळोवेळी नौदल क्षमता जातील. तसेच युद्ध कौशल्य आणि सागरी कारवाई, पाणबुडी वापरण्याचे तंत्रज्ञान याची परस्परांना देवाण-घेवाण होणार आहे.
  • भारत आणि ब्रिटन यांच्यातल्या प्रदीर्घ राजकीय संबंधांवर हा संयुक्त सराव आधारलेला आहे.
  • द्विपक्षीय युद्ध सराव कोकणची सुरुवात २००४मध्ये झाली. या युद्ध अभ्यासामुळे दोन्ही देशांच्या नौदालांना बंदरावरील आंतर-कार्यक्षमता विकसित करण्याची आणि अनुभवांचे आदान-प्रदान करण्याची संधी मिळते.

कोप इंडिया २०१९: भारत-अमेरिका हवाई युद्ध अभ्यास

  • भारत आणि अमेरिकेच्या वायुसेनेदरम्यान कोप इंडिया २०१९ हा हवाई युद्ध अभ्यास पश्चिम बंगालमध्ये ३ ते १४ डिसेंबर दरम्यान आयोजित केला जाणार आहे.
  • हा द्विपक्षीय उड्डाण कार्यक्रम एअरबेस कलाईकुंडा आणि अर्जुन सिंह या पश्चिम बंगालमधीलच्या २ महत्त्वाच्या हवाई तळांवर आयोजित केला जाईल.
  • कोप इंडिया २०१९ या अभ्यासाचा उद्देश: दोन्ही देशांच्या वायुदलाच्या दरम्यान परस्पर सहकार्याला चालना देणे आणि कौशल्यांची देवाणघेवाण करणे.
  • या अभ्यासात, अमेरिकेचे २०० वायुसैनिक १५ विमानांसह सहभागी होतील.
कोप इंडिया
  • हा आंतरराष्ट्रीय हवाई दल युद्ध अभ्यास आहे. याचे आयोजन भारतामध्ये भारतीय आणि अमेरिकन हवाई दलांदरम्यान केले जाते.
  • पहिल्यांदा हा युद्ध अभ्यास फेब्रुवारी २००४मध्ये ग्वाल्हेर येथे आयोजित करण्यात आला होता. यानंतर २००५, २००६ आणि २००९मध्ये या सरावाचे आयोजन करण्यात आले आहे.

इफ्फी २०१८चा समारोप

  • ४९व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव ‘इफ्फी २०१८’चा गोव्याची राजधानी पणजीमधील श्यामाप्रसाद मुखर्जी स्टेडीयममध्ये २८ नोव्हेंबर रोजी समारोप झाला.
  • यावर्षी इफ्फीची मुख्य संकल्पना ‘न्यू इंडिया’ होती. या महोत्सवात खेळ, इतिहास, अॅक्शन यांसारख्या विविध श्रेणींमधील चित्रपट दाखविण्यात आले.
  • ४९व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचा इस्रायल हा भागीदार देश होता. तर यावर्षी झारखंड हे विशेष राज्य म्हणून निश्चित करण्यात आले होते.
  • या चित्रपट महोत्सवात ६८ देशांचे २१२ चित्रपट प्रदर्शित करण्यात आले. इंडियन पॅनोरमा विभागांतर्गत २६ फिचर (कथाधारित) आणि २१ नॉन-फीचर (कथाबाह्य) चित्रपट दाखवण्यात आले.
  • या चित्रपट महोत्सवात शशी कपूर, श्रीदेवी, एम. करुणानिधी व कल्पना लाजमी या हिंदी चित्रपट क्षेत्रातील दिवंगत व्यक्तींना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
  • सुवर्णमयूर, रौप्यमयूर, जीवनगौरव पुरस्कार आणि इंडियन पर्सनॅलिटी ऑफ द इयर पुरस्‍कार या महोत्सवात प्रदान करण्यात आले.
पुरस्कारविजेते
  • चित्रपट क्षेत्रातल्या अमूल्य योगदानाबद्दल सलीम खान यांना इफ्फी विशेष पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. त्यांना पुरस्करस्वरूप १० लाख रुपये, प्रमाणपत्र आणि शाल प्रदान करण्यात आली.
  • इस्राएलचे चित्रपट निर्माता डेन वोलमन यांना जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
  • सर्गेई लोझनित्सा दिग्दर्शित युक्रेनियन चित्रपट ‘डॉनबास’ला इफ्फी २०१८चा सर्वोत्कृष्ट चित्रपट सन्मान (सुवर्ण मयूर) प्राप्त झाला. सुवर्ण मयूर, मानपत्र आणि ४० लाख रुपये असे या पुरस्काराचे स्वरुप आहे.
  • ‘इ मा योव्ह’ या चित्रपटासाठी लिजो जोस पेलिस्सरी यांना सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक म्हणून १५ लाख रुपये आणि रौप्य मयूर देऊन सन्मानित करण्यात आले.
  • ॲनास्ताशिया पुश्‍तोवित यांना ‘व्हेन द ट्रीज फॉल’ या युक्रेनियन चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्री पुरस्काराने गौरवण्यात आले.
  • चेंबन विनोद या ‘इ मा योव्ह’ चित्रपटासाठी पुरस्कार प्रदान करण्यात आला.
  • प्रत्येकी १० लाख रुपये व रौप्य मयूर पुरस्काराने सर्वोत्कृष्ट अभिनेता आणि अभिनेत्रीला गौरवण्यात आले.
  • ‘अगा’ या याकूत चित्रपटासाठी मिल्को लाझारोव्ह यांना विशेष ज्युरी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. १५ लाख रुपये आणि रौप्य मयूर असे या पुरस्काराचे स्वरुप आहे.
  • ‘रेस्पेटो’ या फिलिपिनो चित्रपटासाठी अल्बेर्टो मॉन्टेरस द्वितीय यांना फिचर फिल्मसाठीचा उत्तम दिग्दर्शक पदार्पणासाठीचा शताब्दी पुरस्कार प्रदान करण्यात आला.
  • प्रवीण मोरछले दिग्दर्शित ‘वॉकिंग विथ द विंड’ या लडाखी चित्रपटाला आयसीएफटी युनेस्को गांधी पदकाने सन्मानित करण्यात आले.
  • पॅरिस इथल्या इंटरनॅशनल कौन्सिल फॉर फिल्म, टेलिव्हिजन ॲण्ड ऑडिओ व्हिज्युअल कम्युनिकेशन आणि युनेस्को यांच्या वतीने हा पुरस्कार देण्यात येतो.
  • शांतता आणि सलोखा ही गांधीवादी मूल्ये मांडणाऱ्या चित्रपटाला हा सन्मान प्रदान करण्यात येतो.
कंट्री आणि स्टेट ऑफ फोकस
  • एखाद्या देशातल्या सर्वोत्कृष्ट कलाकृती आणि त्या देशाचे योगदान दर्शवणाऱ्या चित्रपटांचा ‘कंट्री ऑफ फोकस’मध्ये समावेश केला जातो.
  • ४९व्या इफ्फीमध्ये इस्रायल हा देश कंट्री ऑफ फोकस राहणार आहे. इस्रायलच्या वाणिज्य दुतावासाच्या सहकार्याने १० चित्रपटांना कंट्री फोकस पॅकेजसाठी निवडले आहेत.
  • इफ्फीमध्ये भारताच्या एका राज्यावर व त्यातल्या कला आणि संस्कृतीवर प्रकाश टाकणाऱ्या चित्रपटांचा ‘स्टेट ऑफ फोकस’मध्ये प्रथमच समावेश केला आहे.
  • ४९व्या इफ्फी २०१८मध्ये ‘स्टेट ऑफ फोकस’ म्हणून झारखंड या राज्याची निवड करण्यात आली असून महोत्सवाचा भाग म्हणून २४ नोव्हेंबरला झारखंड दिन साजरा करण्यात येणार आहे.
  • झारखंड पॅकेजमधील चित्रपटांमध्ये एम एस धोनी-द अनटोल्ड स्टोरी, डेथ इन गंज, रांची डायरी, बेगम जान यांचा समावेश आहे.
भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव
  • इंग्रजी: इंडियन इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल (इफ्फी)
  • या चित्रपट महोत्सवाचे आयोजन केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्रालय, चित्रपट महोत्सव संचालनालय आणि गोवा सरकारद्वारे केले जाते.
  • भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाची स्थापना १९५२मध्ये झाली. तेव्हापासून प्रतिवर्षी गोव्यामध्ये हा चित्रपट महोत्सव आयोजित केला जात आहे.
  • या चित्रपट महोत्सवाद्वारे चित्रपट क्षेत्राला जगभरात आपली चित्रपट कला प्रदर्शित करण्याची संधी प्राप्त होते.

अनिल नायक: एनएसडीसीचे नवे अध्यक्ष

  • केंद्र सरकारने अनिल मणिभाई नायक यांची राष्ट्रीय कौशल्य विकास महामंडळ (एनएसडीसी) अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. ते सध्या लार्सन अँड टुब्रो ग्रुपचे अध्यक्ष आहेत.
  • २००९मध्ये देशाच्या आर्थिक विकासासाठी त्यांच्या योगदानांसाठी त्यांना पद्मभूषण पुरस्कार देऊन गौरवण्यात आले होते.
राष्ट्रीय कौशल्य विकास महामंडळ (एनएसडीसी)
  • एनएसडीसी ही भारतातील पहिली आणि एकमेव संस्था आहे जिचा मूलभूत उद्देश कौशल्य विकास आहे..
  • एनएसडीसी सार्वजनिक-खाजगी भागीदारी अंतर्गत विना-नफा कंपनी आहे. केंद्रीय कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्रालयाअंतर्गत ही कंपनी कार्य करते. या कंपनीची स्थापना २००८मध्ये विना-नफा संस्था म्हणून झाली.
  • विविध क्षेत्रामध्ये कुशल मनुष्यबळ उपलब्ध करून देण्याचे कार्य ही कंपनी करते. एनएसडीसीमध्ये ४९ टक्के हिस्सा केंद्र सरकारचा असून, उर्वरित ५१ टक्के हिस्सा खाजगी क्षेत्रातील कंपन्यांकडे आहे.
  • एनएसडीसीचा उद्देश देशातील युवकांना कौशल्य प्रदान करणे आहे. या कंपनीचे २०२२पर्यंत १५० दशलक्ष लोकांना प्रशिक्षित करण्याचे लक्ष्य आहे.

अर्जेंटीनामध्ये जी-२० परिषदेचे आयोजन

  • अर्जेंटीनाची राजधानी बुएनोस एरेस येथे ३० नोव्हेंबर ते १ डिसेंबर दरम्यान जी-२० परिषद २०१८चे आयोजन करण्यात आले. ही दक्षिण अमेरिकेतील जी-२० देशांचे पहिलेच शिखर संमेलन आहे.
  • ही जी-२० गटाची १३वी बैठक आहे. यावर्षी जी-२० परिषदेचे अध्यक्ष अर्जेंटीनाचे राष्ट्रपती मौरिसियो मक्री आहेत.
  • चिली, जमैका, नेदरलँड, पापुआ न्यू गिनी, रवांडा, सिंगापूर आणि स्पेन यांनाही या परिषदेमध्ये आमंत्रित करण्यात आले आहे. या बैठकीत भारताचे प्रतिनिधित्व पंतप्रधान नरेंद्र मोदी करतील.
जी-२०
  • जी-२० हा जगातील २० प्रमुख देशांच्या अर्थमंत्री व मध्यवर्ती बँकेच्या गव्हर्नरांचा एक गट आहे. वास्तविकपणे या गटात १९ देश व युरोपियन युनियनचा सहभाग आहे.
  • युरोपीय युनियनचे अध्यक्ष व युरोपीय मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष युरोपियन संघाचे जी-२० मध्ये प्रतिनिधित्व करतात.
  • जी-२० सदस्य देशांचा एकत्रित जीडीपी जगाच्या ८५ टक्के आहे व हे २० देश एकूण जागतिक व्यापाराच्या ८५ टक्के व्यापारासाठी कारणीभूत आहेत.
  • जी-२०ची स्थापना २६ सप्टेंबर १९९९ रोजी झाली. या गटाचा उद्देश त्याच्या सदस्य राष्ट्रांना जागतिक अर्थव्यवस्थेच्या समस्यांवर चर्चा करण्यासाठी एकत्र करणे आहे.
  • जी-२०चे सदस्य: भारत, अर्जेटिना, ऑस्ट्रेलिया, ब्राझिल, कॅनडा, चीन, फ्रान्स, जर्मनी, इंडोनेशिया, इटली, जपान, मेक्सिको, रशिया, सौदी अरेबिया, दक्षिण आफ्रिका, दक्षिण कोरिया, तुर्की, युनायटेड किंग्डम, अमेरिका आणि युरोपियन युनियन

एनपीसीसीला मिनीरत्न श्रेणी-१ दर्जा प्रदान

  • केंद्र सरकारने नॅशनल प्रोजेक्ट्स कंस्ट्रक्शन कॉर्पोरेशन लिमिटेडला (एनपीसीसी) मिनीरत्न श्रेणी-१ हा दर्जा प्रदान केला.
  • हा दर्जा मिळाल्यामुळ कंपनीचे सशक्तीकरण होईल आणि निर्णयप्रक्रियाही जलद होण्यास मदत मिळेल.
  • एनपीसीसी ही जल संसाधन मंत्रालयाच्या प्रशासकीय नियंत्रणाखाली अनुसूची ‘बी’मधील केंद्रीय सार्वजनिक क्षेत्रातील कंपनी आहे. तिची स्थापना १९५७मध्ये झाली होती.
  • या कंपनी देशाच्या आर्थिक विकासासाठी पायाभूत सुविधा विकासाच्या क्षेत्रात कार्य करते. या कंपनीला ISO ९००१:२०१५ प्रमाणन प्राप्त आहे. २००९-१०पासून एनपीसीसी सतत नफ्यामध्ये आहे.
  • महत्वाच्या राष्ट्रीय प्रकल्पांच्या निर्मितीसाठी आवश्यक मनुष्यबळ आणि तंत्रज्ञान उपलब्ध करून देणे आणि खाजगी क्षेत्रासाठी किंमत नियंत्रक म्हणून आपली भूमिका पार पाडणे, हे या कंपनीचे उद्दिष्ट आहे.
पार्श्वभूमी
  • केंद्रीय अवजड आणि सार्वजनिक उद्योग मंत्रालयाच्या अंतर्गत सार्वजनिक उद्योग विभागाद्वारे सार्वजनिक क्षेत्रातील कंपन्यांना महारत्न, नवरत्न आणि मिनीरत्न दर्जा देण्यात येतो.
  • हा दर्जा या सार्वजनिक कंपन्यांनी मिळविलेल्या नफ्याच्या आधारावर देण्यात येतो.
  • या दर्जासह संबंधित कंपन्यांपैकी अधिक आर्थिक आणि प्रशासकीय अधिकार देखील प्रदान केले जातात.
  • सध्या देशात ८ महारत्न, १६ नवरत्न, ६० मिनिरत्न श्रेणी-१ आणि १५ मिनीरत्न श्रेणी-२ कंपन्या आहेत.
  • ८ महारत्न कंपन्या: भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेड (भेल), कोल इंडिया लिमिटेड, गॅस अथोरिटी ऑफ इंडिया लिमिटेड (गेल), इंडियन ऑयल कारपोरेशन लिमिटेड, एनटीपीसी लिमिटेड, ऑयल अँड नॅच्युराळ गॅस कारपोरेशन लिमिटेड, भारतीय इस्पात प्राधिकरण लिमिटेड आणि भारत पेट्रोलियम कारपोरेशन लिमिटेड.
  • १६ नवरत्न कंपन्या: भारत इलेक्ट्रानिक्स लिमिटेड, भारतीय कंटेनर निगम लिमिटेड, इंजीनियर्स इंडिया लिमिटेड, हिंदुस्तान एयरोनॉटिक्स लिमिटेड, भारतीय पेट्रोलियम निगम लिमिटेड, महानगर टेलीफोन निगम लिमिटेड, राष्ट्रीय अल्युमीनियम कं. लिमिटेड, राष्ट्रीय भवन निर्माण निगम लिमिटेड, एनएमडीसी लिमिटेड, नेवेली लिग्नाइट कॉर्पो. लिमिटेड, ऑयल इंडिया लिमिटेड, पावर फायनांस कॉर्पो. लिमिटेड, पावर ग्रिड कॉर्पो. ऑफ इंडिया लिमिटेड, राष्ट्रीय इस्पात निगम लिमिटेड, ग्रामीण विद्युतीकरण निगम लिमिटेड आणि भारतीय नौवहन निगम लिमिटेड.

दक्षिण आशिया प्रादेशिक युवा शांती संमेलन

  • अलीकडेच, महात्मा गांधींच्या १५०व्या जयंतीच्या निमित्ताने नवी दिल्ली येथे ३ दिवसीय दक्षिण आशिया प्रादेशिक युवा शांती संमेलन आयोजित करण्यात आले.
  • गांधी स्मृती व दर्शन समिती, युनेस्को महात्मा गांधी शिक्षण, शांती व शाश्वत विकास संस्था (MGIEP) आणि STEP (Standing Together to Enable Peace) यांनी संयुक्तपणे या संमेलनाचे आयोजन केले होते.
  • या संमेलनाचे उद्घाटन महात्मा गांधी यांचे पणतू कृष्णा जी कुलकर्णी यांनी केले.
  • अफगाणिस्तान, बांगलादेश, मालदीव, भूतान, नेपाळ आणि श्रीलंका येथील प्रतिनिधींनी या संमेलनात भाग घेतला.
  • दक्षिण आशिया आणि भारताच्या वेगवेगळ्या भागांतील सुमारे १०० तरुण नेत्यांनी यात सहभाग घेतला आणि शांततेच्या विविध पैलूंवर चर्चा केली.
  • या परिषदेत अन्न सुरक्षा, धार्मिक सद्भावना, डिजिटल मीडिया, कला व लोकशाही या विषयांवर चर्चा केली गेली.
दक्षिण आशिया युवा शांती मंच
  • याचा उद्देश सर्व लहान-मोठ्या मुद्द्यांवर चर्चा करणे, आव्हाने चिन्हांकित करणे, कारवाई योजना तयार करणे व तरुण नेत्यांचे नेटवर्क तयार करणे हा आहे.
  • या फोरमद्वारे, तरुणांना शांतता, शिक्षण इत्यादींवर आधारावर कौशल्य प्रदान केले जाते.
  • दक्षिण आशियातील युवकांना या क्षेत्रात शांततेला चालना देण्यासाठी हा मंच उपलब्ध करून देण्यात आला आहे.

सलोम जुराबिश्विली: जॉर्जियाच्या पहिल्या महिला राष्ट्रपती

  • सलोम जुराबिश्विली या जॉर्जियाच्या पहिल्या महिला राष्ट्रपती बनल्या आहेत. याआधी त्या देशाच्या परराष्ट्र मंत्रीही होत्या.
  • सलोम जुराबिश्विली यांनी प्रतिस्पर्धी उमेदवार ग्रिगोल वाशाद्जे यांना पराभूत केले. जुरीशिश्विली यांना राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत ५९.५ टक्के मते मिळाली.
  • १६ डिसेंबर २०१८ रोजी सलोम जुराबीश्विली राष्ट्रपती पदाचा कार्यभार सांभाळणार आहेत.
सलोम जुराबिश्विली
  • जुराबीश्विली यांचा जन्म १८ मार्च १९५२ रोजी झाला. २० मार्च २००४ ते १९ ऑक्टोबर २००५ दरम्यान त्या जॉर्जियाच्या परराष्ट्र मंत्री होत्या.
  • नोव्हेंबर २०१० ते ऑक्टोबर २०१३ दरम्यान त्या संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या इराण प्रतिबंध समितीच्या सदस्या होत्या.
जॉर्जिया
  • जॉर्जिया हे यूरेशियामध्ये स्थित देश आहे. त्याचे क्षेत्रफळ ६९,७०० चौकिमी आहे. त्बिलिसी ही जॉर्जियाची राजधानी व सर्वात मोठे शहर आहे.
  • कॉकेशस भौगोलिक प्रदेशामध्ये वसलेल्या जॉर्जियाच्या उत्तरेला रशिया, दक्षिणेला तुर्कस्तान आणि आर्मेनिया, पूर्वेला व आग्नेय दिशेला अझरबैजान हे देश तर पश्चिमेला काळा समुद्र आहेत.
  • जॉर्जियाने ९ एप्रिल १९९१ रोजी सोव्हिएत युनियनकडून स्वातंत्र्य मिळाल्याचे घोषित केले होते.

चालू घडामोडी : २८ नोव्हेंबर

मिशन रक्षा ज्ञान शक्ति

  • केंद्रीय संरक्षण मंत्री निर्मला सीतारामन यांनी अलीकडेच नवी दिल्ली येथे ‘मिशन रक्षा ज्ञान शक्ति’ सुरु केले.
  • या अभियानाचा मुख्य उद्देश स्वदेशी संरक्षण निर्मिती क्षेत्रात बौद्धिक संपदा अधिकार संस्कृतीला प्रोत्साहन देणे आहे.
  • या अभियानाची सुरुवात संरक्षण उत्पादन विभागाद्वारे करण्यात आली आहे. संरक्षण निर्मितीच्या क्षेत्रामध्ये देशाला स्वयंपूर्ण बनविणे हा त्यामागील उद्देश आहे. 
  • या अभियानाच्या समन्वय आणि अंमलबजावणीची जबाबदारी गुणवत्ता आश्वासन महासंचालकांना देण्यात आली आहे.
  • पार्श्वभूमी
  • बौद्धिक संपदा अधिकारांमुळे नवकल्पनांना चालना मिळते. भारत नेहमी ज्ञानाचे केंद्र राहिला आहे. परंतु संशोधनांना सुरक्षित करण्यासाठी आवश्यक माहितीच्या अभावामुळे देशातील नवकल्पना आणि ज्ञानाचा पूर्ण वापर होऊ शकत नाही.
  • त्यामुळे देशामध्ये बौद्धिक संपदा अधिकारांबद्दल जागरुकता पसरवणे अत्यंत आवश्यक आहे.
  • संरक्षण मंत्रालयाने एप्रिल २०१८मध्ये बौद्धिक संपदा समर्थन कक्षाची स्थापना केली होती, ज्याचा उद्देश ऑर्डीनन्स फॅक्टरी मंडळ आणि सार्वजनिक क्षेत्रातील संरक्षण युनिट्सच्या १० हजार कामगारांना प्रशिक्षित करणे आहे.

भारत-चीन दरम्यान दुहेरी करआकारणी टाळण्यासाठी करार

  • करचोरी आणि भ्रष्टाचार रोखण्यासाठी भारत आणि चीनने डीटीएए करारातील (डबल टॅक्सेशन अवॉईडन्स अॅग्रीमेंट) सुधारणांसाठीच्या सामंजस्य करारावर स्वाक्षरी केली आहे.
  • डीटीएए करारामध्ये केलेल्या सुधारणांमुळे, माहितीच्या आदान-प्रदान मानकांना आंतरराष्ट्रीय मानकांनुसार अद्ययावत करण्यात आले आहे.
  • माहितीच्या आदान-प्रदानामुळे भारत आणि चीन यांच्यातील कर चुकवण्याच्या घटना कमी होण्याची शक्यता आहे.
दुहेरी कर आकारणी
  • जेव्हा एखादी कंपनी अथवा व्यक्तीचे एकच उत्पन्न एकपेक्षा अधिक देशात करपात्र ठरते, अशा वेळी दुहेरी कर आकारणीची स्थिती निर्माण होते.
  • विविध देशांमधील कर आकारणीच्या विविध नियमांमुळे अशी स्थिती निर्माण होत असते.
  • दुहेरी कर आकारणीपासून मुक्ती मिळविण्यासाठी दोन देश ‘डबल टॅक्सेशन अवॉईडन्स अॅग्रीमेंट’ (डीटीएए) करार करतात.
  • याचा उपयोग कर चुकवेगिरी टाळण्यासाठी आणि दुहेरी कर आकारणीची समस्या सोडविण्यासाठी केला जातो.
  • आयकर कायदा १९६१च्या कलम ९०नुसार, दुहेरी कर आकारणी टाळण्यासाठी भारत कोणत्याही अन्य देशाबरोबर करार करू शकतो.

अखिलेश रंजन प्रत्यक्ष कर कायद्याशी संबंधित टास्क फोर्सचे संयोजक

  • केंद्रीय अर्थ मंत्रालयाने केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाचे सदस्य अखिलेश रंजन यांना नवीन प्रत्यक्ष कर कायदा तयार करण्यासाठी स्थापन केलेल्या टास्क फोर्सचे संयोजक म्हणून नियुक्त केले आहे.
  • ते अरविंद मोदी यांची जागा घेतील. अरविंद मोदी सप्टेंबर २०१८मध्ये सेवानिवृत्त झाले होते.
  • या टास्क फोर्सच्या इतर सदस्यांमध्ये कोणतेही बदल करण्यात आले नाहीत. अखिलेश रंजन सध्या केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाचे सदस्य म्हणून कार्यरत आहेत.
  • ही टास्क फोर्स नोव्हेंबर २०१७मध्ये स्थापन करण्यात आली. आयकर अधिनियम १९६१ आणि नवीन प्रत्यक्ष कर कायदा तयार करण्यासाठी या टास्क फोर्सची स्थापना करण्यात आली होती.
  • ही टास्क फोर्स विविध देशांमधील प्रत्यक्ष कर कायद्यांचा अभ्यास करेल आणि भारताच्या आवश्यकतेनुसार प्रत्यक्ष कर कायद्याचा मसुदा तयार करेल.
  • ही टास्क फोर्स २८ फेब्रुवारी २०१९ रोजी सरकारकडे आपला अहवाल सादर करणार आहे.

नागेश्वर राव गुंटूर अणुऊर्जा नियामक मंडळाचे अध्यक्ष

  • प्रसिद्ध शास्त्रज्ञ नागेश्वर राव गुंटूर यांना ३ वर्षांच्या कार्यकाळासाठी अणुऊर्जा नियामक मंडळाचे (एईआरबी) अध्यक्ष म्हणून नियुक्त करण्यात आले आहे.
  • सध्या नागेश्वर राव गुंटूर प्रोजेक्ट डिझाईन सेफ्टी कमिटी, प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिएक्टरचे अध्यक्ष आहेत.
  • त्याआधी त्यांनी न्यूक्लियर पॉवर कारपोरेशन ऑफ इंडिया लिमिटेडमध्येही काम केले होते.
अणुऊर्जा नियामक मंडळ
  • एईआरबी: ॲटॉमिक एनर्जी रेग्युलेटरी बोर्ड
  • एईआरबीची स्थापना नोव्हेंबर १९८३मध्ये झाली. अणुऊर्जा कायदा १९६२च्या कलम २७ नुसार राष्ट्रपतींनी या संस्थेची स्थापना केली आहे.
  • एईआरबीचे मुख्यालय मुंबईमध्ये आहे. एईआरबी देशातील अणुऊर्जा सुरक्षिततेशी संबंधित कार्य करते.
  • सध्या या मंडळामध्ये एक अध्यक्ष, एक पूर्णवेळ सदस्य, तीन अर्धवेळ सदस्य आणि एक सचिव आहे.

सरकारचा एकीकृत रोग नियंत्रण कार्यक्रम

  • केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने अलीकडेच एकीकृत रोग नियंत्रण कार्यक्रम सुरू केला आहे. हा कार्यक्रम ७ राज्यांमधील एकात्मिक आरोग्य माहिती मंचाचा विभाग आहे.
  • केंद्र सरकारद्वारे सार्वजनिक आरोग्यावर देखरेख ठेवण्यासाठी सुरु करण्यात आलेला हा अशाप्रकारचा पहिलाच कार्यक्रम आहे.
  • ही एक रियल टाईम, केस बेस्ड इलेक्ट्रॉनिक आरोग्य माहिती प्रणाली आहे, ज्यामध्ये महामारी टाळण्यासाठी जीआयएस टॅगिंगचा वापर केला जाईल. यामध्ये नवीन डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर केला जाईल.
  • याद्वारे एखाद्या मोठ्या महामारीची माहिती योग्य मिळू शकते आणि सार्वजनिक आरोग्याची सुरक्षा सुनिश्चित केली जाऊ शकते.
  • या कार्यक्रमाच्या चांगल्या अंमलबजावणीसाठी, ब्लॉक स्तरावर ३२ हजार, जिल्हा स्तरावर १३ हजार आणि राज्य पातळीवरील ९०० लोकांना प्रशिक्षित केले जाईल.
  • या कार्यक्रमाचे राज्यांद्वारे सामायिक केलेल्या माहितीच्या गुणवत्तेवर अवलंबून असेल.

२७ नोव्हेंबर: भारतीय अवयवदान दिन

  • २७ नोव्हेंबर हा दिवस देशभरात भारतीय अवयवदान दिन म्हणून साजरा केला जातो.
  • यावेळी ९व्या भारतीय अवयवदान दिनाच्या पार्श्वभूमीवर नवी दिल्लीमध्ये एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
  • या कार्यक्रमामध्ये अवयवदानाबद्दल जनजागृतीसाठी महाराष्ट्राला सर्वश्रेष्ठ राज्य घोषित करून, पुरस्कार प्रदान करण्यात आला.
  • या कार्यक्रमाचे आयोजन नॅशनल ऑर्गेन अँड टिशू ट्रान्सप्लंट ऑर्गनायझेशनने (NOTTO) केले होते.
  • जागतिक अवयवदान दिवस प्रतिवर्षी २३ ऑगस्टला साजरा केला जातो.

कुरुक्षेत्रमध्ये आंतरराष्ट्रीय गीता महोत्सवाचे आयोजन

  • हरियाणातील कुरुक्षेत्र येथे ७ ते २३ डिसेंबरदरम्यान आंतरराष्ट्रीय गीता महोत्सव आयोजित केला जमणार आहे. या कार्यक्रमाची ही तिसरी आवृत्ती आहे.
  • या कार्यक्रमासाठी मॉरीशसचा भागीदार देश आणि गुजरात भागीदार राज्य असेल. 
  • फेब्रुवारी २०१९मध्ये मॉरीशसमध्ये गीता महोत्सव आयोजित करण्यात येणार असून, भगवतगीतेचा संदेश जगामध्ये पसरविणे हा त्यामागील उद्देश आहे.
  • या कार्यक्रमात श्रीमद भगवतगीतेतील ज्ञानाच्या प्रसारावर चर्चा करण्यात येणार आहे.
  • भगवतगीतेमध्ये भगवान कृष्ण यांनी अर्जुनाला दिलेल्या ज्ञानाचे तपशीलवार वर्णन आहे. हे ज्ञान श्रीकृष्ण यांनी महाभारत युद्धापूर्वी कुरुक्षेत्रात दिले होते.
  • कुरुक्षेत्र विकास मंडळ, हरियाणा पर्यटन तसेच जिल्हा प्रशासन व माहिती आणि जल संपर्क विभाग संयुक्तपणे आंतर्राष्ट्रीय गीता महोत्सवाचे आयोजन करतात.
  • या कार्यक्रमामध्ये कुरुक्षेत्राच्या भिंतीवर २०० पेक्षा अधिक चित्रकार महाभारतच्या संकल्पनेवर आधारित चित्र काढतील. यामध्ये भारत, मॉरीशस, इंडोनेशिया, इराण, तुर्कमेनिस्तान आणि रशिया या देशातील कलाकार सहभागी होतील.

रिम्सकडून तितली चक्रीवादळ अतिदुर्लभ म्हणून घोषित

  • आफ्रिका आणि आशियामधील आपत्तीची पूर्वसूचना देणारी ४५ देशांची संस्था रिम्सने ऑक्टोबरमध्ये आलेले भयानक चक्रीवादळ ‘तितली’ला (Titli) अतिदुर्लभ म्हणून घोषित केले.
  • रिम्सच्या अहवालानुसार ओडीशाच्या किनाऱ्यावर येणाऱ्या चक्रीवादळांचा मागील २०० वर्षांचा इतिहास बघता तितली चक्रीवादळ आपल्या वैशिष्ट्यांच्या बाबतीत अतिदुर्लभ आहे.
  • यापूर्वी भारताच्या हवामानशास्त्र विभागाने तितलीच्या रचनेचा अतिदुर्लभ घटना म्हणून उल्लेख केला होता. या तीव्र वादळाने जमिनीवर आदळल्यानंतर आपली दिशा बदलली होती.
तितलीबद्दल
  • तितली हे भयानक चक्रीवादळ ऑक्टोबरमध्ये ओडिशा आणि आंध्रप्रदेशच्या किनाऱ्यावर आले होते. यामुळे दोन्ही राज्यांमध्ये मोठ्या प्रमाणात जीवित आणि वित्त हानी झाली होती.
  • अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरात अशा शक्तिशाली वादळांची निर्मिती फार दुर्लभ असते. या वादळाचे तितली हे नामकरण पाकिस्तानद्वारे करण्यात आले होते.
रीजनल इंटीग्रेटेड मल्टी-हॅजर्ड अर्ली वॉर्निंग सिस्टम (रिम्स)
  • RIMES: Regional Integrated Multi-Hazard Early Warning System
  • रिम्स ही ४५ देशांची आंतरराष्ट्रीय संस्था आहे, ही संस्था आपत्ती चेतावनींशी संबंधित आहे. ही संयुक्त राष्ट्रांच्या अंतर्गत एक नोंदणीकृत अंतर-सरकारी संस्था आहे.
  • या संस्थेची स्थापना २००९ साली करण्यात आली होती. यात आशिया-पॅसिफिक आणि आफ्रिकेतील देश समाविष्ट आहेत.
  • या संघटनेच्या निर्मितीची प्रक्रिया २००४ साली हिंदी महासागरात आलेल्या त्सुनामीनंतर सुरू झाली होती.

अणुऊर्जा साधनांचे उत्पादन करणारे महाराष्ट्र ठरणार पहिलेच राज्य

  • होलटेक इंटरनॅशनल कंपनीने महाराष्ट्रामध्ये अणुऊर्जा साधनांचा उत्पादन प्रकल्प उभारण्याची तयारी दर्शविली आहे. यामुळे अणुऊर्जा साधनांचे उत्पादन करणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य ठरणार आहे.
  • अणुऊर्जा प्रकल्पांमध्ये इंधन साठवणूक व ऊर्जा वहनासारख्या विविध उद्दिष्टांसाठी लागणाऱ्या उपकरणांसह इतर आवश्यक सामग्री पुरवठादारांमध्ये होलटेक इंटरनॅशनल अग्रणी कंपनी आहे.
  • कंपनीसोबत झालेल्या सामंजस्य करारानुसार, हा प्रकल्प उभारण्यासाठी महाराष्ट्रामध्ये कंपनीकडून ४,९०० कोटी रुपयांची (६८ कोटी डॉलर) गुंतवणूक होणे अपेक्षित आहे.
  • ऊर्जा आणि प्रक्रिया, एरोस्पेस, पेट्रोकेमिकल आणि इतर क्षेत्रातील कंपन्यांना संयंत्रांची निर्मिती करताना लागणाऱ्या अवजड सुटय़ा भागांची निर्मिती करण्यासाठी हा प्रकल्प उभारला जाणार आहे.
  • राज्य शासनाकडून प्रकल्प उभारणीसाठी लागणारी मंजुरी-परवानगी एक खिडकी योजनेतून सुलभरीत्या देण्यात येणार आहे.
  • होलटेक इंटरनॅशनल ही ऊर्जा तंत्रज्ञान क्षेत्रातील विशेषत: अणुऊर्जा क्षेत्राशी निगडित तज्ञ कंपनी आहे.
  • आजवर विविध ३५ देशातील २००हून अधिक अणुऊर्जा प्रकल्पांना या कंपनीने सुटे भाग पुरविले आहेत.

पश्चिम बंगाल ग्रीन युनिव्हर्सिटीला राणी राशमोनी यांचे नाव

  • पश्चिम बंगाल विधानसभेने अलीकडेच पश्चिम बंगाल ग्रीन युनिव्हर्सिटी (दुरुस्ती) विधेयक, २०१८ पास केले आहे.
  • पश्चिम बंगाल ग्रीन युनिव्हर्सिटीचे नामकरण राणी राशमोनी ग्रीन युनिव्हर्सिटी असे करण्यात येणार आहे. लोकमाता राम राशमोनी यांच्या २२५व्या जयंतीच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला.
राणी राशमोनी
  • राणी राशमोनी यांचा जन्म २८ सप्टेंबर १७९३ रोजी झाला. पश्चिम बंगालमध्ये शिक्षणाच्या प्रसारासाठी त्यांनी खूप कार्य केले.
  • त्यांनी कलकत्ता येथील दक्षिणेश्वर मंदिराची स्थापना केली. याशिवाय त्यांनी धार्मिक पर्यटकांसाठी सुवर्णरेखा नदीपासून पुरीपर्यंत मार्गही बांधला.
  • त्यांनी बाबुघाट, अहिरितोला घाट आणि नीमतोला घाट देखील बांधून घेतला होता. त्यांनी इंपीरियल ग्रंथालय (आता भारतीय राष्ट्रीय ग्रंथालय) आणि द हिंदू कॉलेज (आता प्रेसीडेंसी विद्यापीठ) यासाठीही लक्षणीय योगदान दिले आहे.

नंदीता दास यांना एफआयएपीएफ पुरस्कार

  • भारतीय चित्रपट निर्मात्या नंदिता दास यांना यावर्षीचा ‘इंटरनॅशनल फेडरेशन ऑफ फिल्म प्रोड्यूसर्स असोसिएशन्स पुरस्कार’ जाहीर झाला आहे.
  • २९ नोव्हेंबर रोजी ब्रिस्बेनमध्ये होणाऱ्या १२व्या आशिया पॅसिफिक स्क्रीन अवार्ड्स (APSA) या पुरस्कार वितरण सोहळ्याहा पुरासाक्र त्यांना प्रदान करण्यात येईल.
  • इंटरनॅशनल फेडरेशन ऑफ फिल्म प्रोड्यूसर्स असोसिएशन्स (FIAPF) ही चित्रपट क्षेत्रातील एक अग्रणी संस्था आहे.
  • ३० देशांमधील चित्रपट निर्मात्यांच्या ३६ संघटना या संस्थेच्या सदस्य आहेत.
  • या संघटनेची १९३३साली स्थापना करण्यात आली. याचे मुख्यालय फ्रान्सच्या पॅरिस शहरात आहे.
  • ही संस्था जगभरात काही महत्त्वाच्या कार्यक्रमांसह आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवांचे नियमन करण्यासाठी जबाबदार आहे.

चालू घडामोडी : २७ नोव्हेंबर

सुनील अरोरा यांची देशाचे पुढील मुख्य निवडणूक आयुक्त

  • राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी निवडणूक आयुक्त सुनील अरोरा यांची देशाचे पुढील मुख्य निवडणूक आयुक्त (२३वे) म्हणून निवड केली आहे.
  • अरोरा १ डिसेंबर रोजी निवृत्त होत असलेले विद्यमान मुख्य निवडणूक आयुक्त ओ पी रावत यांचे स्थान घेतील. २ डिसेंबरला अरोरा पदभार स्वीकारतील.
  • त्यांचा कार्यकाळ अडीच वर्षांचा असेल. २०१९च्या निवडणुका सुनील अरोरा यांच्या कार्यकाळात होणार आहेत.
  • अरोरा हे भारतीय प्रशासकीय सेवेच्या (आयएएस) १९८०च्या तुकडीचे राजस्थान केडरचे सेवानिवृत्त अधिकारी आहेत.
  • ३१ ऑगस्ट २०१७ रोजी त्यांची निवडणूक आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली होती. राजस्थानमध्ये प्रशासकीय सेवेत असताना ६२ वर्षीय अरोरा यांनी विविध विभागाचे कामकाज पाहिले आहे.
  • त्यांनी १९९३ ते १९९८ दरम्यान राजस्थानच्या तत्कालीन मुख्यमंत्र्यांचे सचिव आणि २००५ ते २००८ दरम्यान मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव म्हणून काम केले आहे.
  • त्याचबरोबर ते केंद्र सरकारच्या माहिती व प्रसारण विभागाचे सचिव आणि कौशल विकास आणि उद्योजकता मंत्रालयाचे सचिव म्हणूनही काम पाहिले आहे.
  • त्याचबरोबर त्यांनी अर्थ आणि वस्त्रोद्योग आणि योजना आयोगाच्या विविध पदांवर काम केले आहे. ते पाच वर्षे एअर इंडियाचे सीएमडीही होते.
  • २०१६मध्ये त्यांना प्रसार भारतीचे सल्लागार म्हणूनही नियुक्त करण्यात आले होते. त्यांनतर त्यांची भारतीय अर्थ व्यवहारांच्या संस्थेचे सीईओ आणि संचालक म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. 
निवडणूक आयोग
  • भारतीय निवडणूक आयोग ही भारत सरकारच्या अखत्यारीतील एक स्वायत्त घटनात्मक संस्था आहे. याचे मुख्यालय नवी दिल्ली येथे स्थित आहे.
  • भारतीय निवडणूक आयोगाची स्थापना २५ जानेवारी १९५० रोजी करण्यात आली होती. निवडणूक आयोग राज्यघटनेच्या कलम ३२४ अंतर्गत कार्य करतो.
  • भारतातील लोकसभा, राज्यसभा, राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, राज्य विधानसभा इत्यादी निवडणुकींसाठी निवडणूक आयोग सर्वस्वी जबाबदार आहे.
  • निवडणूक आयोगामध्ये एक मुख्य निवडणूक आयुक्त आणि राष्ट्रपती नेमतील इतके अन्य निवडणूक आयुक्त असतात.
  • सामाजिक प्रतिष्ठा, कायद्याचे ज्ञान आणि समृद्ध असा प्रशासकीय अनुभव असलेल्या व्यक्तीची नेमणूक पंतप्रधानांच्या सल्ल्याने राष्ट्रपती मुख्य निवडणूक आयुक्त पदावर करतात.
  • सुकुमार सेन हे भारताचे पहिले मुख्य निवडणूक आयुक्त होते. सध्या ओमप्रकाश रावत भारताचे मुख्य निवडणूक आयुक्त (२२वे) आहेत.

विद्यार्थ्यांचा गृहपाठ आणि दप्तराच्या वजनासाठी दिशा-निर्देश जारी

  • केंद्रीय मानव संसाधन मंत्रालयाने सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना पहिली आणि दुसरीच्या विद्यार्थ्यांना गृहपाठ न देण्याचे निर्देश दिले आहेत.
  • याशिवाय दहावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांच्या दप्तराचे वजनही निश्चित करण्यात आले आहे.
केंद्र सरकारचे निर्देश
  • विविध विषय शिकविणे आणि दप्तराचे वजन नियंत्रित करण्यासाठी सर्व राज्ये व केंद्रशासित प्रदेशांना दिशा-निर्देश तयार करावे लागणार. 
  • पहिली आणि दुसरीच्या विद्यार्थ्यांना गृहपाठ देता येणार नाही आणि भाषा व गणिताशिवाय इतर कोणताही विषय निर्धारित करता येणार नाही.
  • तिसरी ते पाचवी इयत्तेतील विद्यार्थ्यांना NCERTद्वारे निर्धारित भाषा, गणित आणि पर्यावरणशास्त्र याव्यतिरिक्त इतर कोणताही विषय निर्धारित करू नये.
  • विद्यार्थ्यांना अतिरिक्त वह्या-पुस्तके व इतर अतिरिक्त सामग्री आणण्यास सांगू नये आणि दप्तराचे वजन निर्धारित मर्यादेपेक्षा जास्त असू नये.
दप्तराच्या वजनाबद्दल निर्देश
  • पहिली आणि दुसरीच्या विद्यार्थ्यांच्या दप्तराचे वजन १.५ किलोपेक्षा अधिक नसावे.
  • तिसरी ते पाचवी पर्यंतच्या विद्यार्थ्यांच्या दप्तराचे वजन २ ते ३ किलो असावे.
  • सहावी आणि सातवीच्या विद्यार्थ्यांच्या दप्तराचे वजन ४ किलोपेक्षा अधिक नसावे.
  • आठवी आणि नववीच्या विद्यार्थ्यांच्या दप्तराचे वजन ४.५ किलोपेक्षा अधिक नसावे.
  • दहावीच्या विद्यार्थ्यांच्या दप्तराचे वजन ५ किलोपेक्षा अधिक नसावे.
केंद्रीय विद्यालयात पूर्वीपासूनच आहेत हे नियम
  • केंद्रीय विद्यालय संस्थेच्या २००९मधील बनविण्यात आलेल्या दिशा-निर्देशानुसार, पहिली व दुसरीच्या विद्यार्थ्यांच्या दप्तराचे वजन २ किलोपेक्षा अधिक असू नये ज्यात दप्तराचे वजनही समाविष्ट आहे.
  • यानंतर तिसरी व चौथीसाठी ३ किलो, पाचवी ते सातवीसाठी ४ किलो आणि आठवी ते बारावीसाठी ६ किलोची मर्यादा निश्चित करण्यात आली आहे.
पार्श्वभूमी
  • दप्तराच्या वजनाबद्दल अनेक दशकांपासून चिंता व्यक्त होत आहे. ही समस्या प्राथमिक इयत्तांपर्यंतच मर्यादित नसून, माध्यमिक स्तरावरील विद्यार्थ्यांच्या दप्तराचे वजनही अधिक असते.
  • हा मुद्दे बऱ्याच दिवसांपासून चर्चेत असून, वेळोवेळी त्यासाठी आंदोलनही झाले आहे. संसदेतही अनेकदा या मुद्द्यावर चर्चा झाली आहे.
  • १९७७मध्ये ईश्वरभाई पटेल समितीने पहिल्यांदा दप्तराचे वजन कमी करण्यासाठी अहवाल सदर केला होता.
  • १९९०मध्ये शैक्षणिक धोरणाचे पुनरावलोकन करणाऱ्या समितीने दप्तराचे ओझे कमी करण्याची शिफारस केली होती.
  • १९९२मध्ये केंद्रीय मानव संसाधन मंत्रालयाने एक राष्ट्रीय सल्लागार समिती स्थापन केली. यात देशातील आठ शिक्षणतज्ञांचा समावेश होता. प्रो. यशपाल या समितीचे अध्यक्ष होते.
  • ‘शिक्षणाच्या सर्व स्तरावरील विद्यार्थी, विशेषतः लहान इयत्तेतील विद्यार्थ्यांवर अभ्यासामुळे पडणारे ओझे कमी कसे करावे’ यावर विचार करण्यासाठी ही समिती स्थापन करण्यात आली होती. 
  • १९९३मध्ये यशपाल समितीने आपला अहवाल सरकारला सादर केला, ज्यामध्ये दप्तराचे वजन कमी करण्यासाठी अनेक उपाय सुचविण्यात आले होते.
  • पाठ्यपुस्तके ही शाळेची संपत्ती समजून, ती शाळेतच ठेवण्यासाठी विद्यार्थ्यांना लॉकर्स देण्यात यावे अशी शिफारसही या समितीने केली होती.

नासाचे इनसाइट यान मंगळ ग्रहावर उतरले

  • नासाचे इनसाइट (इंटरिअर एक्सप्लोरेशन यूजिंग सिस्मिक इन्व्हेस्टिगेशन, जिओडेसी अँड हिट ट्रान्सपोर्ट) यान मंगळ ग्रहावर यशस्वीरित्या उतरले आहे.
  • मंगळ ग्रहावरील रहस्य जाणून घेण्यासाठी हे यान बनवण्यात आले आहे. या यांचे वजन सुमारे ३५८ किलो आहे.
  • ग्रहाच्या पृष्ठभागावर १९,८०० किमी प्रति तास वेगाने जाणारे हे यान उतरताना ६ मिनिटांत शून्य वेगावर आले.
  • त्यानंतर यान पॅराशूटमधून बाहेर आले आणि लँड झाले. इनसाइटने मंगळ ग्रहावरुन आपले पहिले छायाचित्रही पाठवले आहे.
  • नासाच्या या प्रकल्पासाठी १ बिलियन डॉलर (७० अब्ज रुपये) खर्च करण्यात आले आहे. ६ महिन्यांच्या प्रवासानंतर इनसाइटने मंगळावर लँड केले.
  • सौर ऊर्जा आणि बॅटरीने ऊर्जा मिळवणाऱ्या लँडरला २६ महिन्यांपर्यंत संचलित केले जाऊ शकते. परंतु, नासाला यापेक्षा अधिक कालावधी ते सुरु राहू शकेल अशी अपेक्षा आहे.
  • इनसाइट यान पृष्ठभागावर १० ते १६ फुट खोल खड्डा करेल. यापूर्वीच्या मंगळ अभियानांच्या तुलनेत हे १५ टक्के अधिक खोल असेल.
  • २०३०पर्यंत मनुष्याला मंगळावर पाठवण्याच्या प्रयत्नासाठी नासाला मंगळ ग्रहाचे तापमान समजणे महत्वाचे आहे.
  • इनसाइट यान हे मंगळावरील मानव मिशनपूर्वी त्याच्या पृष्ठभागावर उतरणे आणि येणाऱ्या भूकंपाचे मापन करण्यासाठी डिझाइन करण्यात आले आहे.
  • यानातील सिस्मोमीटरच्या मदतीने मंगळावरील अंतर्गत परिस्थितीचा अभ्यास केला जाईल. यामुळे मंगल ग्रहाच्या निर्मितीबद्दल माहिती मिळू शकेल.
  • नासाने इनसाइटला लँड करण्यासाठी इलीशियम प्लॅनिशिया नावाच्या जागेची निवड केली. यामुळे सिस्मोमीटर लावणे आणि पृष्ठभागाला खोदणे सोपे झाले.
  • यापूर्वी २०१२मध्ये नासाने क्युरीऑसिटी रोव्हर मंगळावर पाठविले होते. या यानाने मंगळ ग्रहाबद्दल ठोस माहिती पृथ्वीवर पाठविली होती.

दीपा कर्माकरला जिम्नॅस्टिक विश्वचषकात कांस्यपदक

  • भारतीय जिम्नॅस्ट दीपा कर्माकरने कलात्मक जिम्नॅस्टिक विश्वचषकातील वॉल्ट स्पर्धेत कांस्यपदक पटकावले.
  • जर्मनीतील कोटबस येथे सुरु असलेल्या विश्वचषकाच्या तिसऱ्या दिवशी दीपाने वॉल्ट स्पर्धेत १४.३१६ गुण मिळवत कांस्यपदक आपल्या नावे केले.
  • ब्राझीलची रिबेका एंड्रेडने सुवर्ण आणि अमेरिकेच्या झेड कारेने रौप्य पदक मिळवले.
  • दीपाने तुर्की येथे जुलैत झालेल्या कलात्मक जिम्नॅस्टिक विश्व स्पर्धेत सुवर्णपदक पटकावले होते.
  • गुडघ्याच्या दुखापतीमुळे ती आशियाई स्पर्धेमध्ये वॉल्ट अंतिम सामन्यात खेळू शकली नव्हती.

अझीम प्रेमजी यांना शेवलिएर डि ला लीजन डि ऑनर सन्मान

  • माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील (आयटी) उद्योगपती अझीम प्रेमजी यांना फ्रान्सचा सर्वोच्च नागरी सन्मान ‘शेवलिएर डि ला लीजन डि ऑनर’ या पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे.
  • भारतात आयटी उद्योग विकसित करणे, फ्रान्समध्ये आर्थिक गुंतवणूक करणे तसेच अझीम प्रेमजी फाऊंडेशन आणि विद्यापीठाच्या माध्यमातून एक समाजसेवकाच्या रुपात त्यांनी समाजासाठी दिलेल्या योगदानाची दखल घेत हा सन्मान केला जात आहे.
लीजन डि ऑनर
  • हा फ्रान्सचा सर्वोच्च नागरी सम्मान आहे. नेपोलियन बोनापार्टने हा सम्मान १८०२मध्ये सुरु केला. हा सम्मान फ्रान्सच्या उत्कृष्ट सेवेसाठी कोणत्याही देशाच्या नागरिकाला दिला जातो.
  • या सम्मानाच्या ५ श्रेणी पुढीलप्रमाणे: शेवलिएर (योद्धा), ऑफिसिएर (ऑफिसर), कॉमोडोर (कमांडर), ग्रँड ऑफिसिएर (ग्रँड ऑफिसर) आणि ग्रँड क्रॉइक्स (ग्रैंड क्रॉस).
  • २००७ आणि २०१४मध्ये अनुक्रमे अभिनेता शाहरुख खान आणि अमिताभ बच्चन यांना हा सम्मान देण्यात आला होता.
  • याशिवाय अमर्त्य सेन, पंडित रवी शंकर, झुबिन मेहता, लता मंगेशकर, जेआरडी टाटा, रतन टाटा आणि सौमित्र चॅटर्जी यांनादेखील हा सम्मान देण्यात आला आहे. 

दुधवा व्याघ्र प्रकल्प आणि एसएसबी एकत्रितपणे काम करणार

  • दुधवा व्याघ्र प्रकल्प आणि सशस्त्र सीमा बल (एसएसबी) यांनी दुधवाचे जंगल आणि तेथील समृद्ध वन्य जीवसृष्टीला संपूर्ण संरक्षण प्रदान करण्यासाठी एकत्रितपणे काम करण्यास सहमती दर्शवली आहे.
  • एसएसबीद्वारे गस्त घालण्याचे हे कार्य वन्यजीव व वन गुन्हेगारांच्या हालचालींबद्दल विविध सुरक्षा एजन्सींमध्ये समन्वय आणि माहितीचे आदानप्रदान करण्याच्या हेतूने केले जात आहे.
  • सशस्त्र सीमा बल भारताचे एक निमलष्करी दल आहे. यावर १,७५१ किमी भारत-नेपाळ सीमेवरील सुरक्षेची जबाबदारी आहे.
दुधवा व्याघ्र प्रकल्प
  • हे अभयारण्य उत्तर प्रदेशच्या लखीमपूर-खीरी जिल्ह्यात भारत-नेपाळ सीमेवर स्थित उत्तर प्रदेशातील तराई भागातील सर्वोत्तम नैसर्गिक जंगले आणि गवताळ मैदानाचे प्रतिनिधित्व करते.
  • या तराई आर्क लँडस्केपमध्ये ३ महत्वाची संरक्षित क्षेत्रे आहेत: दुधवा व्याघ्र प्रकल्प, किशनपूर वन्यजीव अभयारण्य, कतर्निया घाट वन्यजीव अभयारण्य.
  • राज्यातील रॉयल बंगाल वाघाचे एकमेव निवासस्थान असल्यामुळे प्रोजेक्ट टायगर (Project Tiger) अंतर्गत या तिन्ही संरक्षित क्षेत्रांना दुधवा व्याघ्र अभयारण्यात समाविष्ट करण्यात आले आहे.
प्रोजेक्ट टायगर (व्याघ्र प्रकल्प)
  • भारत सरकारने १९७३मध्ये राष्ट्रीय पशु वाघाला संरक्षित करण्यासाठी ‘प्रोजेक्ट टायगर’ सुरू केले. सध्या ‘प्रोजेक्ट टाइगर’ अंतर्गत संरक्षित व्याघ्र प्रकल्पांची संख्या ५० आहे.
  • ‘प्रोजेक्ट टायगर’ पर्यावरण, वने आणि हवामान मंत्रालयाची १ केंद्र पुरस्कृत योजना आहे. या योजनेद्वारे वाघ असलेल्या राज्यांना व्याघ्र संवर्धनासाठी मदत केली जाते.

भारत-रशिया दरम्यान पहिला रणनीतिक आर्थिक संवाद

  • भारत-रशिया दरम्यान पहिला रणनीतिक (सामरिक) आर्थिक संवाद २५ नोव्हेंबर २०१८ रोजी रशियातील सेंट पीटर्सबर्ग येथे करण्यात आले.
  • या संवादात भारतीय दलाचे प्रतिनिधित्व नीति आयोगाचे उपाध्यक्ष राजीव कुमार यांनी केले. तर रशियाचे प्रतिनिधित्व आर्थिक विकास मंत्री मॅक्सिम ओरेश्किन यांनी केले.
  • या एकदिवसीय फोरममध्ये दोन्ही देशांतील अग्रगण्य व्यावसायिक नेत्यांनी भाग घेतला. या फोरममध्ये द्विपक्षीय व्यापार, गुंतवणूक, तंत्रज्ञान आणि उद्योग यावर चर्चा केली गेली.
  • या संवादामध्ये परिवहन, कृषी आणि कृषि प्रक्रिया, सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग, डिजिटल परिवर्तन आणि औद्योगिक सहकार इत्यादि या विषयावर लक्ष केंद्रित केले गेले.

बिहारमध्ये भगवान बुद्धांच्या पुतळ्याचे अनावरण

  • बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी नालंदा जिल्ह्यातील राजगीर येथे भगवान बुद्धांच्या ७० फुटी पुतळ्याचे अनावरण केले. ही देशातील भगवान बुद्धांची दुसरी सर्वात उंच प्रतिमा आहे.
  • हा पुतळा घोरा कटोरा येथे १६ मीटरच्या परिघामध्ये स्थापन करण्यात आला आहे. ४५,००० क्यूबिक फूट गुलाबी बलुआ दगडाने तो बांधण्यात आला आहे.
  • घोरा कटोरा हे ५ टेकड्यांच्यामध्ये असलेला एक नैसर्गिक तलाव आहे. इको-टुरिझमच्या दृष्टीने या पुतळ्याच्या आसपासचा परिसर विकसित करण्यात आला आहे.
  • या क्षेत्रामध्ये डीझेल किंवा पेट्रोल वाहनास परवानगी नसेल. या ठिकाणी फक्त इलेक्ट्रिक वाहने प्रवेश करू शकतील.

२५ नोव्हेंबर: महिलांच्या विरोधात हिंसाचार संपविण्यासाठी आंतरराष्ट्रीय दिवस

  • दरवर्षी २५ नोव्हेंबरला महिलांच्या विरोधात हिंसाचार संपविण्यासाठी आंतरराष्ट्रीय दिवस साजरा केला जातो. (International Day for the Elimination of Violence Against Woman)
  • महिला व मुली यांच्याविरोधात हिंसाचार दूर करणे आणि याबद्दल जागरुकता पसरवणे हा या दिनाचा उद्देश आहे.
  • या दिनाची यावर्षाची थीम ‘ऑरेंज द वर्ल्ड: #हियरमीटू’ (Orange the World: #HearMeToo) अशी आहे.
  • महिलांविरोधातील हिंसा आता थांबली पाहिजे आणि त्यासाठी सर्वांनी एकत्र आले पाहिजे असा संदेश देण्यासाठी, यामध्ये ऑरेंज म्हणजेच नारंगी (एकतेच्या सूत्रात बांधणारा रंग) आणि #HearMeToo हॅशटॅगचा वापर करण्यात आला आहे. 
  • या दिवसाची स्थापना १९९९मध्ये संयुक्त राष्ट्रांच्या महासभाने केली. मिराबाल बहिणींच्या स्मरणार्थ हा दिवस साजरा केला जातो. त्या डोमिनिकन रिपब्लिकच्या राजकीय कार्यकर्ता होत्या.
  • राफेल ट्रुजिलोच्या एकाधिकारशाहीच्या काळात (१९३०-१९६१) १९६०मध्ये त्यांची क्रूरतेने हत्या करण्यात आली होती.
  • महिलांवरील हिंसा मानवी हक्कांचे उल्लंघन आहे. महिलांसोबत होणाऱ्या भेदभावाचा हा परिणाम आहे. ही एक जागतिक समस्या आहे.
  • यामुळे महिलांच्या विकासाच्या मार्गात अडथळा निर्माण होतो तसेच हिंसा त्यांच्या प्रतिष्ठित जीवनाच्या मार्गात अडथळा ठरते.

२६/११च्या सुत्रधारांबद्दल माहिती देणाऱ्यास अमेरिकेकडून बक्षीस

  • अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मुंबईवरील दहशतवादी हल्ल्याला १० वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त दहशतवाद विरोधातील लढाईत भारतासोबत दृढ निश्चयाने उभे राहण्याची इच्छा व्यक्त केली.
  • त्याचबरोबर, अमेरिकेकडून मुंबई हल्ल्याच्या सुत्रधारांना पकडून देणाऱ्यांना ५० लाख डॉलर (३५ कोटी) रुपयांचे बक्षीसही जाहीर करण्यात आले आहे.
  • २६ ते २९ नोव्हेंबर २००८ दरम्यान मुंबईत हल्ला झाला त्यात १० दहशतवादी सामील होते, हा हल्ला लष्कर-ए-तोयबाने घडवून आणला होता.
  • पाकिस्तानच्या १० अतिरेक्यांनी २६ नोव्हेंबर २००८ रोजी रात्री समुद्रामार्गे दक्षिण मुंबईत प्रवेश केला होता.
  • दहशतवाद्यांनी ताज हॉटेल, लिओपोल्ड कॅफे, नरिमन हाउस, हॉटेल ओबेरॉय, सीएसएमटी, कामा रुग्णालय या ठिकाणी अंदाधुंद गोळीबार केला होता. 
  • या हल्ल्यामध्ये ३४ परदेशी नागरिकांसह (पैकी ६ अमेरिकन) १६६ नागरिकांना प्राण गमवावा लागला, तर सुमारे ७०० जण जखमी झाले होते.
  • अमेरिकेने या हल्ल्याबाबत आंतरराष्ट्रीय भागीदारांच्या मदतीने या हल्ल्यातील दोषी व्यक्तींना शिक्षा करण्यासाठी प्रयत्न चालू ठेवले आहेत.
  • यापूर्वी अमेरिकेच्या परराष्ट्र खात्याने लष्कर-ए- तोयबाचा संस्थापक हाफिज महंमद सईद, हाफिज अब्दुल रहमान मक्की व इतरांना पकडण्यासाठी इनाम जाहीर केले होते.
  • तसेच अमेरिकेच्या परराष्ट्र खात्यानेच लष्कर-ए-तोयबा या संघटनेला परदेशी दहशतवादी संघटना घोषित केले होते.
  • मे २००५मध्ये संयुक्त राष्ट्रांच्या निर्बंध समितीने लष्कर-ए- तोयबाचे नाव निर्बंध घातलेल्या संस्थांच्या यादीत समाविष्ट केले होते.

ओडिशामध्ये दुर्मिळ आदिवासी भाषांचे शब्दकोष

  • आदिवासी भाषांना लुप्त पावण्यापासून वाचविण्यासाठी ओडिशा राज्य सरकारने २१ आदिवासी भाषांचे शब्दकोष तयार केले आहेत.
  • द्वैभाषिक आदिवासी शब्दकोष आदिवासी जमात असलेल्या जिल्ह्यात प्राथमिक पातळीवर राज्य सरकारद्वारे दिल्या जाणाऱ्या बहुभाषिक शिक्षणामध्ये वापरले जातील.
  • ओडिशा राज्यात नामशेष होण्याच्या मार्गावर असलेल्या १३ आदिवासी समुदायांसह ६२ वेगवेगळे आदिवासी समुदाय आढळतात.
  • या जमाती २१ भाषा आणि ७४ बोलीभाषा बोलतात. २१ आदिवासी भाषांपैकी सातकडे त्यांची स्वत:ची लिपी आहे.

पं. केशव गिंडे यांना पं. भीमसेन जोशी जीवनगौरव पुरस्कार

  • महाराष्ट्र शासनातर्फे दिल्या जाणाऱ्या भारतरत्न पं. भीमसेन जोशी शास्त्रीय संगीत जीवनगौरव पुरस्कार २०१८ ज्येष्ठ बासरी वादक पं. केशव गिंडे यांना जाहीर झाला.
  • प्रतिवर्षी राज्य शासनातर्फे शास्त्रीय गायन व वादन या क्षेत्रात प्रदीर्घ काळ उल्लेखनीय कार्य करणाऱ्या कलाकाराचा पं. भीमसेन जोशी यांच्या नावाने दिल्या जाणाऱ्या पुरस्काराने गौरव करण्यात येतो.
  • या पुरस्काराचे स्वरुप रु. ५ लाख रोख, मानपत्र, सन्मानचिन्ह असे आहे.
  • यापूर्वी हे पुरस्कार गानसरस्वती किशोरी आमोणकर, पं.जसराज, श्रीमती प्रभा अत्रे, पं.राम नारायण, श्रीमती परवीन सुलताना आणि श्रीमती माणिक भिडे यांना प्रदान करण्यात आलेला आहे.
  • पं. गिंडे यांचा जन्म ५ सप्टेंबर १९४२ साली पुणे येथे झाला. संगीतामध्ये त्यांनी पीएचडी केलेली आहे.
  • बासरी वादनाचे शिक्षण त्यांनी गुरु स्व. पं. देवेंद्र मुर्डेश्वर, पं. हरिपद चौधरी यांच्याकडे घेतले.
  • पं. गिंडे यांनी देशात आणि परदेशात आयोजित होणाऱ्या या संगीत मैफिलीत तसेच आकाशवाणी आणि दूरदर्शनवर अनेक राष्ट्रीय संगीत सभेत सहभाग घेतला.
  • वेदकाळापासून चालत आलेल्या बासरीमध्ये गिंडे यांनी अभूतपूर्व परिवर्तन केलेले आहे आणि केशव वेणू या बासरीची निर्मिती १९८४साली केली आहे.
  • या बासरीची नोंद ‘लिम्का बुक ऑफ वर्ल्ड रेकॉडस्’ तसेच ‘गिनीज बूक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डस्’मध्ये घेण्यात आली आहे. ही बासरी ७ सप्तकात वाजवण्याचा गोल्डन बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड त्यांच्या नावावर आहे.
  • श्री. गिंडे यांना भारत सरकारद्वारे सिनियर फेलोशिप, सहारा इंडिया यांच्याकडून जीवनगौरव पुरस्कार, जगदगुरु शंकराचार्य श्रृंगेरी महापीठ यांनी वेणू विद्वान पदवी देऊन गौरविले आहे.