प्रश्नसंच १६७ - इतिहास


[प्र.१] कॉंग्रेस स्थापनेसंदर्भातील ‘सुरक्षा झडप सिद्धांता’ला ‘दंतकथा’ संबोधून कोणी नाकारले आहे?
१] ए. ओ. ह्यूम
२] ए. आर. देसाई
३] ताराचंद
४] बिपिनचंद्र


४] बिपिनचंद्र

[प्र.२] खालीलापैकी कोणती नाटके हर्षवर्धनने लिहिली?
अ] प्रियदर्शिका
ब] रत्नावली
क] नागानंद

१] फक्त अ
२] अ आणि ब
३] ब आणि क
४] वरील सर्व


४] वरील सर्व

[प्र.३] खालील वर्णन कोणाचे आहे.
अ] त्याला ‘निझाम-उल-मुल्क’ किताब देण्यात आला होता.
ब] त्याच्या उत्तराधिकाऱ्यांना हैदराबादचे निझाम म्हणून ओळखले जाते.

१] चिन क्विलीच खान
२] मुर्शिद कुली खान
३] सादत खान 
४] हुसेन अली खान


१] चिन क्विलीच खान

[प्र.४] बॅ. जिना यांनी आपल्या अनुयायांना कोणता दिवस प्रत्यक्ष कृतीदिन म्हणून पाळण्यास सांगितला?
१] १६ ऑगस्ट १९४६
२] २ सप्टेंबर १९४६
३] ८ डिसेंबर १९४६
४] वरीलपैकी एकही नाही.


१] १६ ऑगस्ट १९४६

[प्र.५] व्हॉईस ऑफ इंडिया हे वृत्तपत्र कोणी सुरु केले?
१] भिकाजी कामा
२] दादाभाई नौरोजी
३] रेहमानअली
४] चित्तरंजन दास


२] दादाभाई नौरोजी

[प्र.६] आदी शंकराचार्य यांनी खालीलपैकी कोणत्या ठिकाणी मठाची स्थापना केलेली नाही?
१] पुरी
२] द्वारका
३] जोगीनाथ
४] काशी


४] काशी

[प्र.७] आचार्य अत्रे यांनी ‘मृत्यूचे महाचुंबन घेणारा महाकवी’ याशब्दात कोणाचे वर्णन केले आहे?
१] साने गुरुजी
२] महात्मा फुले
३] विनायक सावरकर
४] ग. वा. जोशी


१] साने गुरुजी

[प्र.८] स्वामी दयानंद सरस्वती यांच्याबद्दल खालीलपैकी कोणते विधान सत्य नाही?
अ] त्यांचे खरे नाव मुळशंकर होते.
ब] त्यांचा जन्म १८२५ मध्ये गुजरात येथे झाला.
क] त्यांनी १५ वर्षे संत बनून भ्रमण केले.

१] फक्त अ
२] फक्त अ आणि क
३] फक्त ब
४] सर्व विधाने सत्य


४] सर्व विधाने सत्य

[प्र.९] गांधी आयर्विन करारात खालीलपैकी कशाचा समावेश नव्हता?
१] ज्यांनी कोणतीही हिंसा केली नाही अशा सर्व कैद्यांची मुक्तता करावी.
२] मुक्त केलेल्या कैद्यांना सोयीस्कर नुकसान भरपाई मिळावी.
३] खालसा केलेल्या जमिनी ज्या अजूनपर्यंत विकेलेल्या नाहीत त्या परत कराव्यात.
४] जे दंड अजून जमा झाले नाहीत ते सर्व माफ करावेत.


२] मुक्त केलेल्या कैद्यांना सोयीस्कर नुकसान भरपाई मिळावी.

[प्र.१०] मराठा साम्राज्यात मूळतः काही उणीवा होत्या ज्यामुळे त्यांचा अधःपात झाला. पुढीलपैकी कोणती त्यातील एक नव्हती?
अ] मराठ्यांच्या राजकीय पद्धतीमुळे बऱ्याच लोकांची सहानभूती त्यांनी घालवली व ते लोक मराठ्यांपासून दूर गेले.
ब] इतर राज्यांवर मराठ्यांनी टाकलेल्या धाडीमुळे नवीन शत्रू निर्माण झाले.
क] त्यांनी लावलेल्या करांमुळे सर्वसाधारण माणसांचा जाच वाढला विशेषतः शेतकऱ्यांचा व व्यापाऱ्यांचा.

१] फक्त अ आणि ब
२] फक्त अ आणि क
३] फक्त क
४] वरीलपैकी एकही नाही.


४] वरीलपैकी एकही नाही.

३ टिप्पण्या: