चालू घडामोडी : २० डिसेंबर

डॉ. जी. सतीश रेड्डी यांना नॅशनल डिझाइन पुरस्कार

  • संरक्षण क्षेत्रातील नामवंत वैज्ञानिक डॉ. जी. सतीश रेड्डी यांना क्षेपणास्त्र रचना व विकासकामासाठी नॅशनल डिझाइन पुरस्कार जाहीर झाला आहे.
  • क्षेपणास्त्रांच्या दिशादर्शन यंत्रणांच्या संशोधनात त्यांचे नाव आघाडीवर आहे. दिशादर्शित शस्त्रास्त्र प्रणाली स्वदेशी पातळीवर विकसित करण्यात त्यांचे मोठे योगदान आहे.
  • सध्या ते संरक्षणमंत्र्यांचे वैज्ञानिक सल्लागार व क्षेपणास्त्र-सामरिक प्रणाली कार्यक्रमाचे महासंचालक आहेत.
  • त्यांच्या कार्यावर त्यांचे गुरु आणि दिवंगत राष्ट्रपती एपीजे अब्दुल कलाम यांचा ठसा आहे. कलाम यांच्यानंतर ‘ज्युनियर मिसाइल मॅन’ असा रेड्डी यांचा लौकिक आहे.
  • अत्याधुनिक शस्त्रास्त्रे, राष्ट्रीय धोरणनिश्चिती, विविध क्षेपणास्त्र प्रणाली या क्षेत्रांत त्यांनी पायाभूत काम केले आहे.
  • आता त्यांना जो पुरस्कार मिळाला आहे तो नॅशनल डिझाइन रीसर्च फोरम या संस्थेचा असून तो इन्स्टिटय़ूशन ऑफ इंजिनीअर्स या संस्थेकडून दिला जातो.
  • त्यांना यापूर्वी होमी भाभा स्मृती पुरस्कार, डीआरडीओ अग्नी पुरस्कार, तरुण वैज्ञानिक पुरस्कार असे अनेक पुरस्कार मिळाले आहेत.
  • रेड्डी यांनी डॉ. कलाम क्षेपणास्त्र संकुलाचे प्रमुख म्हणून निर्णायक भूमिका पार पाडली. क्षेपणास्त्र तंत्रज्ञानात भारताला स्वयंपूर्णता प्राप्त करून देण्यात त्यांनी मोठे काम केले आहे.
  • लंडनच्या रॉयल इन्स्टिटय़ूट ऑफ नेव्हिगेशन या संस्थेचे ते पहिले भारतीय फेलो आहेत. रॉयल एरॉनॉटिकल सोसायटीचे ते सदस्य आहेत.

स्थलांतरितांच्या संख्येत भारत पहिला

  • संयुक्त राष्ट्रांच्या २०१७च्या आंतरराष्ट्रीय स्थलांतर अहवालानुसार, परदेशातील स्थलांतरितांच्या संख्येत भारत पहिल्या क्रमांकावर आहे.
  • या अहवालानुसार, एकूण १.७ कोटी भारतीय लोक परदेशात वास्तव्य करीत असून, त्यातील पन्नास लाख लोकांचे सध्याचे वास्तव्य आखातात आहे.
  • भारताखालोखाल मेक्सिकोचे १.३ कोटी, रशियाचे १.१ कोटी, चीनचे १ कोटी, बांगलादेशचे ०.७ कोटी, सीरियाचे ०.७ कोटी, पाकिस्तान व युक्रेनचे प्रत्येकी ०.६ कोटी लोक परदेशात स्थलांतरित म्हणून वास्तव्यास आहेत.
  • भारताचे ३० लाख नागरिक संयुक्त अरब अमिरातीत तर प्रत्येकी ०.२ कोटी नागरिक अमेरिका व सौदी अरेबियात आहेत.
  • सध्या जगात २.५८ कोटी लोक त्यांचा जन्मदेश सोडून परदेशात राहात आहेत. त्यांचे प्रमाण इ.स. २००० पासून ४९ टक्के वाढले आहे.
  • आंतरराष्ट्रीय स्थलांतर हा चिंतेचा विषय असून, २०३०च्या शाश्वत विकास कार्यक्रमात त्याचा समावेश आहे.

२०२२च्या राष्ट्रकुल खेळाचे यजमानपद बर्मिंगहॅमला

  • २०२२साली होणाऱ्या राष्ट्रकुल खेळाचे यजमानपद भूषवण्याचा मान बर्मिंगहॅम शहराला देण्यात आला आहे.
  • बर्मिंगहॅम आणि डर्बन या शहरांनी यासाठी आपला प्रस्ताव सादर केला होता. नंतर आर्थिक अडचणींचे कारण देत डर्बन शहराने यजमानपद भूषवण्यात नकार दिला.
  • यामुळे राष्ट्रकुल क्रीडा प्राधिकरणाने २०२२साली होणाऱ्या स्पर्धांच्या यजमानपदाचे हक्क बर्मिंगहॅमला दिले आहेत.
  • या स्पर्धेसाठीचा अंदाजे ७५ टक्के खर्च हा बर्मिंगहॅम स्थानिक प्रशासनाला करावा लागणार असून उर्वरित २५ टक्के खर्च हा राष्ट्रकुल समिती करणार आहे.
  • याआधी २०१४साली ग्लास्गो आणि त्याआधी २००२साली मँचेस्टर शहराने राष्ट्रकुल स्पर्धांच्या यजमानपदाचा मान भूषवला होता. २०१८साली ऑस्ट्रेलियाच्या गोल्ड कोस्ट येथे राष्ट्रकुल स्पर्धा रंगणार आहेत.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा