MT Special लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
MT Special लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

कलम ३५-ए

  • गेल्या महिन्यात (जुलै २०१८) जम्मू-काश्मीरमध्ये घटनेच्या कलम '३५-ए'वरून तणाव निर्माण झाला होता.
  • सर्वोच्च न्यायालयात कलम ‘३५-ए’च्या वैधतेला आव्हान देण्यात आले आहे. या याचिकेवरील सुनावणी २७ ऑगस्टपर्यंत पुढे ढकलण्यात आली आहे.
  • येत्या काळात आधीच अशांत असलेल्या काश्मीरमध्ये ‘३५-ए’वरून रणकंदन माजू शकते. या पार्श्वभूमीवर जुअणून घेऊया कलम ‘३५-ए’बद्दल थोडी माहिती....
कलम ‘३५-ए’चा इतिहास
  • भारत सरकार व जम्मू-काश्मीर यांच्यामध्ये झालेल्या दिल्ली करार १९५२अन्वये हे कलम राष्ट्रपतींच्या आदेशाद्वारे १९५४मध्ये लागू करण्यात आले. या आदेशाच्या आधारे राज्यघटनेमध्ये कलम ‘३५-ए’ची भर टाकण्यात आली.
  • भारताचे तत्कालीन पंतप्रधान पंडित नेहरू आणि जम्मू-काश्मीरचे मुख्यमत्री शेख अब्दुल्ला यांच्यात दिल्ली करार झाला होता.
कलम ‘३५-ए’मधील तरतुदी
  • कलम ‘३५-ए’ जम्मू-काश्मीरच्या कायमस्वरुपी नागरिकांना विशेषाधिकार बहाल करतो. या राज्याची विधानसभा कायमस्वरूपी नागरिक कोण हे ठरवू शकते, त्यांना विशेष वागणूक देऊ शकते, त्यांना विशेषाधिकार देऊ शकते.
  • यामध्ये सरकारी नोकऱ्या, स्थावर मालमत्तेची खरेदी, राज्यात स्थायिक होण्याची मुभा, शिष्यवृत्तीसाठी पात्रता आणि अशा प्रकारच्या अन्य सवलतींचा फायदा या कलमामुळे फक्त जम्मू-काश्मीरच्या नागरिकांनाच होऊ शकतो.
  • कलम ‘३५-ए’ अन्वये जम्मू काश्मीरच्या बाहेरील कुठल्याही व्यक्तीला राज्यात स्थावर मालमत्ता खरेदी करता येत नाही.
  • यासोबत राज्यातील तरुणीने राज्याबाहेरील व्यक्तीशी विवाह केल्यास तिला संपत्तीत अधिकार मिळत नाही तसेच तिचे स्थानिक म्हणून असलेले अधिकार संपतात. शिवाय, तिच्या मुलांनाही ते अधिकार मिळत नाहीत.
  • थोडक्यात म्हणजे जम्मू व काश्मीरमधल्या नागरिकांना भारतातल्या कुठल्याही राज्यांमध्ये ते सगळे अधिकार मिळतात जे प्रत्येक भारतीयास मिळतात.
  • मात्र, भारतातल्या अन्य राज्यांमधल्या नागरिकांना मात्र जम्मू-काश्मीरमध्ये असे अधिकार मिळत नाहीत व ते दुय्यम नागरिक ठरतात.
कलम रद्द करण्याची मागणी
  • ‘वुई द सिटिझन’ या स्वयंसेवी संस्थेने २०१४मध्ये या कलमाला आव्हान देणारी जनहित याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल केली होती.
  • तज्ञांच्या मते घटनेचा काही भाग वगळणे वा घटनेत भर टाकणे हे घटनेत बदल करण्यासारखे असून त्यासाठी कलम ३६८चा आधार घ्यावा लागतो. मात्र कलम ३६८ला वगळून ‘३५-ए’ हे कलम लागू करण्यात आले.
  • कलम ३६८नुसार संसदेची व काही बाबतीत राज्यांच्या विधानसभांची परवानगी घटना बदलासाठी लागते. परंतु असे काही न करता फक्त राष्ट्रपतींच्या आदेशाद्वारे कलम ‘३५-ए’ लागू करण्यात आले.
  • या संपूर्ण प्रक्रियेत संसदेला विचारतच घेण्यात आले नाही. त्यामुळे राष्ट्रपतींचा १९५४चा आदेश घटनेच्या ३६८ कलमाचे उल्लंघन करतो असा दावा या संस्थेने केला आहे.
  • याशिवाय कलम ‘३५-ए’ हे भेदभाव करणारे असून, त्यामुळे घटनेचे कलम १४चे (समानता) उल्लंघन करत असल्याचा दावा करत कलम ‘३५-ए’ रद्द करण्याची मागणी या संस्थेने केली.
विरोधाची कारणे
  • हे कलम रद्द झाल्यास जम्मू-काश्मीरची स्वायत्तता लोप पावेल, अशी भीती काही राजकीय पक्ष आणि फुटीरतावादी संघटनांना वाटते आहे.
  • हे कलम रद्द झाल्यास मुस्लिम बहुसंख्य असलेल्या या राज्यात सामाजिक बदल होतील. तसेच या राज्यात हिंदू धर्मियांचे लोंढे येतील, अशी शक्यता फुटीरतावादी व्यक्त करतात.
  • या सुनावणीविरोधात व मागणीविरोधात निषेध म्हणून जम्मू-काश्मीरमध्ये दोन दिवसांचा बंदही पाळण्यात आला.
  • नॅशनल कॉन्फरन्स, पीडीपी, सीपीएम आणि काँग्रेससह राजकीय पक्ष आणि फुटीरतावाद्यांची कलम ‘३५-ए’वर जैसे थे स्थिती ठेवण्याची मागणी आहे.

भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी कालवश

चालू घडामोडींच्या सखोल अभ्यासासाठी तसेच MPSC, PSI, STI, ADO व इतर अनेक परीक्षांच्या परिपूर्ण तयारीसाठी MPSC Toppersचे PDF स्वरूपातील ही नोट्स मोफत डाउनलोड करा.
नोट्स आवडल्यास आपल्या मित्र-मैत्रिणींना नक्की SHARE करा.
हे मासिक फक्त MPSC Toppers मोबाईल अॅपवर उपलब्ध आहे.
ही नोट्स मोफत PDF स्वरूपात डाउनलोड करण्यासाठी MPSC Toppersचे मोबाईल अॅप डाउनलोड करा.
Link : MPSC Toppers Mobile App (Version 3.0)
★ अभ्यासासाठी सर्वांना शुभेच्छा ★

नाविक: भारताची संपूर्ण स्वदेशी उपग्रह यंत्रणा

  • भारतीय अवकाश संशोधन संस्थेने २८ एप्रिल २०१६ रोजी ‘इंडियन रिजनल नेव्हिगेशन सॅटेलाईट सिस्टिम’ (आयआरएनएसएस) मालिकेतील सातवा उपग्रह श्रीहरिकोटा येथून यशस्वीरीत्या अवकाशात सोडला.
  • या यशस्वी प्रक्षेपणामुळे भारताची संपूर्ण स्वदेशी बनावटीची स्थितीदर्शक यंत्रणा (जीपीएस - ग्लोबल पोझिशनिंग सिस्टिम) पूर्णत्वास गेली आहे.
  • या यंत्रणेचे नामकरण पंतप्रधान मोदी यांनी ‘नाविक’ असे केले आहे.

अशी आहे यंत्रणा
  • या यंत्रणेत पृथ्वीभोवती ३६ हजार किमी उंचीवरून भ्रमण करणारे सात उपग्रह, भूभागावरील देखरेख आणि नियंत्रण करणारे नेटवर्क आणि लाभार्थींचा प्रत्येकी एक छोटा रिसिव्हर यांचा समावेश होतो.
  • प्रत्येक उपग्रहाचे वजन सुमारे १४०० किलो असून त्यावरचे सौर पॅनल १४०० वॅट ऊर्जा पुरवतील.
  • यातील प्रत्येक उपग्रहासाठी १५० कोटी, प्रक्षेपकासाठी प्रत्येकी १३० कोटी आणि भूभागावरील यंत्रणेसाठी एकूण ३०० कोटी रुपये खर्च आला आहे. 
अशी काम करते यंत्रणा
  • या यंत्रणेद्वारे ठिकाणांची माहिती अक्षांश, रेखांश व समुद्रसपाटीपासूनची उंची या तीन मितीमध्ये समजते.
  • उपग्रहाकडून आलेल्या रेडिओ संदेशांचे रिसिव्हरद्वारे विश्लेषण केले जाते आणि त्यानुसार ती व्यक्ती जमिनीपासून किती उंचीवर कोणत्या अक्षांश, रेखांशावर आहे हे ठरविले जाते. यासाठी किमान ३ उपग्रहांचे संदेश आवश्यक असतात.
  • अवकाशातील उपग्रहांच्या कक्षांची मांडणी अशी असते की पृथ्वीवरील यंत्रणाव्याप्त प्रदेशाच्या कोणत्याही ठिकाणापासून कोणत्याही क्षणाला या प्रणालीतील चार उपग्रह दिसू शकतात.
  • त्या ठिकाणच्या जीपीएस रिसिव्हरपासून त्या ४ उपग्रहांचे अंतर वेगवेगळे असते. उपग्रहांचे स्वतःचे ठिकाण आणि अचूक वेळ ही माहिती आणि प्रकाशाचा वेग यांच्याद्वारे पृथ्वीवरील रिसिव्हर उपग्रहापासूनचे स्वतःचे अंतर याची गणना करतो.
  • त्या अंतरातल्या फरकाचा उपयोग करून त्याच्यामध्ये असलेल्या संगणकाच्या साह्याने स्वतःच्या स्थानाबद्दल अचूक माहिती आणि वेळ प्राप्त होते. 
यंत्रणेची वैशिष्ट्ये
  • एकूण सात उपग्रह कार्यान्वित. या उपग्रहांकडून मिळणारी माहिती स्मार्टफोनवर थेटपणे वापरता येणार.
  • २० मीटर अंतरापर्यंतची अचूक माहिती मिळू शकणार. 
  • व्याप्ती - भारताचा संपूर्ण भूभाग तसेच बाहेरील १५ किलोमीटरचा पल्ला.
  • अचूक वेळेसाठी प्रत्येक उपग्रहात आण्विक घड्याळ.
  • १२ महिने २४ तास अखंड सेवा मिळणार. उपग्रहाचे आयुष्य १२ वर्षे असणार.
  • शेजारी देशांनाही सेवा देणार.
मिळणाऱ्या सेवा
  • स्थितिदर्शन, मार्गनिरीक्षण, मानचित्रण
  • दळणवळण, सर्वेक्षण, नकाशे तयार करणे.
  • विमाने, नौका यांना दिशादर्शनासाठी.
  • हायकर किंवा पर्यटकांना दिशादर्शनासाठी.
  • लष्करी उपयोगासाठीच्या इक्रिप्टेड विशेष सेवा.
  • आपत्तीमध्ये व्यवस्थापनासाठी.
अशा सेवा देणारे इतर प्रकल्प
  • जीपीएस: अमेरिकन अंतराळ संस्था नासाने विकसित केलेली ग्लोबल पोझिशनिंग सिस्टीम (जीपीएस) ही जगातील पहिली स्थितीदर्शक यंत्रणा आहे.
  • ग्लोनास: ही प्रणाली रशियाच्या ‘ग्लोबल ऑर्बिटिंग नैविगेशन सैटेलाइट’चे संक्षिप्त रूप आहे.
  • जीएनएसएस: ही प्रणाली यूरोपीय देशांद्वारे विकसित यूरोपियन यूनियनच्या ‘गॅलेलियो’चे संक्षिप्त रूप आहे. मात्र ही यंत्रणा अद्याप पूर्णत्वास गेलेली नाही.
  • याशिवाय चीनची बेइदोउ सैटेलाइट नैविगेशन सिस्टम व जपानची कासी-जेनिथ सैटेलाइट सिस्टम या प्रादेशिक पातळीवरील प्रणाली कार्यान्वित आहेत.
  • त्यामुळे जागतिक पातळीवर स्वतःची संपूर्ण जीपीएस यंत्रणा कार्यान्वित करणारा भारत हा अमेरिका आणि रशियानंतर तिसरा देश ठरला आहे.
आयआरएनएसएस उपग्रहांच्या प्रक्षेपणाचा इतिहास
उपग्रह प्रक्षेपण दिन कक्षा प्रक्षेपक
१ए १ जुलै २०१३ भूसमकालिक पीएसएलव्ही-सी २२
१बी ४ एप्रिल २०१४ भूसमकालिक पीएसएलव्ही-सी २४
१सी १६ ऑक्टोबर २०१४ भूस्थिर पीएसएलव्ही-सी २६
१डी २८ मार्च २०१५ भूसमकालिक पीएसएलव्ही-सी २७
१ई २० जानेवारी २०१६ भूसमकालिक पीएसएलव्ही-सी ३१
१एफ १० मार्च २०१६ भूस्थिर पीएसएलव्ही-सी ३२
१जी २८ एप्रिल २०१६ भूस्थिर पीएसएलव्ही-सी ३३