चालू घडामोडी : १५ ऑगस्ट

स्वातंत्र्यादिनाच्या पंतप्रधानांच्या भाषणाची वैशिष्ट्ये

  • भारताच्या ७०व्या स्वातंत्र्यादिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लाल किल्ल्यावरून देशवासियांना संबोधित केले.
 पंतप्रधानांच्या भाषणातील ठळक मुद्दे 
  • सशक्त भारत हा सशक्य समाजाशिवाय होऊ शकत नाही. सशक्त समाज हा सामाजिक न्यायाशिवाय शक्य नाही, त्यामुळे प्रत्येकाने सामाजिक न्याय जपला पाहिजे.
  • सशक्त समाजाशिवाय देशाची प्रगती अशक्य आहे. सर्व जातींचा सन्मान केला पाहिजे. दलित, वंचित असो, आदिवासी, साक्षर किंवा निरक्षर, सर्व आमचे कुटुंब आहे.
  • एक भारत, श्रेष्ठ भारतचे स्वप्न आम्ही पूर्ण करू.
  • स्वातंत्र्यदिन नवा संकल्प घेऊन आला आहे.
  • उपनिषद ते उपग्रह, महाभारतातला भीम ते भीमराव, सुदर्शन चक्रधारी मोहन ते चरखा चक्रधारी मोहन हा भारताचा इतिहास आहे.
  • सरदार पटेल यांनी देशाला एक बनविले, आता आपल्याला श्रेष्ठ करायचे आहे.
  • वेद ते विवेकानंदांपर्यंतचा भारताचा प्रवास आहे.
  • स्वराज्याला सुराज्यामध्ये परिवर्तन करण्याचा संकल्प देशवासियांनी केला पाहिजे. आशा आणि अपेक्षा असतील तरच सुराज्याकडे आपण जाऊ शकतो.
  • गेल्या दोन वर्षांत आम्ही जनतेची कामे केली. काम करण्यासाठी नियत आणि जबाबदारीची गरज आहे.
  • आता आठवडाभरात पासपोर्ट मिळतो, २०१५-१६ या वर्षात आम्ही पावणे दोन कोटी पासपोर्ट दिले.
  • प्राप्तीकर रिफंड आता फक्त तीन आठवड्यात मिळतो आणि तोही थेट बँक खात्यात जमा होतो.
  • आगोदर ७०-७५ किमीचे रस्ते रोज बनत होते. आज दररोज प्रतिदीन १०० किमीचे रस्ते बनविले जात आहेत.
  • एक काळ होता जेव्हा सरकार आरोपांनी घेरले होते, पण आमचे सरकार अपेक्षांनी घेरलेले आहे.
  • ९ हजार पदांसाठी तरुणांची मुलाखत न घेता नोकरीची संधी देण्यात आली.
  • गेल्या ६० वर्षांत केवळ १४ कोटी गॅस कनेक्शन देण्यात आली होती. पण, गेल्या सहा आठवड्यात ४ कोटी गॅस कनेक्शन देण्यात आली आहेत.
  • देशातील ७० कोटी नागरिक आधारकार्डशी जोडले गेले आहेत.
  • जनधन योजनेच्या माध्यमातून २१ कोटी नागरिकांना जोडण्यात आले आहे.
  • नागरिकांनी आपल्या एलईडी बल्ब लावून देशाचे सव्वालाख कोटी रुपये वाचविले पाहिजेत. आतापर्यंत १७ कोटी बल्ब वाटले गेले. ७७ कोटी बल्ब वाटण्याचे ध्येय आहे.
  • देशातील १० हजार गावांत वीज पोहचविण्यात आम्हाला यश आले आहे.
  • गेल्या सरकारच्या काळात महागाईच दर १० टक्क्यांवर गेला होता. आम्ही महागाई नियंत्रित ठेवण्याचा प्रय़त्न करत महागाई दर ६ टक्क्यांवर जाऊ दिला नाही.
  • सरकार शेतकऱ्यांच्या पाठिशी आहे. आम्ही जलसिंचन, जलसंरक्षणावर भर देत, शेतकऱ्यांसाठी पाणी कसे उपयोगी येईल याकडे लक्ष दिले आहे.
  • २०२२ मध्ये शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याचे उद्दीष्ट आहे
  • एअर इंडिया, बीएसएनएल, शिपिंग कार्पोरेशन ऑफ इंडिया यांना फायद्यात आणण्यात यश आले आहे.
  • महिलांचे सशक्तीकरण करण्यात येईल. गरिबीविरोधात लढाई लढण्यासाठी महिलांची संपन्नता असणे आवश्यक आहे.
  • मुद्रा योजनेचा फायदा साडेतीन कोटी नागरिकांनी घेतला आहे.
  • महिलांना प्रसुती रजा २६ आठवड्यांची करण्यात आली आहे.
  • बुलेट ट्रेन लवकरच भारतात धावणार.
  • जीएसटीच्या माध्यमातून करप्रणालीत समानता आणण्याचा प्रयत्न केला.
  • युवा शक्तीला अधिकाधिक शक्ती दिल्याने देश सशक्त होईल.
  • नक्षलवाद किंवा दहशतवादासमोर देश झुकणार नाही.
  • विविधतेतून एकता ही आपली सर्वात मोठी ताकद
  • बलुचिस्तान, पाकव्याप्त काश्मीरमधील नागरिकांनी माझे अभिनंदन केल्याने मी त्यांचे आभार मानतो.
  • स्वातंत्र्यसैनिकांच्या निवृत्तीवेतनामध्ये २० टक्के वाढ करण्याचा निर्णय घेण्यात येत आहे.

हंगपान दादा यांना मरणोत्तर अशोकचक्र

  • हिमालयात पाकिस्तानी घुसखोरांना कंठस्नान घालत देशासाठी प्राणार्पण करणारे हवालदार हंगपान दादा यांना मरणोत्तर अशोकचक्र जाहीर झाले आहे.
  • स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला राष्ट्रपतींकडून अशोकचक्रासमवेत, १४ शौर्यचक्रे, ६३ सेनापदके, २ नौसेना पदके आणि २ वायूसेना पदकांची घोषणा करण्यात आली. 
  • मागील वर्षी गोव्यामध्ये अपघातग्रस्त झालेल्या डॉर्नियर विमानामधून दोन जवानांचे मृतदेह बाहेर काढणारे नौदलाचे खलाशी वीर सिंह आणि लेफ्टनंट कमांडर विकासकुमार नरवाल यांना नौसेना पदक जाहीर झाले आहे.
  • स्क्वाड्रन लीडर अभिषेकसिंह तन्वर आणि स्क्वाड्रन लीडर भावेशकुमार दुबे यांची वायू सेना मेडलसाठी निवड झाली.
  • भारतीय तटरक्षक दलाचे कमांडंट राधाकृष्ण राजेश नांबिराज आणि कुलदीप प्रधान यांत्रिक यांना तटरक्षक पदक बहाल केले जाणार आहे.
  • लष्कराला एक अशोकचक्र (मरणोत्तर), ११ शौर्यचक्रे (यातील ६ मरणोत्तर) आणि ६३ सेनापदके जाहीर झाली असून, यातील १२ ही मरणोत्तर बहाल केली जाणार आहेत.
  • ‘ऑपरेशन मेघदूत’, ‘ऑपरेशन रक्षक’ आणि ‘ऑपरेशन ऱ्हिनो’ यांसारख्या मोहिमांमध्ये उल्लेखनीय कामगारी करणाऱ्या जवानांसाठीही २८ शौर्यपदके जाहीर झाली आहेत.
  • यावर्षी मुंबईतील अग्नितांडवामध्ये कर्तव्य बजावताना हुतात्मा झालेल्या अग्निशामक दलाच्या चौघा कर्मचाऱ्यांनाही राष्ट्रपती शौर्यपदके जाहीर झाले आहेत.

दीपा कर्माकरला पदकाची हुलकावणी

  • रिओ ऑलिम्पिक स्पर्धेत जिम्नॅस्टिक व्हॉल्ट प्रकारात भारताचे प्रतिनिधित्व करणाऱ्या दीपा कर्माकरचे अंतिम फेरीत कांस्य पदक थोडक्यात हुकले.
  • दीपाला अंतिम फेरीत दोन प्रयत्नांत सरासरी १५.०६६ गुणांसह क्रमवारीत चौथ्या स्थानावर समाधान मानावे लागले.
  • अमेरिकेच्या सिमॉन बाईल्सने १५.९६६ गुणांसह सुवर्ण; तर रशियाच्या मारिया पासेकाने १५.२५३ गुणांसह रौप्यपदक जिंकले. स्वित्झर्लंडच्या गिरुलिया स्टीनग्रुबेर हिने १५.२१६ गुणांसह कांस्य पदक मिळविले.
  • ऑलिम्पिकच्या व्हॉल्ट जिम्नॅस्टिक्स प्रकारात अंतिम फेरी गाठण्याचा पराक्रम करणारी दीपा ही भारताची पहिलीच जिम्नॅस्टिक्सपटू आहे.
  • दीपाने अंतिम फेरीत आपल्या पहिल्या प्रयत्नात यशस्वी लँडींग केले, तर दुसऱ्या प्रकारात तिने जिम्नॅस्टिक्समधील सर्वात कठीण मानल्या जाणारा प्रोड्युनोव्हा प्रकार केला.
  • ०.१५० गुणांनी दीपाचे कांस्य पदक हुकले. ‘प्रोड्युनोव्हा’मध्ये तिचा आव्हानांचा स्तर हा इतर खेळाडूंच्या तुलनेत अधिक होता.
 प्रोड्युनोवाबद्दल 
  • कलात्मक जिम्नॅस्टिक वॉल्ट प्रकारात धावत येऊन उडी घेताना दोन्ही हात गुडघ्याजवळ ठेवून चार फिल्प्स घेऊन मॅटवर यशस्वीरित्या उभे राहण्याचा हा जिम्नॅस्टिक्समधील सर्वात कठीण प्रकार आहे.
  • रशियाची माजी जिम्नॅस्टिक्सपटू येलेना प्रोड्युनोव्हा हिने १९९९साली जागतिक चॅम्पियनशिप स्पर्धेत जिम्नॅस्टिक्स वॉल्टमधील हा कठीण प्रकार यशस्वीरित्या पूर्ण केला. तेव्हापासून या प्रकाराला ‘प्रोड्युनोवा’ असे नाव देण्यात आले.
  • प्रोड्युनोव्हा प्रकार आतापर्यंत केवळ पाच जिम्नॅस्टिक्सपटूंनी यशस्वीरित्या पूर्ण केला आहे. त्यामध्ये भारताच्या दीपा कर्माकरचा समावेश आहे.

उसेन बोल्टची हॅटट्रिक

  • जमैकाच्या उसेन बोल्ट याने ऑलिंपिक स्पर्धेत इतिहास घडवला. ऑलिंपिक स्पर्धेच्या १०० मीटर शर्यतीचे त्याने सलग तिसरे विजेतेपद मिळवून त्याने हॅटट्रिक साधली. 
  • अमेरिकेचा आव्हानवीर जस्टिन गॅटलिन याला शह देत बोल्टने ९.८१ सेकंद अशी वेळ देत सुवर्णपदक पटकावले.
  • जस्टिन गॅटलिन ९.८९ सेकंद वेळेसह रौप्य तर कॅनडाच्या आंद्रे डी ग्रेसी ९.९१ सेकंदासह बॉंझपदकाचा मानकरी ठरला.
  • यापूर्वी १०० मीटरमध्ये अमेरिकेच्या आर्ची हान (१९०४ व १९०८) आणि कार्ल लुईस (८४ व ८८) यांना सलग सुवर्णपदक मिळविता आले होते.
 उसेन बोल्ट 
  • बोल्टने २०११च्या जागतिक स्पर्धेतील अपयशाचा अपवाद वगळता २००८पासून या प्रकारातील प्रत्येक शर्यत जिंकली आहे. त्या वेळी त्याला चुकीच्या सुरवातीमुळे अपात्र ठरवण्यात आले होते. 
  • आठ वर्षाच्या कालावधीत बोल्टने ५ ऑलिंपिक सुवर्ण, रिले शर्यतीमधील २ सुवर्ण, ७ जागतिक विजेतीपदे आणि या तीनही प्रकारातील विश्वविक्रम असे निर्विवाद वर्चस्व राखले आहे.
  • २००९च्या बर्लिनमधील जागतिक स्पर्धेत बोल्टने १०० मीटरमध्ये ९.५८ सेकंद, तर २०० मीटरमध्ये १९.१९ सेकंद अशा विश्वविक्रमांची नोंद केली.

जगातील पहिला ‘अँटी हॅकिंग’ उपग्रह

  • चीनने जगातील पहिला क्वांटम संदेशवहन उपग्रह पाठवण्याचे ठरवले असून त्यामुळे वायर टॅपिंग व कॉल चोरून ऐकणे असे प्रकार करता येणार नाहीत.
  • या उपग्रहामध्ये हॅकरना रोखण्यासाठी उच्च सुरक्षा साधनांचा समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे या उपग्रहाद्वारे हॅकिंगमुक्त संदेशवहन प्रणाली उपलब्ध होईल.
 निर्मिती 
  • जुलै २०१५मध्ये प्रयोगशाळा चीन विज्ञान अकादमी व शांघायची इंटरनेट कंपनी अलिबाबा यांनी क्वांटम कॉम्प्युटिंग प्रयोगशाळेची निर्मिती केली.
  • ही प्रयोगशाळा क्वांटम संगणकाचे प्रारूप तयार करीत असून, तो संगणक २०३० पर्यंत तयार होईल.
  • पुंज (क्वांटम) यांत्रिकीमध्ये माहितीचे संरक्षण केले जाते, त्यात फोटॉन कणांमध्ये माहिती साठवलेली असते त्यामुळे ती वेगळी काढता येत नाही किंवा त्याची नक्कलही करता येत नाही.
  • त्यामुळे वायरटॅप किंवा माहितीची चोरी हे दोन्ही प्रकार यात शक्य नसतात. उलट कुणी माहिती चोरण्याचा प्रयत्न करीत असेल तर ते लगेच समजते. तसेच जी माहिती चोरण्याचा प्रयत्न केला जातो ती स्वनाश पावते.
  • चीन असा जगातील पहिला सुरक्षित संदेशवहन उपग्रह तयार करीत असून तो यावर्षांतच पाठवला जाईल.
 उपयोग 
  • आर्थिक सेवा, शासकीय व्यवहार, तसेच इलेक्ट्रॉनिक क्षेत्रामध्ये या क्वॉंटमचा उपयोग करण्यात येणार आहे.
  • ऑनलाइन बॅंकिंग तसेच ऑनलाइन पेमेंटच्या सुरक्षिततेसाठी क्वांटम सेवेचा सर्वाधिक उपयोग करता येणार आहे.
  • संरक्षणविषयक तसेच देशहिताच्या माहितीचे जतन व संरक्षणाचे महत्त्वपूर्ण कामही याद्वारे करणे शक्य होणार आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा