चालू घडामोडी : २८ एप्रिल

सर्वाधिक भ्रष्टाचारी राज्यांमध्ये महाराष्ट्र चौथ्या स्थानी

  • ‘सेंटर फॉर मीडिया स्टडीज’ने केलेल्या सर्वेक्षणानुसार देशभरात सर्वाधिक भ्रष्टाचार असलेल्या राज्यांच्या यादीत महाराष्ट्र चौथ्या स्थानावर आहे.
  • या यादीत कर्नाटक पहिल्या स्थानी असून त्यापाठोपाठ आंध्रप्रदेश, तामिळनाडू, महाराष्ट्र, जम्मू काश्मीर आणि पंजाब या राज्यांचा क्रमांक लागतो.
  • हिमाचल प्रदेशमध्ये सर्वात कमी भ्रष्टाचार झाल्याचे या सर्वेक्षणातून समोर आले. हिमाचल प्रदेश नंतर केरळ आणि छत्तीसगडमध्ये सर्वात कमी भ्रष्टाचार आहे.
  • देशभरातील २० राज्यांमध्ये हे सर्वेक्षण करण्यात आले. शहरी आणि ग्रामीण भागातील ३ हजारहून अधिक लोकांशी चर्चा करुन हा अहवाल तयार करण्यात आला.
  • सरकारी कामांसाठी देण्यात येणारी लाच आणि भ्रष्टाचाराच्या आधारे लाचखोर राज्यांची यादी तयार करण्यात आली आहे. 
  • २० राज्यांमधून २०१७या वर्षात सुमारे ६,३५० कोटी रुपयांची लाच दिल्याचे सर्वेक्षणातून समोर आले आहे.
  • २००५ च्या तुलनेत हा आकडा कमी आहे. २००५ मध्ये सुमारे २०,५०० कोटी रुपयांची लाच दिल्याचे समोर आले होते.
  • नोटाबंदीनंतर नागरी सेवेतील भ्रष्टाचाराचे प्रमाण कमी झाले असे मत अनेकांनी मांडल्याचे अहवालात म्हटले आहे.
  • सरकारी कामातील भ्रष्टाचार, लाचखोरी कमी करण्यासाठी खूप काही करण्याची गरज असल्याचे सर्व्हेत सांगण्यात आले आहे.

आशियाई ग्रांप्री स्पर्धेच्या दुसऱ्या टप्प्यात भारताला सहा पदके

  • आशियाई ग्रांप्री ॲथलेटिक्स स्पर्धेतील दुसऱ्या टप्यात भारताच्या व्ही नीना हिने लांब उडीत सुवर्णपदक जिंकले. पहिल्या टप्प्यात नीनाला रौप्यपदक मिळाले होते.
  • तसेच भारताच्या ज्युनिअर विश्वविजेत्या नीरज चोप्राने भालाफेकीत रौप्यपदक मिळवत लंडन येथे होणाऱ्या विश्व ॲथलेटिक्स स्पर्धेची पात्रता गाठली आहे.
  • नीरजने चौथ्या प्रयत्नात ८३.३२ मीटर भाला फेकला आणि लंडनसाठी असलेली ८३ मीटरची पात्रता पार केली.
  • पहिल्या टप्प्यातील विजेता तैवानच्या चेंग चाओने विजयी मालिका कायम ठेवत ८६.९२ मीटर कामगिरीसह सुवर्णपदक जिंकले.
  • गोळाफेकमध्ये पहिल्या टप्प्यात सुवर्णपदकासह लंडनची पात्रता गाठणाऱ्या मनप्रीत कौरला दुसऱ्या टप्प्यात रौप्यपदकावर समाधान मानावे लागले.
  • महिलांच्या ८०० मीटर शर्यतीत टिंटू लुकाने २ मिनिटे ६.३२ सेकंदात रौप्य तर १०० मीटर शर्यतीत द्युती चंदने ११.५७ सेकंदात रौप्यपदक जिंकले. ओमप्रकाश करानाने गोळाफेकमध्ये ब्राँझपदकाची कमाई केली.

भारत बनणार जगातील चौथ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था

  • २०२२मध्ये भारत जर्मनीला मागे टाकून जगातील चौथ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था होईल, असा अंदाज आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने (आयएमएफ) वर्तवला आहे.
  • भारतीय अर्थव्यवस्थेचा आकार वाढल्यामुळे आता ब्रिटन जगातील पहिल्या पाच अर्थव्यवस्थांमधील आपले स्थान गमावणार आहे.
 आयएमएफच्या अहवालातील ठळक मुद्दे 
  • भारतीय अर्थव्यवस्थेला येत्या काळात बऱ्याच अडचणींचा सामना करावा लागेल.
  • कर रचना, घटलेले उत्पादन, शाश्वत विकासासह रोजगार निर्मिती, कॉर्पोरेट क्षेत्रातून होणारी गुंतवणूक आणि पायाभूत सोयी सुविधांची कमतरता ही येत्या काळातील भारतीय अर्थव्यवस्थेसमोरील मोठी आव्हाने असतील.
  • भारताची अर्थव्यवस्था नोटाबंदीच्या निर्णयातून अद्याप सावरत आहे. नोटाबंदीमुळे बाजारातील तब्बल ८६ टक्के चलन रद्द झाले होते.
  • भारतात वस्तू आणि सेवा कर कायदा १ जुलैपासून लागू होणार आहे. जीएसटी भारतीय अर्थव्यवस्थेसाठी किती फायदेशीर ठरेल, याबद्दल अर्थतज्ज्ञ साशंक आहेत.
  • बुडीत कर्जे, पुनर्रचना करण्यात आलेली कर्जे यामुळे भारतीय बँकिंग क्षेत्राची स्थिती फारशी उत्तम नाही.
  • बुडीत खात्यात गेलेल्या कर्जाचे प्रमाण वाढल्याने बँकांनी कर्जवसुलीवर लक्ष केंद्रीत केले आहे. त्यामुळे बँका सध्या नवे कर्ज देण्याच्या प्रयत्नात नाहीत.
  • त्यामुळे गुंतवणूक क्षेत्रातील आव्हाने वाढली आहेत. परिणामी रोजगार निर्मितीचे प्रमाण कमी झाले आहे.

उत्तर प्रदेशमध्ये भाग्यलक्ष्मी योजना

  • उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी गरीब कुटुंबात मुलगी जन्माला आली की ५० हजार रुपयांचा बॉंड देण्याचे जाहीर केले आहे.
  • भाग्यलक्ष्मी योजनेअंतर्गत हा उपक्रम सुरु करण्यात येणार असून. मुलीच्या आईलाही ५,१०० रुपये मिळणार आहेत.
  • उत्तर प्रदेश सरकारच्या महिला कल्याण विभागातर्फे या योजनेसाठी आराखडा तयार करण्याचे काम सुरू झाले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा