चालू घडामोडी : २४ मे

प्रचंड यांचा नेपाळच्या पंतप्रधानपदाचा राजीनामा

  • नेपाळचे पंतप्रधान पुष्प कमल दहल उर्फ प्रचंड यांनी पंतप्रधान पदाचा राजीनामा दिला आहे. ६२ वर्षीय दहल हे नेपाळचे ३९वे पंतप्रधान होते.
  • सत्तेत सहभागी असलेल्या नेपाळी काँग्रेसला पंतप्रधानपदावर संधी मिळावी यासाठी दहल यांनी राजीनामा दिला.
  • नेपाळी काँग्रेस तसेच मधेशी पक्षांनी दहल यांच्या उमेदवारीस पाठिंबा दिल्याने ऑगस्ट २०१६मध्ये दहल पंतप्रधानपदी विराजमान झाले होते.
  • त्यांना नेपाळी काँग्रेसने सशर्त पाठिंबा दिला होता. या पाठिंब्यासाठी झालेल्या करारानुसार २०१८पर्यंत दोन्ही पक्षाच्या नेत्यांना पंतप्रधानपदावर संधी दिली जाणार होती.
  • प्रचंड हे दुसऱ्यांदा पंतप्रधान झाले होते. यापूर्वी २००८साली प्रचंड हे अल्प काळासाठी पंतप्रधानपदी विराजमान झाले होते.
  • २००९मध्ये तत्कालीन सेनाप्रमुखांना बरखास्त करण्याचा त्यांचा प्रयत्न होता. या मुद्द्यावरून लष्कराशी त्यांचे तीव्र मतभेद झाल्याने त्यांना पंतप्रधानपद सोडावे लागले होते.
  • प्रचंड यांच्या राजीनाम्यानंतर नेपाळी काँग्रेसचे अध्यक्ष शेर बहादुर देउबा यांचा पतंप्रधान होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
  • नेपाळच्या राष्ट्रपती: विद्यादेवी भंडारी 

बांगलादेशी शिल्पकार सय्यद अब्दुल्ला खालिद यांचे निधन

  • १९७१च्या बांगलादेश मुक्तिलढय़ाची आठवण असणारे स्मारकशिल्प ‘अपराजेय बांगला’ घडविणारे शिल्पकार सय्यद अब्दुल्ला खालिद यांचे २० मे रोजी निधन झाले.
  • १९४२ साली जन्मलेल्या खालिद यांनी तेव्हाच्या ‘ईस्ट पाकिस्तान कॉलेज ऑफ आर्ट्स अ‍ॅण्ड क्राफ्ट्स’ (आता ढाका विद्यापीठाचा दृश्यकला विभाग)मधून १९६९साली पदवी मिळवली.
  • बांगलादेश निर्मितीनंतर त्यांनी चित्तगाव येथील कला महाविद्यालयात अध्यापकाची नोकरी मिळवली.
  • मुक्तिलढय़ाच्या स्मारकशिल्पासाठी विद्यापीठाने सन १९७३मध्ये खुल्या स्पर्धेद्वारे प्रस्ताव मागवले. त्यातून खालिद यांची संकल्पना निवडली गेली.
  • ‘मधोमध उंचापुरा ग्रामीण बांगला तरुण- त्याच्या खांद्यावर तीरकामठा, त्याच्या डाव्या बाजूला बंदूकधारी आणि शहरी कपडय़ांतला तरुण, तर उजव्या बाजूला निर्धाराने या दोघांसह चालणारी एक स्त्री आणि तिच्या खांद्यावर प्रथमोपचार पेटी.’ अशी या शिल्पाची संकल्पना होती.
  • १९७९मध्ये या स्मारकाचे अनावरण झाले. १९९१मध्ये या शिल्पाचे टपाल तिकीट आणि १९९८मध्ये चांदीचे स्मृतिनाणे काढून बांगलादेश सरकारने ‘अपराजेय बांगला’ अजरामर केले.
  • या शिल्पानंतर खालिद देशभर पोहोचले. त्यांना अनेक मानसन्मान मिळाले. २०१७मध्ये त्यांना ‘इकुशे पदक’ या राष्ट्रीय सन्मानाने गौरवण्यात आले.

तैवानमध्ये समलैंगिक विवाहाला मान्यता

  • तैवान या देशामध्ये समलैंगिक विवाहाला कायदेशीर मान्यता देण्यात आली आहे. अशी मान्यता देणारा आशिया खंडातील तैवान हा पहिलाच देश आहे.
  • या न्यायलयीन प्रकरणासाठी तैवानमध्ये १४ जणांच्या वरिष्ठ न्यायाधीशांचे पॅनेल नियुक्त करण्यात आले होते, त्यांनी हा महत्त्वपूर्ण निकाल दिला आहे.
  • या निर्णयामुळे भिन्नलिंगी व्यक्तींना विवाहासाठी असणारे सर्व अधिकार समलैंगिक व्यक्तींना मिळणार असल्याचे न्यायालयाने यावेळी स्पष्ट केले.
  • २०१०मध्ये अर्जेंटिनामध्ये पहिल्यांदा हा कायदा लागू झाला आणि त्याठिकाणी एका समलैंगिक जोडप्याने विवाह केला होता.
  • त्यानंतर ऑस्ट्रेलियामध्येही याबाबतचा कायदा २०१३मध्ये करण्यात आला होता. मात्र काही कारणाने तो अवघ्या ५ दिवसांत रद्द करण्यात आला होता.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा