नेपाळचे पंतप्रधान पुष्प कमल दहल उर्फ प्रचंड यांनी पंतप्रधान पदाचा राजीनामा दिला आहे. ६२ वर्षीय दहल हे नेपाळचे ३९वे पंतप्रधान होते.
सत्तेत सहभागी असलेल्या नेपाळी काँग्रेसला पंतप्रधानपदावर संधी मिळावी यासाठी दहल यांनी राजीनामा दिला.
नेपाळी काँग्रेस तसेच मधेशी पक्षांनी दहल यांच्या उमेदवारीस पाठिंबा दिल्याने ऑगस्ट २०१६मध्ये दहल पंतप्रधानपदी विराजमान झाले होते.
त्यांना नेपाळी काँग्रेसने सशर्त पाठिंबा दिला होता. या पाठिंब्यासाठी झालेल्या करारानुसार २०१८पर्यंत दोन्ही पक्षाच्या नेत्यांना पंतप्रधानपदावर संधी दिली जाणार होती.
प्रचंड हे दुसऱ्यांदा पंतप्रधान झाले होते. यापूर्वी २००८साली प्रचंड हे अल्प काळासाठी पंतप्रधानपदी विराजमान झाले होते.
२००९मध्ये तत्कालीन सेनाप्रमुखांना बरखास्त करण्याचा त्यांचा प्रयत्न होता. या मुद्द्यावरून लष्कराशी त्यांचे तीव्र मतभेद झाल्याने त्यांना पंतप्रधानपद सोडावे लागले होते.
प्रचंड यांच्या राजीनाम्यानंतर नेपाळी काँग्रेसचे अध्यक्ष शेर बहादुर देउबा यांचा पतंप्रधान होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
नेपाळच्या राष्ट्रपती: विद्यादेवी भंडारी
बांगलादेशी शिल्पकार सय्यद अब्दुल्ला खालिद यांचे निधन
१९७१च्या बांगलादेश मुक्तिलढय़ाची आठवण असणारे स्मारकशिल्प‘अपराजेय बांगला’ घडविणारे शिल्पकार सय्यद अब्दुल्ला खालिद यांचे २० मे रोजी निधन झाले.
१९४२ साली जन्मलेल्या खालिद यांनी तेव्हाच्या ‘ईस्ट पाकिस्तान कॉलेज ऑफ आर्ट्स अॅण्ड क्राफ्ट्स’ (आता ढाका विद्यापीठाचा दृश्यकला विभाग)मधून १९६९साली पदवी मिळवली.
बांगलादेश निर्मितीनंतर त्यांनी चित्तगाव येथील कला महाविद्यालयात अध्यापकाची नोकरी मिळवली.
मुक्तिलढय़ाच्या स्मारकशिल्पासाठी विद्यापीठाने सन १९७३मध्ये खुल्या स्पर्धेद्वारे प्रस्ताव मागवले. त्यातून खालिद यांची संकल्पना निवडली गेली.
‘मधोमध उंचापुरा ग्रामीण बांगला तरुण- त्याच्या खांद्यावर तीरकामठा, त्याच्या डाव्या बाजूला बंदूकधारी आणि शहरी कपडय़ांतला तरुण, तर उजव्या बाजूला निर्धाराने या दोघांसह चालणारी एक स्त्री आणि तिच्या खांद्यावर प्रथमोपचार पेटी.’ अशी या शिल्पाची संकल्पना होती.
१९७९मध्ये या स्मारकाचे अनावरण झाले. १९९१मध्ये या शिल्पाचे टपाल तिकीट आणि १९९८मध्ये चांदीचे स्मृतिनाणे काढून बांगलादेश सरकारने ‘अपराजेय बांगला’ अजरामर केले.
या शिल्पानंतर खालिद देशभर पोहोचले. त्यांना अनेक मानसन्मान मिळाले. २०१७मध्ये त्यांना ‘इकुशे पदक’ या राष्ट्रीय सन्मानाने गौरवण्यात आले.
तैवानमध्ये समलैंगिक विवाहाला मान्यता
तैवान या देशामध्ये समलैंगिक विवाहाला कायदेशीर मान्यता देण्यात आली आहे. अशी मान्यता देणारा आशिया खंडातील तैवान हा पहिलाच देश आहे.
या न्यायलयीन प्रकरणासाठी तैवानमध्ये १४ जणांच्या वरिष्ठ न्यायाधीशांचे पॅनेल नियुक्त करण्यात आले होते, त्यांनी हा महत्त्वपूर्ण निकाल दिला आहे.
या निर्णयामुळे भिन्नलिंगी व्यक्तींना विवाहासाठी असणारे सर्व अधिकार समलैंगिक व्यक्तींना मिळणार असल्याचे न्यायालयाने यावेळी स्पष्ट केले.
२०१०मध्ये अर्जेंटिनामध्ये पहिल्यांदा हा कायदा लागू झाला आणि त्याठिकाणी एका समलैंगिक जोडप्याने विवाह केला होता.
त्यानंतर ऑस्ट्रेलियामध्येही याबाबतचा कायदा २०१३मध्ये करण्यात आला होता. मात्र काही कारणाने तो अवघ्या ५ दिवसांत रद्द करण्यात आला होता.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा