चालू घडामोडी : २२ डिसेंबर

अश्विनला क्रिकेटर ऑफ द इअर पुरस्कार

  • आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेकडूच्या (आयसीसी) ‘क्रिकेटर ऑफ द इअर’ पुरस्कारासाठी भारताचा अष्टपैलू खेळाडू रवीचंद्रन अश्विनची निवड झाली आहे.
  • यासाठी आश्विनला सर गारफिल्ड सोबर्स ट्रॉफीने गौरविण्यात येईल. ही ट्रॉफी जिंकणारा आश्विन भारतात तिसरा तसेच जगात १२वा खेळाडू आहे.
  • याआधी २००४ मध्ये राहुल द्रविड आणि २०१० मध्ये सचिन तेंडुलकर यांना हा पुरस्कार मिळाला होता.
  • याशिवाय अश्विनला ‘टेस्ट क्रिकेटर ऑफ द इअर’चाही पुरस्कार मिळाला आहे. राहुल द्रविड (२००४) आणि गौतम गंभीर (२००९) यांच्यानंतर हा पुरस्कार मिळवणारा अश्विन भारताचा तिसरा क्रिकेटपटू आहे. 
  • सर्वोत्कृष्ट क्रिकेटपटू आणि सर्वोत्कृष्ट कसोटीपटू हे दोन्ही पुरस्कार एकाच वर्षी मिळवणारा अश्विन हा दुसरा भारतीय खेळाडू ठरला. यापूर्वी द्रविडने २००४मध्ये हा पराक्रम केला होता.
  • याशिवाय आयसीसीने जाहीर केलेल्या कसोटी संघामध्ये स्थान मिळवणारा अश्विन हा एकमेव भारतीय क्रिकेटपटू आहे.
  • आयसीसीच्या कसोटी संघाचे नेतृत्त्व इंग्लंडच्या अॅलिस्टर कुक याला तर एकदिवसीय संघाचे नेतृत्त्व विराट कोहलीला देण्यात आले आहे.
  • आयसीसीच्या एकदिवसीय संघात रवींद्र जडेजा आणि रोहित शर्मा यांनाही स्थान मिळाले आहे.
  • आंतरराष्ट्रीय क्रिकेट विश्वात १४ सप्टेंबर २०१५ ते २० सप्टेंबर २०१६ या वर्षभरात केलेल्या सर्वोत्कृष्ट कामगिरीच्या आधारावर पुरस्कार दिले जातात.
पुरस्कार खेळाडू
सर्वोत्कृष्ट एकदिवसीय खेळाडू क्विंटन डी कॉक (दक्षिण आफ्रिका)
टी-२० परफॉर्मर ऑफ द इयर कार्लोस ब्रेथवेट (वेस्ट इंडीज)
स्पिरीट ऑफ क्रिकेट मिस्बा उल हक (पाकिस्तान)
युवा प्रतिभावान खेळाडू मुस्तफिझूर रेहमान (बांगलादेश)
आयसीसीच्या सहयोगी देशांतील सर्वोत्कृष्ट खेळाडू मोहम्मद शेहजाद (अफगाणिस्तान)
सर्वोत्कृष्ट एकदिवसीय खेळाडू (महिला) सुझी बेट्स (न्यूझीलंड)
सर्वोत्कृष्ट टी-२० खेळाडू (महिला) सुझी बेट्स (न्यूझीलंड)
सर्वोत्कृष्ट पंच मरेइस इरॅस्मस

दिल्लीते नायब राज्यपाल नजीब जंग यांचा राजीनामा

  • दिल्लीते नायब राज्यपाल नजीब जंग यांनी गृहमंत्रालयाकडे राजीनामा दिला आहे. राजीनाम्याचे कारण अद्याप अस्पष्ट आहे.
  • जंग यांचा कार्यकाळ संपण्यासाठी दीड वर्षांचा कालावधी बाकी असताना त्यांनी राजीनामा दिला आहे.
  • आप सरकार दिल्लीत सत्तेत आल्यानंतर दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि आम आदमी पार्टी यांच्याशी जंग यांचे सातत्याने खटके उडाले.
  • जंग हे ‘केंद्र सरकारचे हस्तक’ असून दिल्ली सरकारच्या कामात ते अडथळे आणतात अशी टीका केजरीवाल वारंवार करायचे.
  • ६५ वर्षीय नजीब जंग हे निवृत्त आयएएस अधिकारी आहेत. तसेच, जामिया मिलिया इस्लामिया विद्यापीठाचे ते उपकुलगुरुही होते.
  • २०१३च्या जुलैमध्ये त्यांनी दिल्लीचे नायब राज्यपालपद स्वीकारले होते. जंग हे दिल्लीचे २०वे नायब राज्यपाल आहेत.

बीएफआयला आंतरराष्ट्रीय बॉक्सिंग असोसिएशनचे पूर्ण सदस्यत्व

  • सप्टेंबरमध्ये कार्यान्वित झालेल्या भारतीय बॉक्सिंग महासंघास (बीएफआय) आंतरराष्ट्रीय बॉक्सिंग असोसिएशनचे पूर्ण सदस्यत्व देण्यात आले आहे.
  • मॉन्ट्र्यू, स्वीत्झर्लंड येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय बॉक्सिंग असोसिएशनच्या ७०व्या वार्षिक बैठकीत बीएफआयला पूर्ण सदस्यत्व दिले आहे.
  • पण भारतीय ऑलिंपिक संघटनेने अजय सिंग अध्यक्ष असलेल्या या महासंघास अद्याप मान्यता दिलेली नाही.
  • चार वर्षांपूर्वी म्हणजे २०१२मध्ये निवडणुकीत गैरव्यवहार झाल्याने भारतीय हौशी बॉक्सिंग महासंघ बरखास्त करण्यात आला होता.
  • त्यानंतर दोन वर्षांतच बॉक्सिंग इंडियाची स्थापना झाली; पण दीड वर्षात नव्या कार्यकारिणीविरुद्ध अविश्वास ठराव संमत झाला.
  • सप्टेंबर २०१६मध्ये भारतीय बॉक्सिंग महासंघाची स्थापना झाली. बीएफआयला मिळालेल्या सदस्यत्वामुळे भारतीय बॉक्सरच्या आंतरराष्ट्रीय सहभागाचा मार्ग मोकळा झाला आहे.

गांधीवादी कार्यकर्ते अनुपम मिश्र यांचे निधन

  • नर्मदा प्रश्नावर पहिल्यांदा आवाज उठविणारे पर्यावरणवादी व गांधीवादी कार्यकर्ते अनुपम मिश्र यांचे १९ डिसेंबर रोजी निधन झाले.
  • त्यांचे व्यक्तिमत्त्व गांधीवाद्याला साजेसेच साधे, सरळ, विनम्र, हसतमुख होते. त्यांचे नुकतेच निधन झाले.
  • ‘गांधी मार्ग’ या नियतकालिकाचे ते संपादक होते. त्यांच्याच प्रयत्नातून ‘सेंटर फॉर सायन्स अ‍ॅण्ड एनव्हायर्नमेंट’ ही संस्था स्थापन झाली.
  • पर्यावरणातील विचारवंतही म्हणून त्यांचे नाव घेतले जात होते. ‘राजस्थान की रजत बूँदे’ व ‘आज भी खरे है तालाब’ ही पुस्तके त्यांनी लिहिली.
  • त्यांनी पर्यावरणाचा बारकाईने अभ्यास केला, अनेक योजनांतील दोष दाखवून दिले. उत्तराखंड व राजस्थानात बंद जलस्रोतांचे पुनरुज्जीवन त्यांनी केले होते. 
  • त्यांचा जन्म महाराष्ट्रातील वर्धा येथे झाला. त्यांचे पदव्युत्तर शिक्षण दिल्ली विद्यापीठातून झाले. दिल्लीत त्यांनी ‘गांधी शांती प्रतिष्ठान’ची स्थापना केली.
  • त्यांच्या ‘आज भी खरे हैं तालाब’ या पुस्तकाला २०११मध्ये जमनालाल बजाज पुरस्कार मिळाला होता. मध्यप्रदेश सरकारने त्यांना चंद्रशेखर आजाद पुरस्कार देऊन सन्मानित केले.

गिरिजा वैद्यनाथन तामिळनाडूच्या मुख्य सचिव

  • प्राप्तिकर विभागाच्या धाडींमुळे वादात सापडलेले पी. रामा मोहन राव यांच्या जागी तामिळनाडूच्या मुख्य सचिव म्हणून डॉ. गिरिजा वैद्यनाथन यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
  • मुख्य सचिवपदासोबत गिरिजा वैद्यनाथन दक्षता आयुक्त व प्रशासकीय सुधारणा आयुक्तपदाचाही अतिरिक्त पदभार सांभाळतील.
  • गिरिजा वैद्यनाथन या १९८२च्या बॅचच्या आयएएस अधिकारी आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे १९९० ते १९९३ या काळात गव्हर्नर असलेले एस. वेंकटीरमणन यांच्या त्या कन्या आहेत.

टाटा स्टीलच्या संचालकपदावरुन वाडियांना हटविले

  • टाटा स्टीलच्या स्वतंत्र संचालकपदावरुन नसली वाडिया यांना काढून टाकण्यात आले आहे.
  • विशेष सर्वसाधारण बैठकीत ९०.८ टक्के समभागधारकांनी त्यांना काढून टाकण्याच्या प्रस्तावाला अनुमोदन दिले.
  • यानंतर त्यांनी आपल्या समभागधारकांना एक विस्तृत पत्र लिहिले आहे. त्यामध्ये त्यांनी आपल्यावर झालेल्या आरोपांना उत्तर दिले आहे.
  • नसली वाडिया आणि सायरस मिस्त्री यांनी दोघांनी मिळून संचालक मंडळाला स्वतःच्या बाजूने वळविण्याचा प्रयत्न केला होता असा आरोप रतन टाटांनी केला होता.
  • तर मागील आठवड्यात वाडिया यांनी टाटा सन्सचे पदाधिकारी आणि रतन टाटा यांच्यावर ३,००० कोटी रुपयांचा अब्रू नुकसानीचा खटला टाकला होता.

द. अफ्रिकेच्या पीटरसनवर दोन वर्षांची बंदी

  • द. अफ्रिकेचा माजी क्रिकेटपटू अल्विरो पीटरसन याच्यावर दोन वर्षांची बंदी घालण्यात आली आहे.
  • भ्रष्टाचाराच्या प्रकरणात त्याच्यावर ही कारवाई करण्यात आली. ही बंदी १२ नोव्हेंबरपासून लागू राहील.
  • दक्षिण अफ्रिकेसाठी ३६ कसोटी सामने खेळलेला पीटरसन भ्रष्टाचाराच्या आरोपात बंदीची शिक्षा भोगणारा सहावा खेळाडू आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा