पोलादी नेत्या जे. जयललिता

खालील नोट्स PDF स्वरूपात डाउनलोड करण्यासाठी MPSC Toppers App डाउनलोड करा.
  • अपोलो रुग्णालयात उपचारांसाठी दाखल असलेल्या तामिळनाडूच्या मुख्यमंत्री जे. जयललिता यांचे ५ डिसेंबर रोजी वयाच्या ६८व्या वर्षी निधन झाले.
  • देशाच्या आणि तामिळनाडूच्या राजकारणात आपल्या कर्तृत्वाची छाप सोडणाऱ्या एआयएडीएमकेच्या सर्वेसर्वा जयललिता या ‘अम्मा’ म्हणून जनतेत लोकप्रिय होत्या.
  • प्रकृती अस्वस्थामुळे जयललिता २२ सप्टेंबरपासून चेन्नईच्या अपोलो रुग्णालयात आयसीयूमध्ये उपचार घेत होत्या. त्यातच त्यांना ह्रदयविकाराचा झटका आला.
  • त्यांची प्रकृती अधिकच चिंताजनक झाल्याने, दिल्लीच्या एम्सच्या डॉक्टरांच्या पथकासह लंडन येथील डॉक्टर रिचर्ड बेल यांनाही रुग्णालयात पाचारण करण्यात आले होते.
  • मात्र त्यांच्या प्रकृतीत कोणतीही सुधारणा झाली नाही आणि अखेर भारतीय राजकारणात गेली तीन दशके घोंगावणारे वादळ शांत झाले.
 राजकारणापूर्वीचे आयुष्य 
  • जयललिता यांचा जन्म २४ फेब्रुवारी १९४८ रोजी पूर्वीच्या तामिळनाडूमधील पण सध्याच्या कर्नाटकमधील मेलूकोटे या गावात अय्यर कुटूंबात झाला. 
  • त्या दोन वर्षाच्या असतानाच त्यांच्या वडिलांचे निधन झाले. घराचा आधारच गेल्याने त्यांच्या कुटूंबाला गरिबीचे चटके सहन करावे लागले. नंतर जयललिता यांच्या आईने तामिळ चित्रपटात काम करण्यास सुरुवात केली.
  • दहावीच्या परीक्षेत त्यांनी राज्यात पहिला क्रमांक मिळवत राज्य सरकारचा गोल्ड स्टेट अॅवॉर्ड मिळवला होता.
  • जयललिता यांनी चेन्नईच्या स्टेला मॉरिस कॉलेजातून पदवी संपादन केल्यानंतर त्यांनी पुढील शिक्षणासाठी शिष्यवृत्ती मिळविली. त्यांना वकील व्हायचे होते.
  • वयाच्या १५व्या वर्षी त्यांनी एपिसल या इंग्रजी चित्रपटात मुख्य भुमिका साकारली आणि तिथून त्यांच्या सिने कारकिर्दीला सुरुवात झाली.
  • कन्नड, तमिल, इंग्रजी आणि हिंदी भाषेतील सुमारे ३०० चित्रपटात त्यांनी काम केले. ‘चिन्नाडा गोम्बे’ हा कन्नड भाषेतील त्यांचा पहिला चित्रपट होता.
  • तामिळ भाषेसह कन्नड, मल्याळम, तेलगू, हिंदी आणि इंग्रजी भाषेवर त्यांचे प्रभुत्व होते. 
  • २० वर्षाच्या आपल्या फिल्मी कारकिर्दीत त्यांनी ‘इज्जत’ या एकमेव हिंदी चित्रपटात काम केले. या चित्रपटात धर्मेंद्र त्यांचे नायक होते.
  • दक्षिण भारतातील चित्रपटांमध्ये स्कर्ट घालून काम करणाऱ्या त्या पहिल्या अभिनेत्री होत्या.
 राजकीय कारकीर्द 
  • तामिळनाडूचे माजी मुख्यमंत्री आणि सुपरस्टार मरुधुर गोपालन् रामचंद्रन (एमजीआर) हे जयललितांचे गुरू होते. एमजीआर यांच्याबरोबर देखील जयललिता यांनी काही चित्रपट केले आहेत. 
  • १९८२मध्ये जयललिता यांनी एमजीआर यांच्या नेतृत्वाखालील अन्ना द्रमुकमध्ये प्रवेश करत राजकारणाला सुरुवात केली. त्यांच्यावर पक्षाच्या प्रचार सचिवाची जबाबदारी सोपविण्यात आली.
  • नंतर विधानसभेच्या पोटनिवडणूकीत त्या विजयी झाल्या आणि त्यांच्या संसदीय राजकारणाला सुरुवात झाली. त्यानंतर १९८४ ते १९८९ दरम्यान त्या राज्यसभेवर निवडून गेल्या.
  • १९८४मध्ये त्यांनी मुख्यमंत्री होण्याची इच्छा व्यक्त केली. मात्र रामचंद्रन यांनी त्यांना पक्षातील उपनेते पदावरुन काढून टाकले.
  • १९८७मध्ये रामचंद्रन यांच्या निधनानंतर जयललिता यांनी स्वत:ला रामचंद्रन यांचे उत्तराधिकारी घोषित केले.
  • १९८९मध्ये झालेल्या विधानसभा निवडणूकीत २७ जागा जिंकून जयललिता यांचा पक्ष विधानसभेतील प्रमुख विरोधी पक्ष बनला.
  • १९९१मध्ये तत्कालिन पंतप्रधान राजीव गांधी यांच्या हत्येनंतर काँग्रेसबरोबर युती करुन त्यांनी सरकार बनविले.
  • २४ जून १९९१ रोजी त्यांनी तामिळनाडूच्या सर्वात तरुण मुख्यमंत्री व जानकी रामचंद्रन यांच्यानंतर दुसऱ्या महिला मुख्यमंत्री बनण्याचा मान मिळविला.
  • त्यानंतर १९९६मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत त्यांचा पराभव झाला. २००१मध्ये त्यांनी पुन्हा सत्ता मिळवली आणि दुसऱ्यांदा मुख्यमंत्री झाल्या.
  • २०११मध्ये डीएमकेच्या एम करुणानिधी यांचा पराभव करत जयललिता पुन्हा तामिळनाडूच्या मुख्यमंत्री झाल्या. तेव्हापासून त्या मुख्यमंत्रीपदी कायम होत्या.
  • तमिळनाडूच्या गेल्या ३२ वर्षाच्या इतिहासात लागोपाठ दोन विधानसभा निवडणुका जिंकणाऱ्या त्या पहिल्या मुख्यमंत्री ठरल्या.
 मुख्यमंत्रीपद आणि वाद 
  • जयललितांनी मुख्यमंत्रिपदाच्या कारकिर्दीत अनेक वादग्रस्त आणि धाडसी निर्णय घेतले. त्यामुळे विरोधकांकडून वारंवार त्यांना लक्ष्य करण्यात येत होते.
  • संपत्तीवरून जयललिता वादात सापडल्या होत्या. मुख्यमंत्रिपदाच्या कार्यकाळात जयललिता यांची संपत्ती दुप्पट झाल्याचे समोर आले होते.
  • २०११मध्ये जयललिता यांची मालमत्ता ५१.४० कोटी रुपयांची होती. त्यात वाढ होऊन ती ११७.१३ कोटी रुपये झाली होती.
  • २०१४मध्ये वैध उत्पन्नापेक्षा जास्त संपत्ती सापडल्यामुळे जयललिता यांना मुख्यमंत्रीपदावरुन पायउतार व्हावे लागले.
  • कोर्टाने त्यांना ४ वर्षांची शिक्षा सुनावली व जयललिता यांच्यावर निवडणूक लढवण्याची बंदीही घालण्यात आली.
  • मात्र यानंतर कर्नाटक उच्च न्यायालयाने निर्दोष ठरविल्याने जयललिता या पुन्हा मुख्यमंत्रीपदी विराजमान होण्याचा मार्ग मोकळा झाला.
  • यानंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीतही त्यांच्या पक्षाने एकहाती यश संपादन केले आणि त्या पुन्हा मुख्यमंत्रीपदावर विराजमान झाल्या होत्या.
 पुरस्कार व सन्मान 
  • मद्रास विद्यापीठाने त्यांना १९९१मध्ये मानद डॉक्टरेट पदवी प्रदान केली होती. त्यानंतर त्यांना अनेक विद्यापीठांनी डॉक्टरेट पदवी प्रदान केली आहे.
  • १९९७मध्ये त्यांच्या जीवानावर 'इरुवर' या तामिळ चित्रपटाची निर्मिती करण्यात आली होती. त्यात ऐश्वर्या रायने जयललितांची भूमिका साकारली होती.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा