चालू घडामोडी : २४ डिसेंबर

पासपोर्ट नियमांत मोठे फेरबदल

  • परराष्ट्र व्यवहार राज्यमंत्री व्ही.के. सिंग यांनी पारपत्र (पासपोर्ट) नियमांत मोठे फेरबदल २३ डिसेंबर रोजी जाहीर केले.
  • पासपोर्ट प्रक्रिया वेगवान आणि सोपी होण्यासाठी परराष्ट्र मंत्रालयाने हे पाऊल उचलले आहे. नव्या नियमानुसार नागरिकांसाठी अर्ज प्रक्रिया सोपी असेल.
 महत्वाचे बदल : 
  • साधू व संन्यासी यांना आता त्यांच्या जैविक पालकांऐवजी आध्यात्मिक गुरूंच्या नावाचा उल्लेख करण्याची परवानगी. मात्र त्यांना गुरूच्या नावाचा उल्लेख असलेला किमान एक पुरावा द्यावा लागेल.
  • २६ जानेवारी १९८९नंतर जन्मलेल्या सर्व अर्जदारांना पारपत्र मिळण्यासाठी जन्मतारखेचा पुरावा म्हणून जन्म प्रमाणपत्र सादर करणे अनिवार्य होते. आताही हे प्रमाणपत्र चालणार असले, तरी ते अनिवार्य असणार नाही.
  • आधार कार्ड, ई-आधार, पॅन कार्ड, शाळा सोडल्याचा दाखला, स्थलांतर प्रमाणपत्र, ड्रायव्हिंग लायसन्स, मतदान ओळखपत्र, एलआयसी पॉलिसी बाँड, इत्यादी दस्तावेज जन्म तारखेचा पुरावा म्हणून ग्राह्य धरले जातील.
  • कोणताही जन्म दाखला नसलेल्या अनाथ व्यक्ती आपल्या अनाथालयाच्या प्रमुखाकडून जन्मतारिख निश्चित करून त्याचा अधिकृत दाखला पारपत्र मिळविण्यासाठी जोडू शकतात.
  • आपल्या विभागाकडून ओळखपत्र, नाहरकत प्रमाणपत्र मिळवण्यास अडचणी येत असलेल्या सरकारी कर्मचाऱ्यांना आता प्रतिज्ञापत्राद्वारे पासपोर्ट मिळवता येईल.
  • एकल पालकाला पारपत्रात आपल्या जोडीदाराचे नाव जाहीर करण्याची गरज नसेल. त्यांच्या पारपत्रावर जोडीदाराऐवजी पालक किंवा कायदेशीर ताबा असलेल्या व्यक्तीचे नाव देता येईल.
  • अर्जदाराला यापुढे कोणतेही विवाह प्रमाणपत्र सादर करावे लागणार नाही. जर अर्जदार घटस्फोटित असेल, तर त्याला घटस्फोटत प्रमाणपत्रही सादर करण्याची गरज नाही.
  • दत्तक घेतलेल्या मुलांनाही दत्तक घेतल्याचे प्रमाणपत्र सादर न करता, ज्यांनी दत्तक घेतले आहे, त्यांच्याकडून पत्र अर्जासोबत जोडावे लागेल.
  • आई किंवा व‌डिलांचे नाव पासपोर्टवर नमूद केले जाऊ नये अशी अर्जदार व्यक्तीची इच्छा असेल तर तीही आता मान्य होणार आहे.
  • यापुढे कोणतंही अॅनेक्सेस अटेस्टेटड, शपथपत्र, नोटरी करुन देण्याची गरज नाही. सर्व अॅनेक्सेस अर्जदार स्वत: लिहून पासपोर्टसाठी सादर करु शकतो.
  • पासपोर्टसाठी याआधी १५ अॅनेक्सेस असायचे, ते आता १५ वरुन ९  वर आणले आहेत.

युवा भारतीय संघाला आशिया करंडक स्पर्धेचे विजेतेपद

  • भारताने श्रीलंकेवर मात करत तिसऱ्यांदा १९ वर्षांखालील आशिया करंडक क्रिकेट स्पर्धेचे विजेतेपद मिळविले. भारताने यापूर्वी २०१२ आणि २००४मध्ये या स्पर्धेचे विजेतेपद मिळविले होते. 
  • कर्णधार अभिषेक शर्माच्या अष्टपैलू कामगिरीच्या जोरावर भारताने अंतिम सामन्यात यजमान श्रीलंकेचा ३४ धावांनी पराभव केला.
  • भारताने प्रथम फलंदाजी करताना हिमांशु राणा आणि शुभम गिल यांच्या अर्धशतकी खेळीच्या जोरावर ८ बाद २७३ धावांची मजल मारली होती.
  • भारतीय संघाच्या २७४ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना श्रीलंकेचा डाव ४८.४ षटकांत २३९ धावांतच संपुष्टात आला.
  • सामन्यात २९ धावा आणि ४ विकेट घेणारा अभिषेक शर्मा सामनावीर ठरला. तर हिमांशू राणाला मालिकावीराचा पुरस्कार देण्यात आला.
  • तसेच सर्वोत्कृष्ट एकदिवसीय युवा पदार्पण पुरस्कारासाठी राहुल चहर, कमलेश नागरकोटी आणि हेत पटेल या भारतीयांची निवड करण्यात आली.

नजीब जंग यांचा राजीनामा नामंजूर

  • दिल्लीचे नायब राज्यपाल नजीब जंग यांनी दिलेला राजीनामा केंद्र सरकारने तूर्तास मंजूर केलेला नाही.
  • सध्या पदावर कायम राहण्याची सूचना जंग यांना करण्यात आली आहे. यामुळे जंग यांना आपला प्रस्तावित गोवा दौरा रद्द करावा लागला आहे. 
  • जंग यांनी यानंतरही आग्रह धरला तर पुढच्या महिन्यात त्यांच्या जागी नवी नियुक्ती केली जाऊ शकते. 

सेहवाग किंग्ज इलेव्हन पंजाबचा प्रशिक्षक

  • भारताचे फलंदाजीचे प्रशिक्षक संजय बांगर यांनी किंग्ज इलेव्हन पंजाब या इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) ट्वेन्टी-२० क्रिकेट स्पर्धेतील संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदाचा राजीनामा दिला आहे.
  • त्यामुळे आता पंजाबच्या प्रशिक्षकपदाची सूत्रे भारताचा माजी सलामीवीर वीरेंद्र सेहवागकडे सोपवण्यात आली आहेत. तो गेली दोन वर्षे या संघाचा सल्लागार म्हणून काम पाहत आहे.
  • २०१४च्या आयपीएल हंगामाआधी सहाय्यक प्रशिक्षकपदाची सूत्रे बांगर यांनी स्वीकारली. त्यानंतर त्यांची मुख्य प्रशिक्षक म्हणून नेमणूक करण्यात आली.
  • या वेळी पंजाबने आश्चर्यकारक कामगिरीचे प्रदर्शन करताना अंतिम फेरीपर्यंत मजल मारत उपविजेतेपद प्राप्त केले होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा