चालू घडामोडी : २२ जानेवारी

एनएसजीच्या महासंचालकपदी सुदीप लखटाकिया

  • राष्ट्रीय सुरक्षा दलाच्या (एनएसजी) महासंचालकपदी नुकतीच आयपीएस अधिकारी सुदीप लखटाकिया यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
  • लखटाकिया हे तेलंगण केडरचे १९८४च्या तुकडीतील आयपीएस अधिकारी असून सध्या ते केंद्रीय राखीव पोलीस दलाचे विशेष महासंचालक आहेत.
  • सध्या एनएसजीचे महासंचालक असलेले एस पी सिंह हे ३१ जानेवारी रोजी निवृत्त होत असून त्यांच्याकडून ते सूत्रे घेतील.
  • पुढील वर्षी जुलैपर्यंत लखटाकिया हे एनएसजीचे महासंचालक राहतील त्यानंतर ते निवृत्त होत आहेत.
  • प्रत्यक्ष दहशतवाद व नक्षलवाद मोहिमांविरोधातील मोर्चेबांधणीत लखटाकिया हे निपुण आहेत.
  • केंद्रीय राखीव पोलीस दलाचे अतिरिक्त महासंचालक या पदावर नियुक्त होण्यापूर्वी ते आठ वर्षे एसपीजी (स्पेशल प्रोटेक्शन ग्रूप) या सुरक्षा संस्थेत महानिरीक्षक होते.
राष्ट्रीय सुरक्षा दल (एनएसजी)
  • राष्ट्रीय सुरक्षेच्या क्षेत्रात एनएसजी ही जगात सहाव्या क्रमांकाची नावाजलेली संस्था आहे.
  • दहशतवादी हल्ले, विमान अपहरण किंवा तत्सम प्रसंगात या जवानांची कसोटी लागत असते. त्यांचे नव्वद दिवसांचे प्रशिक्षणही अतिशय खडतर असते.
  • जर्मनीच्या जीएसजी ९ व ब्रिटनच्या एसएएस सुरक्षा संस्थेच्या धर्तीवर या संस्थेची स्थापना करण्यात आली आहे.
  • एनएसजीच्या काही ब्लॅक कॅट कमांडोजना प्रशिक्षणासाठी इस्रायलमध्येही पाठवण्यात येते. अतिमहत्त्वाच्या व्यक्तींची सुरक्षा एनएसजीचे ब्लॅक कॅट कमांडो करीत असतात.
  • देशात एनएसजीची एकूण पाच केंद्रे असून, त्याचे मुख्यालय गुरुग्राममधील मनेसर येथे आहे.

मोदींच्या काळात भारताची अधोगती : गॅलप अहवाल

  • पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यकाळात भारताची अधोगती झाली असा निष्कर्ष गॅलप पाहणी अहवालात नमूद करण्यात आला आहे.
या अहवालातील ठळक मुद्दे
  • पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांचा बराचसा वेळ विदेश दौऱ्यांमध्ये घालवला. त्यांनी विदेश दौऱ्यांपेक्षा देशावर लक्ष केंद्रित करून देशाच्या जनतेला त्यांच्या शासनकाळाबाबत काय वाटते हे जाणून घ्यायला हवे होते असेही या अहवालात नमूद करण्यात आले आहे.
  • पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या कार्यकाळात तीन वर्षांपूर्वी जी देशाची अवस्था होती त्याहीपेक्षा वाईट अवस्था झाल्याचे भारतीयांना वाटते आहे.
  • भारतीयांना त्यांचे आयुष्य प्रगतीपथावर नेण्यासाठी खडतर मार्ग अवलंबावा लागला आहे.
  • सध्या भारतातील फक्त ३ टक्के नागरिक २०१४च्या तुलनेत आपण समृद्ध झालो असे मानतात.
  • राहणीमानाचा आलेख घसरण्याची सुरुवात २०१४पासून झाली. २०१४-१५ या वर्षात हा आलेख ७ टक्क्यांपर्यंत खाली आला. तर पुढच्या वर्षात हे प्रमाण ३ टक्क्यांपर्यंत खाली आले.
  • बेरोजगारीचीही समस्या वाढली आहे. २०१४मध्ये बेरोजगारीचे प्रमाण ३.५३ टक्के होते २०१७मध्ये ते ४.८० टक्क्यांपेक्षा जास्त वाढले.

ऑक्सफॅम अहवाल : देशात आर्थिक विषमतेमध्ये वाढ

  • दावोसमधील वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या पार्श्वभूमीवर ऑक्सफॅम या संस्थेने ‘रिवॉर्ड वर्क, नॉट वेल्थ’ हा अहवाल प्रसिद्ध केला आहे.
  • देशात आणि जागतिक पातळीवर असलेली आर्थिक विषमता या अहवालातून समोर आली आहे.
  • जगातील १० देशांमधील सुमारे ७० हजार लोकांची मते जाणून घेतल्यानंतर हा अहवाल तयार करण्यात आला आहे.
या अहवालातील ठळक मुद्दे
  • भारतातील १ टक्का श्रीमंताकडे देशातील ७३ टक्के संपत्ती आहे.
  • ६७ कोटी भारतीयांच्या संपत्तीमध्ये फक्त एक टक्क्यांनी वाढ.
  • जागतिक पातळीवर गेल्या वर्षभरात तयार झालेल्या एकूण संपत्तीतील ८२ टक्के वाटा हा १ टक्का लोकांकडे गेला.
  • ३ अब्ज ७० लाख लोकांच्या संपत्तीमध्ये काहीच वाढ झालेली नाही.
  • भारतातील १ टक्का श्रीमंतांच्या संपत्तीमध्ये जवळपास २०.९ लाख कोटी रुपयांनी वाढ झाली.
  • भारतातील ३७ टक्के अब्जाधीशांकडे वारसाहक्काने संपत्ती आली आहे.
  • भारतात फक्त ४ महिला अब्जाधीश असून यातील तीन जणांकडे वारसाहक्काने संपत्ती आली आहे.
  • देशातील १०१ अब्जाधीशांपैकी ५१ जण हे ६५ वर्षांवरील आहेत. त्यांच्याकडे एकूण १०,५४४ अब्ज रुपये इतकी संपत्ती आहे.
  • अब्जाधीशांच्या संपत्तींमध्ये २०१० पासून वर्षाला सरासरी १३ टक्के या वेगाने भर पडत आहे.
  • गरीब आणि श्रीमंत वर्गातल्या या दरीमुळे भारताचा आर्थिक समतोल बिघडला आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा