चालू घडामोडी : १९ फेब्रुवारी

माजी सरन्यायाधीश अल्तमस कबीर यांचे निधन

  • सर्वोच्च न्यायालयाचे माजी सरन्यायाधीश अल्तमस कबीर यांचे १९ फेब्रुवारी रोजी कोलकाता येथे दीर्घ आजाराने निधन झाले.
  • कबीर हे सर्वोच्च न्यायालयाचे ३९वे सरन्यायाधीश होते. २०१३मध्ये ते या पदावरून निवृत्त झाले होते.
  • त्यांचा जन्म २९ सप्टेंबर १९४८ मध्ये झाला होता. एलएलबी पदवी संपादन केल्यानंतर ते १९७३मध्ये कोलकाता बार असोसिएशनचे सदस्य बनले. येथून त्यांची कारकिर्द सुरु झाली.
  • कोलकाता उच्च न्यायालयात वकील म्हणून कार्यरत असणाऱ्या कबीर यांची १९९०मध्ये कोलकाता उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश म्हणून नियुक्ती झाली होती.
  • २००५ मध्ये त्यांची नियुक्ती झारखंडचे उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश म्हणून करण्यात आली होती. त्यानंतर त्यांची नियुक्ती सर्वोच्च न्यायालयात न्यायाधीश म्हणून करण्यात आली होती.
  • कबीर यांची २९ सप्टेंबर २०१२ मध्ये सरन्यायाधीशपदी नियुक्ती करण्यात आली होती. त्यांनी हे पद १८ जुलै २०१३ पर्यंत भूषवले.
  • सरन्यायाधीश म्हणून कबीर यांची कारकीर्द विवादास्पद राहिली. कबीर यांनी जाणीवपूर्वक आपली पदोन्नती रोखल्याचा आरोप गुजरात उच्च न्यायालयाचे न्यायाधीश भास्कर भट्टाचार्य यांनी मागे केला होता.
  • सहारा-सेबी प्रकरणाची सुनावणी ज्या पीठासमोर सुरू होती, त्यात कबीर यांनी बदल करून ती आपल्या हातात घेतल्याचा आरोपही त्यांच्यावर झाला होता.

रोख दागिने खरेदीवर आता १ टक्का टीसीएस

  • १ एप्रिलपासून २ लाख रुपयांपेक्षा अधिक रकमेच्या रोख दागिने खरेदीवर आता १ टक्का टीसीएस (टॅक्स कलेक्टेड अ‍ॅट सोर्स) द्यावा लागणार आहे.
  • प्राप्तीकर कायद्यातील तरतुदीनुसार वस्तू व सेवांसाठीच्या २ लाखांवरील रोखीतील व्यवहारावर १ टक्का टीसीएस आकारला जातो. 
  • आर्थिक विधेयक २०१७मंजूर झाल्यानंतर दागिनेही सामान्य वस्तूंच्या यादीत येणार आहेत. त्यामुळे यावरही १ टक्का कर द्यावा लागणार आहे.
  • सध्या दागिन्यांच्या ५ लाखांवरील खरेदीवर टीसीएस लागू होतो. ही मर्यादा आता दोन लाखांवर आणण्यात येणार आहे.
  • रोखीतील मोठ्या व्यवहारातून काळ्या पैशांची देवाणघेवाण रोखण्यासाठी सरकारद्वारे हे पाऊल उचलण्यात आले आहे.
  • २०१७-१८च्या अर्थसंकल्पात तीन लाख रुपयांपेक्षा अधिक रक्कमेच्या नगदी व्यवहारांवरही प्रतिबंध आणले आहेत. याचे उल्लंघन करणाऱ्या व नगदी रक्कम स्वीकारणाऱ्या व्यक्तीला तितक्याच रकमेचा दंड देण्याची तरतूद आहे.
  • आयकर विभाग १ जुलै २०१२ पासूनच सोन्याच्या दोन लाखांवरील आणि दागिन्यांच्या पाच लाखांवरील रोखीतील खरेदीवर एक टक्का टीसीएस आकारत आहे. 

सुरेंद्र वर्मा यांना व्यास सन्मान जाहीर

  • हिंदी भाषेतील नामवंत साहित्यिक सुरेंद्र वर्मा यांना बिर्ला फाऊंडेशनचा व्यास सन्मान जाहीर झाला आहे.
  • २०१०मध्ये प्रकाशित झालेल्या त्यांच्या ‘काटना शमी का वृक्ष- पद्म पंखुरी के धार से’ या पुस्तकासाठी त्यांना हा सन्मान मिळाला आहे.
  • १९४१मध्ये उत्तर प्रदेशातील झांशी येथे जन्मलेल्या सुरेंद्र वर्मा यांचे ‘सूर्य की अंतिम किरण से सूर्य की पहली किरण तक’ हे पहिले नाटक होते. सहा भाषांत त्याचे भाषांतर झाले आहे.
  • कथा, नाटके, कादंबऱ्या, समीक्षा अशा प्रकारांत त्यांनी मुझे चांद चाहिए, आठवा सर्ग, कैद ए हयात अशी किमान पंधरा पुस्तके लिहिली आहेत.
  • त्यांना १९९३मध्ये संगीत नाटक अकादमी पुरस्कार, तर १९९६मध्ये साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला आहे.
  • त्यांच्या रति का कंगन नाटकामध्ये त्यांनी पौराणिक व ऐतिहासिक माध्यमातून कामचेतना नाटय़प्रसंगातून दाखवताना विवाहामुळे आलेल्या कामसंबंधाच्या मर्यादा तोडल्या आहेत.
  • त्यांच्या नाटक व कादंबऱ्यांतील या वर्णनावर प्रच्छन्न टीका झाली असली तरी त्यांनी त्यातून जी रंगभाषा निर्माण केली ती कुणालाही निर्माण करता आली नाही.
 त्यांचे इतर साहित्य 
  • नाटके: सेतूबंध, नायक खलनायक विदूषक, द्रौपदी, शकुंतला की अंगूठी
  • पुस्तके: मुझे चाँद चाहिए, जहॉँ बारिश न हो, आठवा सर्ग, कैद ए हयात
  • कादंबऱ्या: अंधेरे से परे, दो मुर्दो के लिए गुलदस्ता

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा