अरूणाचल प्रदेशातील तवांग परिसरात ६ ऑक्टोबर रोजी सकाळी भारतीय हवाईलदलाचे ‘एमआय १७ व्ही ५’ हे हेलिकॉप्टर कोसळल्याची दुर्घटना घडली. या दुर्घटनेत हवाई दलाच्या ७ जवानांचा मृत्यू झाला आहे.
या अपघाताच्या चौकशीचे आदेश लष्करी वरिष्ठांकडून देण्यात आले असून, हा अपघात नेमका कशामुळे झाला याचा सध्या तपास सुरू आहे.
अपघातग्रस्त हेलिकॉप्टर तवांगमधील एका लष्करी चौकीवर रसद घेऊन चालले होते. या परिसरातील दुर्गम ठिकाणी असलेल्या काही लष्करी ठाण्यांना केवळ हवाईमार्गेच रसद पुरवता येणे शक्य आहे.
एमआय १७ हे हेलिकॉप्टर हे भारतीय हवाईदलाचा कणा मानले जाते. रशियन बनावटीच्या या हेलिकॉप्टरचा वापर प्रामुख्याने लष्करी मोहिमा आणि सैन्याच्या सामानाची ने-आण करण्यासाठी होतो.
भारत आणि रशियामध्ये झालेल्या करारानुसार गेल्यावर्षी रशियाने एमआय १७ व्ही ५ कॅटगरीतील तीन हेलिकॉप्टर्स भारतीय हवाई दलाकडे सुपूर्द केली.
तांत्रिक मर्यादा आणि सुट्या भागांचा तुटवडा जाणवत असल्यामुळे एमआय १७च्या वापरावर अनेकदा प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले होते.
एमआय १७ मध्ये व्ही ५ ही यंत्रणा बसवण्यात आल्यामुळे हेलिकॉप्टर काही प्रमाणात अद्यायावत झाले होते. मात्र, तरीही प्रगत तंत्रज्ञानाच्यादृष्टीने पाहता एमआय १७मध्ये अनेक तांत्रिक दोष होते.
यापूर्वी जुलै २०१३मध्ये उत्तराखंडमध्ये पुरग्रस्त भागात बचाव मोहिमेवर असताना एमआय १७ व्ही ५ हेलिकॉप्टरला मोठा अपघात झाला होता. या दुर्घटनेत एअर फोर्सच्या २० जवानांचा मृत्यू झाला होता.
जंतरमंतरवर आंदोलन करण्यास बंदी
अनेक ऐतिहासिक आंदोलनांचे साक्षीदार असणाऱ्या जंतरमंतरवर यापुढे कोणत्याही संघटनेला वा राजकीय पक्षाला आंदोलन करता येणार नाही.
राष्ट्रीय हरित लवादाने घेतलेल्या निर्णयानुसार, यापुढे जंतरमंतरवर कोणालाही कोणत्याही प्रकारचे आंदोलन वा धरणे धरता येणार नाही. हा आदेश तातडीने लागू झाला आहे.
या ठिकाणी होणाऱ्या सततच्या आंदोलनांमुळे ध्वनिप्रदूषणात कमालीची वाढ होत आहे. याबाबत एक लवादाकडे एक जनहित याचिका दाखल करण्यात आली होती.
या याचिकेवर झालेल्या सुनावणीत राष्ट्रीय हरित लवादाने आंदोलनबंदीचा आदेश देताना नवी दिल्ली महानगरपालिकेला अनेक सूचना केल्या.
जंतरमंतर येथे आंदोलनांसाठी उभारण्यात आलेली तात्पुरती बांधकामे, ध्वनिवर्धक यंत्रणा ताबडतोब हटवावीत असा आदेशही महानगरपालिकेला देण्यात आला आहे.
याआधी मुंबई उच्च न्यायालयाने मंत्रालय व विधान भवन भागाकडे मोर्चे नेण्यास बंदी घातली होती. अनेक वर्षांनी तसाच निर्णय दिल्लीसाठी राष्ट्रीय हरित आयोगाने दिला आहे.
शास्त्रज्ञ निकोलस ब्लूमबर्गेन यांचे निधन
लेसर वर्णपंक्तीशास्त्रासाठी नोबेल पुरस्कार विजेते शास्त्रज्ञ निकोलस ब्लूमबर्गेन यांचे ५ सप्टेंबर रोजी निधन झाले.
ते जन्माने डच असले तरी अमेरिकी नागरिक होते. हार्वर्ड विद्यापीठात त्यांनी ४० वर्षे संशोधन केले. अरेषीय प्रकाशशास्त्रातील ते तज्ज्ञ होते.
दुसऱ्या महायुद्धाच्या काळात नेदरलँड्समध्ये नाझींपासून लपून राहत तेलाच्या दिव्यावर त्यांनी पुंज यांत्रिकीचे शिक्षण घेतले.
विद्युतचुंबकीय लहरी द्रव्याशी कशी अभिक्रिया करतात यावर त्यांचे संशोधन होते. तर न्यूक्लियर मॅग्नेटिक रिलॅक्सेशन हा त्यांचा पीएचडीचा प्रबंध होता.
ब्लूमबर्गेन यांना १९८१मध्ये आर्थर शॉलो व काइ एम सिगबान यांच्यासमवेत भौतिकशास्त्राचे नोबेल मिळाले होते.
लेसरचे पूर्वरूप असलेल्या मेसरच्या संदर्भात त्यांनी सोप्या पद्धती विकसित करून शेवटी लेसरच्या निर्मितीतही मोठे योगदान दिले होते.
नॅशनल मेडल फॉर सायन्स हा पुरस्कार त्यांना अमेरिकेचे अध्यक्ष फोर्ड यांच्या हस्ते मिळाला होता.
I think this іs among the most important informatiߋn for me. And i am glad reading your article. But want to remark on few general things, The website style is wonderful, the articles is really excellent : D. Good job, cheers
I think this іs among the most important informatiߋn for me.
उत्तर द्याहटवाAnd i am glad reading your article. But want to remark on few general things, The website style is wonderful, the articles is really excellent : D.
Good job, cheers