चालू घडामोडी : ३० ऑक्टोबर

भारताकडून चाबहारचा प्रथमच वापर

  • भारताद्वारे इराणमध्ये विकसित होत असलेल्या चाबहार बंदरमार्गे भारतातील ११ लाख टन गहू अफगाणिस्तानला निर्यात करण्यात आला आहे.
  • या निर्यातीला भारताच्या परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज व अफगाणिस्तानचे परराष्ट्रमंत्री सलाहुद्दीन रब्बानी यांनी व्हिडिओ काँन्फरन्सिंगद्वारे हिरवा झेंडा दाखवला.  
  • इराणच्या चाबहार बंदरमार्गे हा गहू अफगाणिस्तानमध्ये दाखल होणार असून चाबहार बंदरचा भारताने पहिल्यांदाच वापर केला आहे.
  • चाबहार बंदरामुळे भारत, अफगाणिस्तान, इराण हे तिन्ही देश जवळ आले असून, यामुळे या देशांमधील व्यापारी संबंध आणखी दृढ होणार
  • आतापर्यंत भारत अफगाणिस्तानमधील व्यापार हा पाकिस्तानमार्गे होत होता. परंतु यापुढे भारताला पाकिस्तानला वळसा घालून अफगाणिस्तान आणि इराणशी संपर्क साधणे सहज शक्य होणार आहे.
  • हिंसाचारग्रस्त अफगाणिस्तानमधील विकासकामात भारताने महत्त्वाची भूमिका निभावली आहे.
 चाबहारचे महत्त्व 
  • इराणच्या आखातात होर्मुझच्या सामुद्रधुनीच्या तोंडावर वसलेले चाबहार बंदर भारतासाठी व्यापारी तसेच सामरिकदृष्ट्याही उपयुक्त ठरणार आहे.
  • २०१६साली भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी इराणच्या दौऱ्यावर गेले असताना त्यांनी या बंदराच्या विकासाच्या करारावर स्वाक्षरी केली होती.
  • या बंदराच्या विकासासाठी आणि इतर पायाभूत सुविधांसाठी भारताने इराणला ५० कोटी डॉलरची मदत केली होती.
  • चीनचा अरबी समुद्रामधील वाढता वावर पाहता भारतालाही येथे आपले स्थान निर्माण करण्याची गरज होती. चाबहार बंदरामुळे भारताला अरबी समुद्रक्षेत्रामध्ये भक्कम स्थान प्राप्त होईल.
  • चाबहार जवळच पाकिस्तानच्या किनाऱ्यावरील ग्वादर हे बंदर चीन विकसित करत आहे. हे बंदर चाबहार पासून समुद्रमार्गे केवळ १०० किमी अंतरावर आहे. त्यामुळे भारतासाठी चाबहार बंदर सामरिकदृष्ट्या महत्त्वाचे आहे.
  • चाबहारला रस्ता व रेल्वेमार्गे अफगाणिस्तानला जोडण्याचा प्रस्ताव आहे. या प्रकल्पात अफगाणिस्तानही भारताचा भागीदार असणार आहे.
  • चाबहार बंदराचा एक मोठा फायदा म्हणजे मध्यपुर्वेत आणि मध्य आशियाशी व्यापार करण्यासाठी भारताला नवा मार्ग उपलब्ध होणार आहे.
  • त्याचप्रमाणे रशिया, युरोप, मध्य आशियातील उझबेकिस्तान, किरगिझिस्तान, ताजिकिस्तान अशा देशांपर्यंत भारत आता पोहोचू शकेल.
  • अफगाणिस्तानला कोणतीही मदत किंवा व्यापार करताना पाकिस्तानचा येणारा अडथळा आता दूर होणार आहे.
  • चाबहार बंदरामुळे इंधनाचे आयातमूल्य कमी होऊन भारतामधील इंधनाचे दर कमी होण्याची शक्यता आहे. इंधनाप्रमाणे कोळसा, साखर व तांदुळाचा व्यापारही आता चाबहारमुळे सोपा होणार आहे.

श्रीकांतला फ्रेंच सुपर सीरिजचे जेतेपद

  • जागतिक क्रमवारीत चौथ्या स्थानावर असलेल्या भारताच्या किदम्बी श्रीकांतने विजयी घौडदौड कायम राखत या वर्षातील चौथ्या सुपर सीरिज विजेतेपदावर नाव कोरले.
  • फ्रेंच खुल्या बॅडमिंटन स्पर्धेतील पुरुष एकेरीत श्रीकांतने १०व्या मानांकित जपानच्या केंटा निशीमोटोचा २१-१४, २१-१३ असा पराभव केला.
  • फ्रेंच खुल्या बॅडमिंटन जिंकणारा श्रीकांत हा पहिलाच भारतीय खेळाडू असून, त्याचे हे कारकिर्दीतील एकूण सहावे सुपर सिरिज विजेतेपद आहे.
  • यंदाच्या हंगामात पाचव्यांदा सुपर सीरिज स्पर्धेची अंतिम फेरी गाठणाऱ्या श्रीकांतने उपांत्य फेरीत भारताच्याच एच एस प्रणॉयला पराभूत केले होते.
  • या विजयासह एका वर्षात ४ सुपर सीरिज जिंकण्याचा पराक्रम करणारा श्रीकांत पहिला भारतीय  बॅडमिंटनपटू ठरला आहे.
  • तर आंतरराष्ट्रीय स्तरावर अशी कामगिरी करणारा तो चौथा खेळाडू आहे. यापूर्वी चीनच्या लीन डान आणि चेन लॉग यांच्यासह मेलिशियाच्या ली चॉग वीने चारवेळा सुपर सीरिज जिंकली आहे.

भारत-इटलीदरम्यान सहा करार

  • भारत दौऱ्यावर आलेले इटलीचे पंतप्रधान पाओले जेंटिलोनी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यातील द्विपक्षीय चर्चेनंतर दोन्ही देशांमध्ये सहा करार करण्यात आले.
  • रेल्वे सुरक्षा, राजनैतिक संबंध, उर्जा, सांस्कृतिक सहकार्य, दोन्ही देशांमधील परराष्ट्र मंत्रालय आणि गुंतवणूक अशा सहा करारांचा यात समावेश आहे.
  • इटलीचे पंतप्रधान पाओले जेंटिलोनी हे एक दिवसाच्या भारत दौऱ्यावर असून जवळपास २००७नंतर प्रथमच इटलीचे पंतप्रधान भारतात आले आहेत.
  • नरेंद्र मोदी आणि पाओले जेंटिलोनी यांनी भारतातील १२ आणि इटलीतील १९ उद्योजकांच्या शिष्टमंडळाच्या उपस्थितीत चर्चा केली.
  • आर्थिक आणि गुंतवणुकीबाबत या बैठकीत चर्चा झाली. बैठकीनंतर दोन्ही देशांच्या अधिकाऱ्यांनी सहा करारांवर स्वाक्षरी केली.
  • २०१८साली भारत आणि इटली यांच्या संबंधांना ७० वर्षे पूर्ण होत आहेत, त्या पार्श्वभूमीवर जेंटिलोनी यांचा भारतदौरा अत्यंत महत्वाचा ठरणारा आहे.

सुल्तान जोहोर चषक स्पर्धेत भारताला कांस्य

  • भारतीय ज्युनिअर पुरुष हॉकी संघाने यजमान मलेशियाचा ४-० असा पराभव करताना सुल्तान जोहोर चषक स्पर्धेत कास्यपदक जिंकले.
  • या लढतीत भारताकडून विवेक प्रसाद व शैलानंद लाक्रा यांनी प्रत्येकी एक गोल तर विशाल अंतिलने दोन गोल केले.
  • भारतीय गोलकिपर सेंतामिज शंकरनेदेखील खूप चांगला बचाव करताना भारतीय संघाच्या विजयात योगदान दिले.
  • अखेरच्या दोन सामन्यांमध्ये ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंडच्या संघाकडून झालेल्या पराभवामुळे भारताला स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश मिळविण्यात अपयश आले.

कादंबरीकार कुंजिक्का यांचे निधन

  • व्यवसायाने डॉक्टर असलेले केरळमधील हे कादंबरीकार डॉ. पुनाथिल कुंजब्दुल्ला यांचे २७ ऑक्टोबर २०१७ रोजी निधन झाले.
  • लोक प्रेमाने त्यांना कुंजिक्का म्हणत असत. आधुनिकतावादी विचारशैलीवर आधारित लेखन करीत त्यांनी साहित्य क्षेत्रात मानाचे स्थान पटकावले. 
  • त्यांचा जन्म ३ एप्रिल १९४० रोजी कोझीकोड जिल्ह्यात झाला व त्यांचे शिक्षण थलसेरी येथील ब्रेनन कॉलेजात झाले. अलिगड मुस्लीम विद्यापीठातून त्यांनी एमबीबीएस केले.
  • व्यवसायाने ते डॉक्टर असले तरी त्यांचे मन साहित्य क्षेत्राकडे ओढ घेत होते व त्यातच त्यांनी कादंबरी लेखनास सुरुवात केली.
  • लेखक म्हणून ते लघुकथा, कादंबऱ्या व इतर लेखनामुळे प्रकाशात आले. कुठल्याही विषयावरची त्यांची मते बंडखोर व सडेतोड अशीच होती.
  • अलिगड कथाकल (स्टोरीज फ्रॉम अलिगड) हा लघुकथा संग्रह व मारिचुपोया एंटे अप्पनमामारकू (फॉर माय डेड पेरेंट्स) ही त्यांची पुस्तके गाजली.
  • २००१मध्ये त्यांनी भाजपकडून बेयपोरमधून विधानसभेच्या निवडणुकीला उभे राहिले परंतु ते निवडणूक जिंकू शकले नाहीत.
  • १९८०मध्ये स्मारकासिलाकल या पुस्तकासाठी त्यांना साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळाला होता.
  • त्यांनी एकूण ७ कादंबऱ्या व १५ लघुकथासंग्रह लिहिले. एम टी वासुदेवन नायर हे त्यांचे लेखन व जीवनातील गुरू होते.
  • केरळ साहित्य अकादमीचा पुरस्कार त्यांना १९७८ मध्ये स्मारकासिलाकल व १९८० मध्ये मालमुकालिले अब्दुल्ला या पुस्तकांसाठी मिळाला होता.
  • त्याशिवाय केरळ साहित्य अकादमीची विद्यावृत्ती, मुथाथू वार्की पुरस्कार व विश्वदीपम पुरस्कार असे अनेक पुरस्कार त्यांना लाभले होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा