चालू घडामोडी : १७ नोव्हेंबर

मूडीजकडून भारताच्या मानांकनात सुधारणा

  • अमेरिकास्थित मूडीज या संस्थेने भारताचे सार्वभौम ऋण मानांकन एका पायरीने वाढवून ‘बीएए२’ केले आहे.
  • मूडीजने भारताच्या लोकल आणि फॉरेन करन्सी एश्युअर रेटिंगमध्ये बीएए३ वरुन बीएए२ असा बदल केला आहे.
  • आर्थिक व संस्थात्मक सुधारणांमुळे भारतीय अर्थव्यवस्थेतील वृद्धीची शक्यता अधिक चांगली झाली असल्याने मूडीजने भारताच्या मानांकनात वाढ केली आहे.
  • या रेटिंग वाढवण्याचा तात्काळ फायदा म्हणजे भारताला आंतरराष्ट्रीय कर्जे घेणे सुसह्य होणार असून आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत भारताची पतही सुधारणार आहे.
  • सुमारे १३ वर्षांनंतर भारताच्या मानांकनात मूडीजकडून सुधारणा करण्यात आली आहे. याआधी २००४मध्ये मूडीजने भारताचे मानांकन सुधारून ‘बीएए३’ केले होते.
  • मूडीजने भारताचे मानांकन आता ‘बीएए२’ केले असले तरी हे मानांकन गुंतवणूक श्रेणीतील सर्वांत खालची पायरी आहे. याचाच अर्थ भारताला अजून खूप मजल मारावी लागणार आहे.
 मूडीजबद्दल 
  • पतमानांकन (रेटिंग) देण्याच्या पद्धतीची सुरुवात १९०९मध्ये जॉन मूडी यांनी केली. ‘मूडीज कॉर्पोरेशन’ ही मूडीज इन्व्हेस्टर्सची कंपनी असून, ती क्रेडिट रेटिंग देण्याचे आणि आर्थिक बाबतीत संशोधन करण्याचे काम करते.
  • सध्या ‘मूडीज’ जागतिक भांडवल बाजाराचा महत्त्वपूर्ण भाग असून, ही कंपनी वित्तीय बाजाराला क्रेडिट रेटिंग (पतमानांकन), रिसर्च टूल आणि विश्लेषणाची सेवा पुरवते.
  • कोणत्याही देशाचे रेटिंग निर्धारित करताना देशावरील कर्ज आणि ते चुकविण्याची क्षमता लक्षात घेतली जाते.
  • या शिवाय रेटिंग एजन्सी त्या देशातील आर्थिक सुधारणांची गती आणि त्याचा भविष्यावर पडणारा प्रभाव आदी बाबी लक्षात घेऊन रेटिंग देतात.
  • या शिवाय रेटिंग निर्धारित करताना देशातील राजकीय स्थिती, आखलेली धोरणे, आयात, निर्यात आदी बाबीही पाहिल्या जातात.
  • मूडीजकडून देण्यात येणारे सार्वभौम मानांकन त्या देशाच्या गुंतवणूक वातावरणाचे निदर्शक असते. कोणत्याही देशातील गुंतवणूक जोखीम त्यातून गुंतवणूकदारांना कळते.
  • मूडीजने ग्रेड देण्यासाठी ९ विभाग निश्चित केले आहेत. AAA, AA, A, BAA, BA,B, CAA, CA आणि C असे हे नऊ विभाग आहेत. या शिवाय १,२,३ असे उपविभागही असतात.
  • यामधील AAA रेटिंग गुंतवणूक करण्यासाठी सर्वात यौग्य देश अथवा कंपनी तर C रेटिंग गुंतवणूक करण्यात सर्वात अयोग्य देश अथवा कंपनी दर्शवते.  

महाराष्ट्रात प्लास्टिक बंदी

  • महाराष्ट्र राज्य सरकारने पर्यावरण रक्षणासाठी राज्यात सरसकट प्लास्टिक बंदी करण्याचा निर्णय घेतला असून, यासाठी कायद्यात सुधारणा केली जाणार आहे.
  • राज्यात सध्या ५० मायक्रोनपेक्षा कमी जाडीच्या पिशव्यांवर बंदी आहे. मात्र आता सरसकट प्लास्टिक बंदी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
  • यासाठी कायद्यात सुधारणा केली जाणार आहे. याबाबत आगामी अधिवेशनात दुरुस्ती विधेयक मांडण्यात येईल.
  • कायद्याची अंमलबजावणी न करणाऱ्या हॉटेल्स आणि विक्रेत्यांवर फौजदारी कारवाईची तरतूदही करण्यात येणार आहे.
  • नियमाचे उल्लंघन करणाऱ्यांना ३ ते ६ महिने शिक्षा आणि परवाना रद्द करण्याचा प्रस्ताव विचाराधीन आहे.
  • प्लास्टिक बंदीमुळे शीतपेय आणि पाण्याची बाटलीवर बंदी येणार आहे. अशा परिस्थितीत काचेचा बाटल्या हा पर्याय उपलब्ध असेल. तर प्लास्टिक पिशव्यांवरऐवजी कापडी पिशव्यांचा पर्याय उपलब्ध करुन दिला जाईल.
  • महाराष्ट्र पर्यावरण मंत्री: रामदास कदम

हिंदी साहित्यिक कुंवर नारायण यांचे निधन

  • भारतीय साहित्यात सर्वश्रेष्ठ समजल्या जाणाऱ्या ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित हिंदीतील बुजुर्ग साहित्यिक कुंवर नारायण यांचे १५ नोव्हेंबर रोजी निधन झाले. 
  • उत्तर प्रदेशातील फैजाबाद येथे १९ सप्टेंबर १९२७ रोजी कुंवर नारायण यांचा जन्म झाला. फैजाबाद आणि अयोध्या या ठिकाणी त्यांचे शालेय शिक्षण झाले.
  • बौद्ध समाजवादी नेता विद्वान आचार्य नरेंद्रदेव आणि गांधीवादी आचार्य कृपलानी यांचा कुंवर नारायण यांच्यावर विलक्षण प्रभाव होता.
  • आचार्य कृपलानींबरोबर दिल्लीला त्यांच्या ‘निजिल’ या पत्रिकेच्या कामासाठी त्यांनी मदत केली. त्यामुळे त्यांची साहित्यिक आवड जोपासली गेली.
  • १९५६मध्ये त्यांचा ‘चक्रव्यूह’ हा पहिला काव्यसंग्रह प्रसिद्ध झाला. हिंदी साहित्यातील ही एक प्रमुख साहित्यकृती मानली जाते.
  • अज्ञेयजींच्या १९५९ मधील ‘तिसरा सप्तक’मध्ये कुंवरजींच्या कवितांचा समावेश केल्याने त्यांना बऱ्यापैकी प्रसिद्धी मिळाली.
  • पण १९६५ मध्ये ‘आत्मजयी’ हे दीर्घकाव्य सिद्ध झाले आणि त्यांची कवी म्हणून ओळख प्रस्थापित झाली.
  • परिवेश, हम तुम (१९६१), अपने सामने (१९७९), कोई दुसरा नहीं (१९९३), इन दिनो (२००२), हाशिये का गवाह हे त्यांचे इतर काव्यसंग्रहही प्रकाशित झाले.
  • त्यांनी कथा, समीक्षालेखन, चित्रपट, संगीत, कला व इतिहास या विषयांवरही लेखन केले आहे. खोल जीवनानुभव, विपुल अध्ययन, गंभीर चिंतन यामुळे त्यांचे साहित्य लक्षणीय बनले.
  • त्यांना हिंदुस्थानी पुरस्कार, प्रेमचंद पुरस्कार, पुणे पंडित पुरस्कार, व्यास सन्मान, साहित्य अकादमी, कबीर सन्मान, पद्मभूषण, वॉर्सा (पोलंड) विद्यापीठाचे सन्मानपदक असे अनेक सन्मान मिळाले.
  • इटलीमधील ‘प्रेमिओ फेरोनिया’ हा आंतरराष्ट्रीय लेखकाला दिला जाणारा सन्मान कुंवरजींच्या रूपाने प्रथमच एका भारतीय लेखकाला मिळाला होता.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा