मद्रास बार कौन्सिलचे प्रसिद्ध वकील आणि कुशाग्र बुद्धिमत्तेचे विधिज्ञ हबिबुल्लाह बादशा यांचे २२ नोव्हेंबर रोजी निधन झाले.
सरकारतर्फे देऊ करण्यात आलेले आधी उच्च न्यायालय आणि नंतर सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीशपद त्यांनी विनम्रपणे नाकारले व तामिळनाडूमध्येच वकिली व्यवसायाबरोबरच विविध संस्थांच्या उभारणीत आपले आयुष्य खर्ची घातले.
८ मार्च १९३३ रोजी एका धनाढय़ व प्रतिष्ठित कुटुंबात त्यांचा जन्म झाला. नामांकित कॉन्व्हेंट शाळेत त्यांचे शालेय शिक्षण झाले.
पदवी आणि पदव्युत्तर शिक्षण घेतल्यानंतर त्यांनी पुढे कायद्याचा अभ्यास केला. १९५७मध्ये ते मद्रास बार कौन्सिलचे सदस्य बनले.
१९७०मध्ये ते ३७ वर्षांचे असताना उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशपदासाठी त्यांच्या नावाची शिफारस करण्याचा निर्णय घेण्यात आला. परंतु हे पद स्वीज्कार्ण्यास त्यांनी नकार दिला.
पुढे अनेक प्रकरणांत केंद्राबरोबरच राज्य सरकारचीही बाजू त्यांनी प्रभावीपणे विविध न्यायालयांत मांडली. नंतर ते काही काळ तामिळनाडूचे महाधिवक्ताही होते.
करुणानिधी यांच्यावर घटनेची प्रत जाळल्याचा खटला उभा राहिला तेव्हा त्यांच्या वतीने बादशा यांनीच युक्तिवाद केला.
१९८६मध्ये त्यांना थेट सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीशपद देऊ करण्यात आले होते, पण तेही त्यांनी विनम्रपणे नाकारून राज्यात वकिलीच करण्यात रस असल्याचे सरकारला कळवले.
वकिली व्यवसायाबरोबरच विविध शैक्षणिक संस्थांच्या विकासातही ते सक्रिय होते. प्रसिद्ध अपोलो हॉस्पिटलचे ते एक संस्थापक-संचालक होते.
इजिप्तमध्ये मशिदीवर दहशतवादी हल्ला
इजिप्तमधील उत्तर सिनाई प्रांतातील मशिदीवर दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात २३५ जणांचा मृत्यू झाला आहे असून, जवळपास १०० जण जखमी झाले आहेत.
उत्तर सिनाई हा इजिप्तमधील अशांत प्रांत म्हणून ओळखला जातो. या भागाच्या पश्चिमेला साधारण ४० किलोमीटर अंतरावर अल-अरिश शहरात अल रॉदाह मशीद आहे.
या मशिदीत नमाज सुरु असताना दहशतवाद्यांनी बॉम्बहल्ला केला. त्यावेळी मशिदीत मोठी गर्दी होती. यानंतर दहशतवाद्यांनी मशिदीतील लोकांवर अंदाधुंद गोळीबार सुरु केला.
इजिप्तचे सैन्य उत्तर सिनाई प्रांतात आयसिस या दहशतवादी संघटनेविरोधात धडक कारवाई करत असताना हा हल्ला झाला आहे.
या भागात आधीही दहशतवाद्यांनी अनेक पोलीस कर्मचारी आणि सैनिकांच्या हत्या केल्या आहेत. याशिवाय प्रशासनाला सहकार्य करणाऱ्या नागरिकांच्याही आयसिसच्या दहशतवाद्यांकडून क्रूर हत्या करण्यात आल्या आहेत.
इजिप्तचे राष्ट्राध्यक्ष : अब्देल फतह अल सीसी
सुनील मित्तल यांचे ७ हजार कोटींचे दान
सुनील मित्तल यांनी सामाजिक कामांसाठी आपल्या एकूण संपत्तीतील १० टक्के भाग म्हणजे सुमारे ७ हजार कोटी रुपये दान करण्याची घोषणा केली आहे.
याशिवाय त्यांनी एअरटेल कंपनीतील आपले ३ टक्के शेअर्सही सामाजिक कामांच्या खर्चासाठी दिले आहेत.
सुनील मित्तल जगातील तिसऱ्या क्रमांकाची सर्वात मोठी टेलिकॉम कंपनी ‘भारती एअरटेल’चे चेअरमन आहेत.
दुर्बल आणि वंचित समाज घटकांमधील तरुण-तरुणींना मोफत शिक्षण घेता यावं म्हणून ‘सत्य भारती विश्वविद्यापीठ’ स्थापन करण्याची घोषणाही सुनील मित्तल यांनी केली आहे.
हे विश्वविद्यापीठ विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्राशी संबंधित अभ्यासक्रमांसाठी वाहिलेले असेल. २०२१साली विश्वविद्यापीठ सुरु करण्याचा मित्तल यांचा मानस आहे.
उत्तर भारतात हे विद्यापीठ सुरू करण्यात येणार आहे. येथे आर्थिकदृष्ट्या दुर्बल आणि समाजातील वंचित विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण देण्याचा उद्देश आहे.
२००७साली सुनील मित्तल यांना भारत सरकारचा तिसरा सर्वोच्च पुरस्कार अर्थात ‘पद्मभूषण’ने गौरवण्यात आले.
१५ जून २०१५ रोजी सुनील मित्तल यांनी इंटरनॅशनल चेंबर ऑफ कॉमर्सच्या चेअरमनपदी निवड झाली.
यापूर्वी इन्फोसिसच्या नंदन नीलेकणी आणि त्यांची पत्नी रोहिणी नीलेकणी यांनीही आपली अर्धी संपत्ती सामाजिक कार्यासाठी दान करण्याची घोषणा केली आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा