चालू घडामोडी - १० मार्च २०१५

·        १० मार्च : कविश्रेष्ठ कुसुमाग्रज विष्णू वामन शिरवाडकर पुण्यतिथी
·        महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुलींसाठी भाग्यश्री योजनेचे उद्घाटन केले.
·        १ जानेवारी २०१४ रोजी सुरु
Devendra Fadanvis
केलेल्या सुकन्या योजनेत बदल करून नवीन भाग्यश्री योजना
सुरु करण्यात आली आहे.
·        सुकन्या योजनेंतर्गत दारिद्र्यरेषेखालील कुटुंबात जन्मणाऱ्या प्रत्येक मुलीच्या नावे एक वर्षाच्या आत २१,२०० रुपये आयुर्विमा महामंडळाच्या योजनेत जमा केले जात होते.
·        भाग्यश्री योजनेंतर्गत दारिद्र्यरेषेखालील कुटुंबात जन्मणाऱ्या प्रत्येक मुलीला १८ वर्षे पूर्ण झाल्यावर १ लाख रुपये देण्यात येणार आहे.
·        अभिनेत्री भाग्यश्रीची या योजनेची ब्रँड अॅम्बेसेडर म्हणून निवड करण्यात आली आहे.
·        जागतिक आरोग्य संघटनेने जगातील सर्वाधिक प्रदूषित वीस शहरांच्या प्रसिद्ध केलेल्या यादीत तेरा शहरे भारतातील आहेत.
·        यामध्ये दिल्ली प्रथम क्रमांकावर, तर बीजिंग दुसऱ्या क्रमांकावर आहे.
·        ईशान्येकडील पहिले किसान कॉल सेंटर (केसीसी) ९ मार्च २०१५ रोजी आगरतळा, त्रिपुरा येथे  सुरु करण्यात आले. या किसान कॉल सेंटरचे उद्घाटन त्रिपुराचे मुख्यमंत्री माणिक सरकार यांनी केले.
·        याकरिता त्रिपुरा राज्यसरकार वित्तपुरवठा करणार असून यात खाजगी उद्योगातील कृषी, मत्स्यपालन  तज्ञांची नियुक्ती केली जाणार आहे.
·        साहित्य अकादमीतर्फे देण्यात येणाऱ्या २०१४ साठीचा पुरस्कार केदारनाथसिंह व अकादमीचे अध्यक्ष विश्‍वनाथप्रसाद तिवारी यांच्या हस्ते डॉ. जयंत नारळीकर यांना मराठीसाठी, तर दिवंगत मंगला सरदेसाय यांना कोकणीसाठीचा सन्मान वितरित करण्यात आला.
·        स्वच्छ भारत अभियानअंतर्गत घराघरांत शौचालय बांधकामासाठी केंद्राने एक हजार ९३५ कोटी रुपयांचा निधी महाराष्ट्राला दिला आहे.
·        केंद्र आणि राज्य यांच्या संयुक्‍त विद्यमाने आगामी चार वर्षांत राज्यात ५६ लाख शौचालयांची बांधणी केली जाणार आहे.
·        स्वच्छ भारत अभियान प्रभावीपणे राबविण्यासाठी प्रत्येक गावात स्वच्छता दूत नेमण्यात येणार आहेत.
·        या स्वच्छता दूतांना गावातील १५० शौचालयांनंतरच्या प्रत्येक शौचालयाच्या मागे दीडशे रुपयांचे मानधन दिले जाईल.
·        यासोबतच जिल्हा परिषदांमधे स्वतंत्रपणे उपकार्यकारी अधिकारी (स्वच्छता) नेमून ३० कर्मचाऱ्यांचा समावेश असलेला कक्ष स्थापन करण्यात येणार आहे. प्रत्येक शौचालयासाठी नऊ हजार रुपये केंद्र, तर तीन हजार रुपये राज्य सरकार देणार आहे.
·        इराकचे माजी हुकूमशहा सद्दाम हुसेन यांचे जन्मठिकाण असलेल्या तिक्रित शहरावर पुन्हा नियंत्रण मिळविण्यासाठी इराकच्या सैन्याने इसिस या दहशतवादी संघटनेविरोधात मोठी लढाई सुरू केली आहे.
·        तिक्रितच्या बाहेर इराकी सैन्य, शिया संघटना यांनी इसिस विरोधात जोरदार हल्ले सुरू केले आहेत.
·        जम्मू काश्‍मीरमधील फुटीरतावादी नेता मसरत आलम याची मुख्यमंत्री मुफ्ती महंमद सईद यांनी तुरुंगातून सुटका केल्यामुळे ते वादाच्या भोवऱ्यात अडकले आहेत.
·        गेल्या दोन वर्षांत गिर अभयारण्य आणि धरी वनक्षेत्रात एकूण १२४ आशियाई सिंहांचा आणि १३५ बिबट्यांचा मृत्यू झाला. यापैकी बहुतेक मृत्यू हे नैसर्गिक कारणांमुळे झाले आहेत.
·        दिल्लीमध्ये २०१२ मध्ये झालेल्या सामूहिक बलात्कार प्रकरणातील आरोपी मुकेशसिंहची मुलाखत असलेला माहितीपट दाखविण्यास बंदी असतानाही रविवारी रात्री आग्रा जिल्ह्यातील रुपधन या गावामध्ये दाखविण्यात आला.
·        या वेळी ५० ते ६० गावांतील नागरिक जमा झाले होते. सामाजिक कार्यकर्ते केतन दीक्षित यांनी नियोजन केले होते.
·        तिरुअनंतपुरम बॅकवाटर्सच्या प्रचार प्रसाराकरिता चालविल्या जात असलेल्या केरळ पर्यटनाच्या लोकप्रिय वैश्विक मल्टीमीडिया अभियानने इंटरनेशनल टूरिजम-बोर्स बर्लिन (आईटीबी-बर्लिन) २०१५चा गोल्डन गेट रजत पुरस्कार जिंकला आहे.
·        गोल्डन गेट पुरस्कार हा पर्यटन क्षेत्रातील ऑस्कर मानला जातो.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा