प्रश्नसंच १२६ - इतिहास

[प्र.१] नगरांभोवती संरक्षणासाठी मोठी भिंती, भिंतीला ठराविक अंतरावर टेहळणीसाठी बुरुज, हे पुढीलपैकी कोणत्या संकृतीतील नगररचनेची वैशिष्ट्ये आहेत?
MT Quiz
१] वैदिक संस्कृती
२] गांधार संस्कृती
३] चीनी संस्कृती
४] हडप्पा संस्कृती


४] हडप्पा संस्कृती
----------------
[प्र.२] ICS प्राप्त करून देखील सुभाषचंद्र बोस यांनी नोकरीकडे पाठ का फिरवली?
१] त्यांना स्वातंत्र्य आंदोलनात उडी घ्यायची होती.
२] ब्रिटीशांची नोकरी करणे त्यांना आवडले नाही.
३] त्यांना इंग्लंडच्या राजसिंहासनाशी एकनिष्ठतेची शपथ घ्यायला सांगितले गेले.
४] त्यांना इंग्रजी सत्ता मान्य नव्हती.


३] त्यांना इंग्लंडच्या राजसिंहासनाशी एकनिष्ठतेची शपथ घ्यायला सांगितले गेले.
---------------
[प्र.३] एलफिन्स्टनला जमीन महसुलाच्या संदर्भात महाराष्ट्रात कोणती पद्धत लागू करावयाची होती?
१] कायमधारा पद्धत
२] रयतवारी पद्धत
३] महालवारी पद्धत
४] मौजेवारी पद्धत


४] मौजेवारी पद्धत
----------------
[प्र.४] “लेखण्या मोडा आणि तलवारी घ्या” असा संदेश कोणी दिला?
१] सरदार पटेल
२] लोकमान्य टिळक
३] गोपाल गणेश आगरकर
४] स्वातंत्र्यवीर सावरकर


४] स्वातंत्र्यवीर सावरकर
----------------
[प्र.५] योग्य विधाने ओळखा.
अ] जैन धर्माच्या सिद्धांतानुसार सूर्याच्या किरणांच्या उग्र स्वरूपामुळे जागतिक तापमानवाढ होते.
ब] भगवान महावीर यांनी २५३४ वर्षापूर्वी आजच्या “ग्लोबल वॉर्मिंग” या संकल्पनेविषयी भाकीत केले होते.

१] फक्त अ
२] फक्त ब
३] अ आणि ब दोन्ही
४] एकही नाही


३] अ आणि ब दोन्ही
----------------
[प्र.६] कोणते नेते पाश्चात्य ज्ञानाला “वाघिणीचे दुध” म्हणत?
१] फिरोझशहा मेहता
२] विष्णुबुवा ब्रम्हचारी
३] महादेव गोविंद रानडे
४] विष्णुशास्त्री चिपळूणकर


४] विष्णुशास्त्री चिपळूणकर
----------------
[प्र.७] पुणे कराराबाबत कोणती विधाने बरोबर आहेत.
अ] बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा गांधी यांच्यात तो झाला.
ब] आंबेडकरांची स्वतंत्र मतदारसंघाची मागणी मान्य झाली.
क] अस्पृश्यांना राखीव जागा देण्यात आल्या.

१] ब व क
२] अ व क
३] अ व ब
४] वरील सर्व


२] अ व क
----------------
[प्र.८] सत्यशोधक चळवळीचे वैशिष्ट्ये काय होती?
अ] परिवर्तनवादी चळवळ
ब] वर्गीय चळवळ
क] कृतीशील चळवळ
ड] क्रांतीवादी चळवळ

१] अ, ब आणि क
२] ब आणि क
३] फक्त अ
४] फक्त ड


१] अ, ब आणि क
----------------
[प्र.९] धार्मिक शुद्धी आणि बंगाली मुस्लीम समाजातील अनिष्ठ प्रथा नष्ट करण्यासाठी हाजी शरियत उल्ला यांनी कोणती चळवळ सुरु केली?
१] वहाबी चळवळ
२] टीटू-मीर चळवळ
३] फरीयादी चळवळ
४] क्रांतीवादी चळवळ


३] फरीयादी चळवळ
----------------
[प्र.१०] ब्राम्हणेतर चळवळीचा हेतू काय होता?
अ] समाजातील ब्राम्हणांच्या वर्चस्वाला विरोध न करणे.
ब] कनिष्ठ जातीच्या लोकांना सन्मानाचे स्थान देणे.
क] बहुजन समाजाचे राजकीय संघटन घडवून आणणे.
ड] ब्राम्हणेतरांना सामाजिक, आर्थिक व शैक्षणिक क्षेत्रात स्थान मिळवून देणे.

१] अ आणि ब
२] ब आणि क
३] ब, क आणि ड
४] फक्त ड


३] ब, क आणि ड
----------------

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा