चालू घडामोडी : २६ जुलै

नितीश कुमार यांचा बिहार मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा

  • संयुक्त जनता दलाचे (जेडीयू) नेते नितीश कुमार यांनी २६ जुलै रोजी बिहारच्या मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला.
  • संयुक्त जनता दलाच्या आमदारांसोबत झालेल्या बैठकीत नितीश यांनी मुख्यमंत्रिपद सोडण्याचा निर्णय घेतला. जदयूच्या आमदारांनीही नितीश यांच्या निर्णयाला पाठिंबा दिला आहे.
  • त्यानुसार नितीश कुमार राजभवनात जाऊन बिहारचे राज्यपाल केशरीनाथ त्रिपाठी यांच्याकडे आपला राजीनामा सुपूर्द केला. 
  • गेल्या काही दिवसांमध्ये राष्ट्रीय जनता दलाचे (राजद) नेते लालू प्रसाद यादव आणि त्यांचे पूत्र व बिहारचे उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप करण्यात आले होते.
  • त्यानंतर तेजस्वी यादव यांच्या उपमुख्यमंत्रिपदाचा राजीनामा घेण्यासाठी नितीश कुमार यांच्यावरील दबाव सातत्याने वाढत होता.
  • मात्र, तेजस्वी यादव कोणत्याही परिस्थितीत राजीनामा देणार नाहीत, अशी भूमिका लालू प्रसाद यादव यांनी घेतली होती.
  • त्यानंतर नितीश कुमार यांनी थेट मुख्यमंत्रिपद सोडून सर्वांनाच धक्का दिला. त्यांच्या या अनपेक्षित निर्णयामुळे राष्ट्रीय राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे.
  • बिहार विधानसभा निवडणुकांनंतर भाजपाला सत्तेबाहेर ठेवण्यासाठी राष्ट्रीय जनता दल (राजद), जनता दल यूनायटेड (जदयू) आणि काँग्रेस या तीन पक्षांनी एकत्र येऊन महागठबंधनचे सरकार स्थापन केले होते.
  • परंतु नितीश कुमार यांच्या राजीनाम्यामुळे या महागठबंधनाचा अंत झाल्याचे मानले जात आहे. आता बिहारमध्ये नवे सरकार स्थापन करण्यावर विचार-मंथन केले जाईल.
  • यामध्ये भाजपाची भूमिका महत्वाची ठरणार आहे. कारण आता बिहारमध्ये भाजपाच्या मदतीशिवाय सरकार बनवणे अशक्य आहे.
बिहारमधील पक्षीय बलाबल
बहुमतासाठी आवश्यक जागा: १२२
पक्ष जागा
राष्ट्रीय जनता दल (राजद) ८०
जनता दल यूनायटेड (जदयू) ७१
काँग्रेस २७
भाजप (विरोधी पक्ष) ५३
सीपीआय
लोक जनशक्ती पार्टी
राष्ट्रीय लोक समता पार्टी
हिंदुस्तानी अवाम मोर्चा
अपक्ष
एकूण २४३

बैलगाडी शर्यत विधेयकावर राष्ट्रपतींनी स्वाक्षरी

  • महाराष्ट्र शासनाने संमत केलेल्या बैलगाडी शर्यतीच्या विधेयकावर राष्ट्रपतींनी स्वाक्षरी केली असून, यामुळे आता बैलगाडी शर्यतींना कायदेशीर मान्यता मिळाली आहे.
  • महाराष्ट्राचे पशुसंवर्धन खाते यासंबंधी अधिसूचना काढणार असून, यापुढे अटी पाळून बैलगाडी शर्यती आयोजित करता येणार आहे.
  • यासाठी जिल्हाधिकाऱ्यांची परवानगी आवश्यक राहणार असून अटी लागू करुन जिल्हाधिकारी परवानगी देतील.
  • शर्यतीदरम्यान प्राण्यांसंदर्भातील नियमांची काटेकोरपणे अंमलबजावणी आणि प्राण्यांना यातना होणार नाहीत, याची काळजी घ्यावी लागेल.
  • प्राणीप्रेमींनी न्यायालयात धाव घेऊन बैलगाडा शर्यतीवर बंदी आणली होती. त्यानंतर तामिळनाडूच्या जलीकट्टूच्या धर्तीवर बैलगाडा शर्यत पुन्हा सुरू करण्यात यावी, यासाठी प्रयत्न चालू होते.
  • बैलागाड्यांची शर्यत पुन्हा सुरू व्हावी यासाठी शिवसेनेचे खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी पाठपुरावा केला होता. 
  • विधानसभेत प्राण्यांशी कौर्य प्रतिबंध विधेयक कायदा एकमताने मंजूर झाला होता. यानुसार प्राण्यांचे हाल केल्यास ३ वर्षे तुरुंगवास आणि ५ लाख रुपये दंडाची तरतूद करण्यात आली होती.
  • पशुसंवर्धन, दुग्धविकास आणि मत्स्यविकास मंत्री महादेव जानकर यांनी हे विधेयक महाराष्ट्र विधानसभेत मांडले होते.
 बैलगाडी शर्यतीबद्दल 
  • बैलगाडी शर्यत हा खेळ ग्रामीण भागात रुजला आहे. हा खेळ वेगवेगळ्या भागात वेगवेगळ्या प्रकारे होतो.
  • सांगली साताऱ्यात चाकोरीतून गाड्या पळवल्या जातात. एका वेळी चार किंवा पाच गाड्या एकाच वेळी पळतात. या शर्यतीत गट, सेमी फायनल आणि फायनल अशा गाड्या पळतात.
  • खेड भागात बैलगाडी शर्यतीसाठी घाट बांधले आहेत. घाटातून एकच गाडी पळते. इथे सेकंदावर नंबर दिले जातात. खेडच्या शर्यतीत, सगळ्यात पुढे घोडे, त्यामागे एक गाडी आणि शेवटी शर्यतीची गाडी असते.
  • विदर्भात बैलगाडी शर्यतीला शंकरपट म्हणतात. नाशिक जिल्ह्यातील काही गावात गाडीला घोडा आणि बैल जुंपून शर्यती होतात. रायगड जिल्ह्यात तर वाळूच्या रेतीत गाड्या पळवण्याची प्रथा आहे.

भारताला जागतिक बॉक्सिंग चॅम्पियनशिपचे यजमानपद

  • आंतरराष्ट्रीय बॉक्सिंग महासंघाने पुढील वर्षी होणाऱ्या महिलांच्या तसेच २०२१मधील पुरुषांच्या जागतिक बॉक्सिंग अजिंक्यपद स्पर्धेचे यजमानपद भारताला देण्याचा निर्णय घेतला.
  • आंतरराष्ट्रीय बॉक्सिंग महासंघाने (एआयबीए) मॉस्को येथे झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.
  • यामुळे भारत प्रथमच पुरुषांच्या विश्व बॉक्सिंग अजिंक्यपद स्पर्धेचे यजमानपद भूषविणार आहे.
  • भारताने यापूर्वी कधीच पुरुष विश्व चॅम्पियनशिपचे यजमानपद भूषविलेले नाही. २००६मध्ये महिला चॅम्पियनशिपचे भारतात आयोजन केले होते.
  • भारताने यापूर्वी मुंबईत १९९०मधील विश्वकरंडक आणि दिल्ली येथे २०१० राष्ट्रकुल अजिंक्यपद या दोनच पुरुषांच्या महत्त्वाच्या स्पर्धांचे आयोजन केले आहे.
  • भारतीय बॉक्सिंग महासंघावर प्रशासकीय गोंधळामुळे २०१२ ते २०१६ या कालावधीत निलंबनाची कारवाई करण्यात आली होती.
  • या पार्श्वभूमीवर, या दोन प्रतिष्ठेच्या स्पर्धांचे यजमानपद भारताला मिळणे ऐतिहासिक मानले जात आहे.
  • एआयबीए कार्यकारी समितीने २०१९च्या महिला बॉक्सिंग चॅम्पियनशिपचे यजमानपद तुर्कीतील ट्राबजोनला तर पुरुष बॉक्सिंग चॅम्पियनशिपचे यजमानपद रशियातील सोच्चीला बहाल केले आहे.
  • जागतिक स्पर्धेचा विचार करायचा झाला, तर भारताने पुरुष बॉक्सिंगमध्ये एकूण ३ पदके पटकावली आहेत. ही तिन्ही कांस्यपदके आहेत.
  • पदकविजेत्या भारतीय बॉक्सरमध्ये विजेंदरसिंग (२००९), विकास कृष्णा (२०११) आणि शिव थापा (२०१५) यांचा समावेश आहे.
  • तर महिलांमध्ये मेरी कोम हिने पाच वेळा जागतिक विजेतेपद मिळवून आपला ठसा उमटवला आहे.

विमानांमध्ये हिंदी वर्तमानपत्रे आणि मासिकांची सक्ती

  • नागरी विमानवाहतूक महासंचालनालयाने (डीजीसीए) सर्व विमान कंपन्यांना विमानांमध्ये इंग्रजी भाषेसोबत हिंदी वर्तमानपत्रे आणि मासिके उपलब्ध करून देणे सक्तीचे केले आहे.
  • प्रवाशांना हिंदी वर्तमानपत्रे आणि मासिके उपलब्ध होतायेत की नाही हे सुनिश्चित करण्यासाठी डीजीसीएने सर्व विमान कंपन्यांना नोटीस जारी केली आहे. 
  • विमानात हिंदी भाषेतील वाचन साहित्य न उपलब्ध  करून देणे, हे अधिकृत भाषेसाठी तयार करण्यात आलेल्या सरकारी धोरणाचे उल्लंघन ठरेल.

दिनविशेष : कारगिल विजय दिवस

  • कारगिल युद्धाला २६ जुलै रोजी १८ वर्षे झाली. २६ जुलै १९९९ रोजी भारतीय लष्कराने कारगिलमध्ये विजयी झेंडा फडकावला.
  • भारत आणि पाकिस्तानमध्ये १९९९साली कारगिल युद्ध झाले होते. पाकिस्तानी सैन्य आणि दहशतवाद्यांनी नियंत्रण रेषेचे उल्लंघन करून भारतात घुसखोरी केली होती.
  • ६० पेक्षा जास्त दिवस लढल्या गेलेल्या या कारगिल युद्धामध्ये भारताचे ५२७ जवान शहीद झाले. १९६५ आणि १९७१ पेक्षा या युद्धाचे स्वरुप वेगळे होते. 
  • प्रतिकूल परिस्थितीत भारतीय सैन्याने धाडसाने शत्रूवर विजय मिळवला होता. या संपूर्ण मोहिमेला ऑपरेशन विजय नाव देण्यात आले होते.
  • तेव्हापासून भारतीय लष्कराच्यादृष्टीने अतिशय महत्त्वाच्या असणारा २६ जुलै हा कारगिल विजयदिन म्हणून साजरा करण्यात येतो.

 भारतीय महिला क्रिकेट संघाचे प्रशिक्षक: तुषार अरोठे

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा