| 
·       
  २६
  फेब्रुवारी
  १९६६ : थोर
  स्वातंत्र्यवीर
  विनायक
  दामोदर
  सावरकर पुण्यतिथी | 
  | 
·       
  सौर
  कृषिपंप
  वितरण : 
·       
  केंद्र
  सरकारतर्फे
  राष्ट्रीय
  स्तरावर एक लाख
  सौर कृषिपंप
  वाटप करण्यात
  येणार 
·       
  राज्यात
  ७ हजार ५४०
  सौरऊर्जा
  पंपांचे
  वितरण
  करण्यात येणार
  असून, यासाठी
  सुमारे ४४५
  कोटी रुपये
  खर्च अपेक्षित
  आहे. 
·       
  राज्याच्या
  वाट्याची
  पाच टक्के
  रक्कम (२२ कोटी
  २५ लाख रुपये)
  हरित ऊर्जा
  निधीमधून देण्यात
  येणार आहे. 
·       
  सुरवातीला या
  योजनेंतर्गत
  राज्यासाठी ४
  हजार ६०० सौर
  कृषिपंप
  वाटप करण्याचे
  उद्दिष्ट आहे. 
·       
  योजनेची
  अंमलबजावणी ‘महावितरण’मार्फत
  करण्यात
  येईल. तसेच, ‘महाऊर्जा’मार्फत
  तांत्रिक
  साह्य
  पुरविण्यात
  येईल. | 
  | 
·       
  पंतप्रधान
  नरेंद्र
  मोदी यांनी  शेतकऱ्यांसाठी 
  शेतजमिनीचे
  आरोग्य
  सांभाळण्यासाठी
  व
  खतांच्या
  बेसुमार
  वापरामुळे जमिनीचा
  पोत बिघडू
  नये यासाठी
  मृदा
  स्वास्थ्य
  कार्ड (सॉईल
  हेल्थ कार्ड) योजना सुरु केली
  आहे. | 
  | 
·       
  सोशल
  नेटवर्किंगवर
  आत्महत्यांचे
  पोस्ट्स
  टाकून
  आत्महत्या
  करणाऱ्यांचे
  प्रमाण कमी करण्यासाठी फेसबुकने
  पाऊल उचलले
  असून आता
  वापरकर्त्यांना
  अशा पोस्ट्स
  रिपोर्ट
  करण्याची व
  मदतीसाठी
  हेल्पलाईनला
  संपर्क
  करण्याची
  सुविधाही
  मिळणार आहे.  
·       
  फेसबूक
  व ‘फोरफ्रंट :
  इनोव्हेशन
  इन सुसाइड
  प्रिव्हेंशन’
  या
  वॉशिंग्टन
  विद्यापीठातील
  संस्थेच्या
  संयुक्त
  विद्यमाने
  ही सुविधा तयार
  करण्यात आली
  आहे. | 
  | 
·       
  एका
  आत्मघातकी
  हल्लेखोराने
  स्फोटकांनी
  भरलेली एक
  कार घेऊन ‘नाटो’च्या
  अफगाणिस्तानातील
  एका प्रमुख
  अधिकाऱ्याच्या
  गाडीला धडक
  दिली.
  यामध्ये एक तुर्कीश
  सैनिक मारला
  गेला, तर
  एकजण जखमी झाला. | 
  | 
·       
  टाटा
  समूहाचे
  माजी
  अध्यक्ष रतन
  टाटा यांना ऑटोमोटिव्ह इंजिनिअरिंग
  क्षेत्रात
  डॉक्टरेट
  पदवीने
  सन्मानित करण्यात
  आले आहे.
  दक्षिण
  कॅरोलिना
  येथे होणाऱ्या
  ऑटोमोटिव्ह
  शिखर
  परिषदेत
  त्यांना हा सन्मान
  प्रदान
  करण्यात आला. 
·       
  रतन
  टाटा यांनी १९६२ मध्ये
  टाटा समूहात
  प्रवेश केला
  होता. त्यानंतर
  १९८१ साली
  त्यांनी
  टाटा
  समूहाचे
  अध्यक्षपद
  स्वीकारले
  होते.  
·       
  कॉर्नेल
  युनिव्हर्सिटीमधून
  आर्किटेक्चरची
  पदवी
  मिळवल्यानंतर
  टाटा यांनी
  हार्वर्ड युनिव्हर्सिटीमध्ये
  व्यवस्थापन (अॅडव्हान्स
  मॅनेजमेंट
  प्रोग्राम)
  क्षेत्रात
  उच्चशिक्षण
  घेतले आहे. | 
  | 
·       
  भारतीय
  दूरसंचार
  नियामक
  प्राधिकरणाने
  ३ मे पासून
  कोणताही
  क्रमांक
  कोणत्याही
  सेवापुरवठादाराकडे
  हस्तांतरिक
  करण्यासाठी
  नियमावली
  जाहीर केली आहे.
  त्यामुळे
  भारतातील
  मोबाईलधारकांना
  मोबाईल
  क्रमांक न
  बदलता
  कोणत्याही
  सेवा पुरवठादारांकडे
  हस्तांतरित
  करता येणे
  शक्य होणार
  आहे.  
·       
  यापूर्वी
  एखादा
  क्रमांक
  अन्य
  सेवापुरवठादाराकडे
  हस्तांतरित
  करण्यासाठी
  मर्यादा होत्या. मूळ
  सेवापुरवठादाराच्या
  सेवा ज्या
  परिक्षेत्रात
  उपलब्ध आहेत
  तेथेच
  मोबाईल
  क्रमांक अन्य
  सेवापुरवठादारांकडे
  हस्तांतरीत
  करता येणे
  शक्य होते.  
·       
  मात्र. ट्रायच्या
  नव्या
  नियमावलीनुसार
  कोणताही ग्राहक
  कोणत्याही
  सेवापुरवठादाराकडील
  कोणताही
  क्रमांक
  भारतातील
  कोणत्याही
  ठिकाणी अन्य
  सेवापुरवठादारांकडे
  हस्तांतरित
  करू शकेल. | 
  | 
·       
  चारशे
  युनिटपर्यंत
  वीज वापरावर
  पन्नास टक्के
  दरकपात
  करण्याचा
  निर्णय दिल्ली
  सरकारने
  घेतला आहे. या
  निर्णयाचा
  थेट फायदा ९०
  टक्के
  दिल्लीकरांना
  होणार आहे. | 
  | 
·       
  बिल्डर
  प्रदीप जैन
  यांच्या खून
  प्रकरणातील दोषी
  कुख्यात
  गुन्हेगार
  अबू सालेम आणि
  मेहंदी हसन
  यांना विशेष ‘टाडा’
  न्यायालयाने
  जन्मठेपेची
  शिक्षा ठोठावली.
   
·       
  सालेमने
  दुबईत
  असताना १९९५
  मध्ये जैन
  यांची हत्या
  घडवून आणली
  होती. | 
  | 
·       
  भ्रष्टाचारासंदर्भातील
  प्रकरणांच्या
  सुनावणीसाठी
  उपस्थित न
  राहिल्याने
  बांगला देशमधील
  न्यायालयाने
  विरोधी पक्ष
  नेत्या बेगम खालिदा
  झिया
  यांच्या
  विरोधात अटक
  वॉरंट बजावले
  आहे. | 
  | 
·       
  मेक
  इन
  इंडियाच्या
  धर्तीवर
  व्हिडीओकॉन
  कंपनीने भारतातील
  पहिल्या
  वहिल्या
  वायफाय
  एसीची निर्मिती
  केली आहे. | 
  | 
·       
  महाराष्ट्र
  विद्यापीठ
  अधिनियमानुसार
  विद्यापीठाच्या
  कुलगुरूचे
  पद रिक्त
  झाल्यापासून
  १२ महिन्यांसाठी
  प्रभारी
  कुलगुरूंची
  नियुक्ती
  करण्यात येत
  होती.  
·       
  या
  अधिनियमात
  दुरुस्ती
  केल्यामुळे
  हा कालावधी
  आता १२
  महिन्यांवरून
  १८
  महिन्यांपर्यंत
  वाढविण्यात
  आला आहे. | 
  | 
·       
  पुण्याजवळ
  झालेल्या
  सुखोई
  विमानाच्या
  अपघाताला ‘मानवी
  चूक’ कारणीभूत
  होती, असा दावा
  सुखोई
  विमानाची
  मूळ रशियन
  उत्पादक असलेल्या
  इर्कुट
  कॉर्पोरेशन कंपनीने
  केला आहे. 
·       
  इर्कुट
  कॉर्पोरेशनचे
  उपाध्यक्ष
  (लष्करी विक्री)
  - विटाली
  बोरोडिच | 
  | 
·       
  आयसीसीने
  विश्वपकरंडक
  स्पर्धेसाठी
  खेळाडूंसाठी
  लागू
  केलेल्या
  आचारसंहितेनुसार
  खेळाडूंनी
  रात्री
  दहाच्या आत
  आपल्या
  रुममध्ये
  असणे
  बंधनकारक
  आहे. 
·       
  या
  नियमाचे
  उल्लंघन
  केल्याप्रकरणी
  बेशिस्त
  वर्तनाबद्दल
  बांगलादेश
  संघ
  व्यवस्थापनाने
  वेगवान
  गोलंदाज अल अमिन
  हुसेन याला
  घरी पाठवून
  दिले आहे.
  त्याच्याऐवजी
  शफीऊल
  इस्लाम याला
  संघात स्थान
  देण्यात आले.
  आहे. | 
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा