चालू घडामोडी - २१ व २२ फेब्रुवारी २०१५

·      २२ फेब्रुवारी १९५४- पहिली कापड गिरणी मुंबईत सुरु
·      अज्ञात हल्लेखोरांच्या भ्याड हल्ल्यात जखमी झाल्यानंतरGovind Pansare गेले पाच दिवस मृत्यूशी झुंज देणारे ज्येष्ठ कम्युनिस्ट नेते, पुरोगामी विचारवंत, कामगार व श्रमिकांचे कैवारी गोविंद पानसरे ऊर्फ अण्णा (वय ८२) यांचे ब्रीच कॅंडी रुग्णालयात निधन झाले.
·      गेल्या सोमवारी (१६ फेब्रुवारी) सकाळचा फेरफटका मारल्यानंतर घरी परतणाऱ्या गोविंद पानसरे आणि त्यांच्या पत्नी उमा यांच्यावर दोघा जणांनी बंदुकीतून गोळीबार केला होता. या हल्ल्यात पानसरे दांपत्य गंभीर जखमी झाले होते.
·      पानसरे यांना तीन गोळ्या लागल्या होत्या. उमा यांची प्रकृती सुधारत आहे. मागील पाच दिवसांपासून गोविंद पानसरे यांच्यावर कोल्हापूर येथील ऍस्टर आधारमध्ये उपचार सुरू होते.
·      तेथे त्यांच्यावर तीन शस्त्रक्रियाही करण्यात आल्या होत्या. त्यांचा रक्तदाबही नियंत्रणात होता; परंतु त्यांच्यावर अत्याधुनिक स्वरूपाचे उपचार व्हावेत, यासाठी राज्य शासन आग्रही होते.
·      त्यानुसार त्यांना पुढील उपचारासाठी एअर ऍम्ब्युलन्समधून मुंबईतील ब्रीच कॅंडी रुग्णालयात दाखल केले होते.
·      अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांच्या भारतदौऱ्याच्यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी परिधान केलेल्या बंद गळ्याच्या सुटला आज लिलावात तब्बल कोटी ३१ लाख रुपयांची विक्रमी किंमत मिळाली.
·      सुरतचे हिरे व्यापारी लालजी पटेल आणि त्यांच्या मुलाने ही विक्रमी बोली लावून सूट घेतला.
·      पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मिळालेल्या ४६० भेटवस्तूंच्या लिलावातून गंगा स्वच्छता मोहिमेसाठी आठ कोटी ३३ लाख रुपयांची रक्कम मिळाली आहे. या रकमेत मोदींच्या बहुचर्चित सूटच्या रकमेचाही समावेश आहे.
·      ऑस्ट्रेलियाच्या ईशान्य किनारपट्टीस मार्सिया या वादळाचा जोरदार फटका बसल्याने क्वीन्सलॅंड भागामध्ये वीजपुरवठा खंडित झाला असून या भागामधील नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले आहे.
·      क्वीन्सलॅंडमधील सेंट लॉरेन्स आणि येप्पों यांमधील किनारपट्टीस वादळाचा मोठा फटका बसला आहे.
·      गल्फ ऑइल कॉर्पोरेशनच्या आवारात झालेल्या एका स्फोटात दोन जण मृत्युमुखी पडले, तर इतर १३ जण भाजून जखमी झाले आहेत.
·      केवळ कोळसा खाणींच्या लिलावानंतर पाच दिवसातच सरकारकडे ६० हजार कोटी रूपयांची रक्कम जमा झाली आहे.
·      सरकारने याआधी २०४ कोळसा खाणींचे वाटप रद्द केले होते. आता या सर्व खाणींचे नव्याने वाटप झाल्यानंतर १५ लाख कोटींची रक्कम गोळा होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
·      रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांचे टीकाकार व विरोधी पक्ष नेते ऍलेक्‍सी नवाल्नी यांना पंधरा दिवसांच्या कारावासाची शिक्षा सुनाविण्यात आली आहे.
·      नवाल्नी हे पुतीन यांच्याविरोधात येत्या मार्च रोजी मोर्चा काढणार होते. या कारावासामुळे त्यांना मोर्चामध्ये सहभागी होता येणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे.
·      नवाल्नी यांना आर्थिक गैरव्यवहारासंदर्भात ही शिक्षा सुनाविण्यात आली आहे.
·      इराक व सीरिया या दोन देशांमधील शेकडो मैलांच्या भूप्रदेशावर ताबा मिळविलेल्या इस्लामिक स्टेट (इसिस) या दहशतवादी संघटनेच्या पाशामधून मोसूल शहर मुक्त करण्यासाठी अमेरिका व इराक या दोन देशांनी एकत्रितरित्या सैनिकी कारवाई करण्याची योजना आखली आहे. मोसूल हे इराकमधील दुसरे सर्वांत मोठे शहर आहे.
·      येत्या एप्रिल-मे महिन्यामध्ये ही कारवाई केली जाण्याची शक्‍यता आहे. यासाठी वापरावयाच्या सैन्यामध्ये इराकी सैन्याच्या पाच तुकड्या असतील.
·      याचबरोबर, या लढाईमध्ये कुर्दिश पशमेर्गा जमातीच्या तीन तुकड्याही सहभागी होणार आहेत. या कारवाईसाठी एकूण २५ हजार सैन्य वापरण्यात येणार आहे.
·      बिहारमधील अनेकJitanram Manji दिवसांच्या राजकीय संघर्षाच्या पार्श्‍वभूमीवर मुख्यमंत्री जीतन राम मांझी यांनी अखेर राजीनामा दिला. बिहार विधानसभेमध्ये आज मांझी यांना बहुमत सिद्ध करावयाचे होते. मात्र त्याआधीच मांझी यांनी राजीनामा दिला.
·      त्यानंतर राज्यपाल केशरीनाथ त्रिपाठी यांनी संयुक्त जनता दलाचे नेते नितीशकुमार यांना सरकार स्थापनेचे निमंत्रण दिले. ते २२ फेब्रुवारीला बिहारच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतील.
·      मराठा समाजाच्या आरक्षणप्रकरणी न्यायालयाचा निर्णय लागेपर्यंत राखीव जागा भरणार नाही.
·      शिक्षण व नोकऱ्यांमध्ये ज्या जागा भरल्या आहेत, त्यांना संरक्षण देण्याबाबतचे आदेश काढल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी किल्ले शिवनेरी (ता. जुन्नर) येथे बोलताना दिली.
·      अनिवासी भारतीयांना त्यांच्या तक्रारी ऑनलाइन नोंदविण्यासाठी आणि त्यांचे निवारण करण्यासाठी केंद्र सरकारने मदद’ (मदत) या पोर्टलचे आज उद्‌घाटन केले.
·      विदेशातील भारतीय नागरिकांच्या तक्रारींची पूर्ण जबाबदारीपूर्वक निवारण करण्यासाठी हे पोर्टल सुरू केल्याचे सरकारने सांगितले आहे.
·      मददची वैशिष्ट्ये
१.  योग्य व्यक्तीपर्यंत तक्रार पोचविणे.
२.  तक्रार निवारणाचा वेग वाढणे.
३.  तक्रार निवारणाचा आढावा घेणे.
४.  अधिकाऱ्यांवर जबाबदारी निश्‍चिती.
                                                                                                                      

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा