| 
·     
  २२
  फेब्रुवारी १९५४-
  पहिली कापड
  गिरणी
  मुंबईत सुरु | 
  | 
·     
  अज्ञात
  हल्लेखोरांच्या
  भ्याड
  हल्ल्यात जखमी
  झाल्यानंतर गेले पाच
  दिवस
  मृत्यूशी
  झुंज देणारे ज्येष्ठ
  कम्युनिस्ट
  नेते, पुरोगामी
  विचारवंत, कामगार व
  श्रमिकांचे
  कैवारी
  गोविंद
  पानसरे ऊर्फ
  अण्णा (वय
  ८२) यांचे
  ब्रीच कॅंडी
  रुग्णालयात
  निधन झाले. 
·     
  गेल्या
  सोमवारी (१६
  फेब्रुवारी) सकाळचा
  फेरफटका
  मारल्यानंतर
  घरी
  परतणाऱ्या
  गोविंद
  पानसरे आणि
  त्यांच्या
  पत्नी उमा यांच्यावर
  दोघा जणांनी
  बंदुकीतून
  गोळीबार केला
  होता. या
  हल्ल्यात
  पानसरे
  दांपत्य
  गंभीर जखमी
  झाले होते.  
·     
  पानसरे
  यांना तीन
  गोळ्या
  लागल्या होत्या.
  उमा यांची
  प्रकृती
  सुधारत आहे.
  मागील पाच
  दिवसांपासून
  गोविंद
  पानसरे
  यांच्यावर कोल्हापूर
  येथील ऍस्टर
  आधारमध्ये
  उपचार सुरू
  होते.  
·     
  तेथे
  त्यांच्यावर
  तीन
  शस्त्रक्रियाही
  करण्यात
  आल्या
  होत्या.
  त्यांचा
  रक्तदाबही
  नियंत्रणात
  होता; परंतु
  त्यांच्यावर
  अत्याधुनिक
  स्वरूपाचे उपचार
  व्हावेत, यासाठी
  राज्य शासन
  आग्रही होते.  
·     
  त्यानुसार
  त्यांना
  पुढील
  उपचारासाठी
  एअर ऍम्ब्युलन्समधून
  मुंबईतील
  ब्रीच कॅंडी
  रुग्णालयात
  दाखल केले
  होते. | 
  | 
·     
  अमेरिकेचे
  अध्यक्ष बराक
  ओबामा
  यांच्या
  भारतदौऱ्याच्यावेळी
  पंतप्रधान
  नरेंद्र
  मोदी यांनी
  परिधान
  केलेल्या
  बंद
  गळ्याच्या
  सुटला आज
  लिलावात
  तब्बल ४
  कोटी ३१ लाख
  रुपयांची
  विक्रमी
  किंमत मिळाली.  
·     
  सुरतचे
  हिरे
  व्यापारी
  लालजी पटेल आणि
  त्यांच्या
  मुलाने ही
  विक्रमी
  बोली लावून
  सूट घेतला. 
·     
  पंतप्रधान
  नरेंद्र
  मोदी यांना
  मिळालेल्या ४६० भेटवस्तूंच्या
  लिलावातून
  गंगा
  स्वच्छता मोहिमेसाठी
  आठ कोटी ३३ लाख
  रुपयांची
  रक्कम
  मिळाली आहे. या रकमेत
  मोदींच्या
  बहुचर्चित
  सूटच्या रकमेचाही
  समावेश आहे. | 
  | 
·     
  ऑस्ट्रेलियाच्या
  ईशान्य
  किनारपट्टीस
  मार्सिया या
  वादळाचा
  जोरदार फटका बसल्याने
  क्वीन्सलॅंड
  भागामध्ये
  वीजपुरवठा
  खंडित झाला
  असून या
  भागामधील
  नागरिकांना सुरक्षित
  स्थळी
  हलविण्यात
  आले आहे.  
·     
  क्वीन्सलॅंडमधील
  सेंट
  लॉरेन्स आणि
  येप्पों
  यांमधील
  किनारपट्टीस
  वादळाचा
  मोठा फटका
  बसला आहे. | 
  | 
·     
  गल्फ
  ऑइल
  कॉर्पोरेशनच्या
  आवारात झालेल्या
  एका स्फोटात
  दोन जण
  मृत्युमुखी पडले, तर इतर १३
  जण भाजून
  जखमी झाले
  आहेत. | 
  | 
·     
  केवळ
  कोळसा
  खाणींच्या
  लिलावानंतर
  पाच दिवसातच
  सरकारकडे ६०
  हजार कोटी रूपयांची
  रक्कम जमा
  झाली आहे.  
·     
  सरकारने
  याआधी २०४ कोळसा
  खाणींचे
  वाटप रद्द
  केले होते.
  आता या सर्व
  खाणींचे
  नव्याने
  वाटप
  झाल्यानंतर १५ लाख
  कोटींची
  रक्कम गोळा
  होण्याची
  शक्यता व्यक्त
  केली जात आहे. | 
  | 
·     
  रशियाचे
  राष्ट्राध्यक्ष
  व्लादिमीर
  पुतीन यांचे
  टीकाकार व
  विरोधी पक्ष
  नेते ऍलेक्सी
  नवाल्नी यांना पंधरा
  दिवसांच्या कारावासाची
  शिक्षा
  सुनाविण्यात
  आली आहे.  
·     
  नवाल्नी
  हे पुतीन
  यांच्याविरोधात
  येत्या १
  मार्च रोजी
  मोर्चा
  काढणार होते.
  या कारावासामुळे
  त्यांना
  मोर्चामध्ये
  सहभागी होता
  येणार
  नसल्याचे
  स्पष्ट झाले
  आहे.  
·     
  नवाल्नी
  यांना
  आर्थिक
  गैरव्यवहारासंदर्भात
  ही शिक्षा
  सुनाविण्यात
  आली आहे. | 
  | 
·     
  इराक
  व सीरिया या
  दोन
  देशांमधील
  शेकडो मैलांच्या
  भूप्रदेशावर
  ताबा
  मिळविलेल्या
  इस्लामिक
  स्टेट (इसिस) या
  दहशतवादी
  संघटनेच्या
  पाशामधून
  मोसूल शहर
  मुक्त
  करण्यासाठी
  अमेरिका व
  इराक या दोन
  देशांनी
  एकत्रितरित्या
  सैनिकी
  कारवाई करण्याची
  योजना आखली
  आहे. मोसूल
  हे इराकमधील
  दुसरे
  सर्वांत
  मोठे शहर आहे. 
·     
  येत्या
  एप्रिल-मे
  महिन्यामध्ये
  ही कारवाई
  केली
  जाण्याची शक्यता
  आहे. यासाठी
  वापरावयाच्या
  सैन्यामध्ये
  इराकी
  सैन्याच्या
  पाच तुकड्या
  असतील.  
·     
  याचबरोबर,
  या
  लढाईमध्ये
  कुर्दिश
  पशमेर्गा
  जमातीच्या तीन
  तुकड्याही
  सहभागी
  होणार आहेत.
  या
  कारवाईसाठी एकूण २५
  हजार सैन्य वापरण्यात
  येणार आहे. | 
  | 
·     
  बिहारमधील
  अनेक दिवसांच्या
  राजकीय
  संघर्षाच्या
  पार्श्वभूमीवर
  मुख्यमंत्री
  जीतन राम
  मांझी यांनी अखेर
  राजीनामा
  दिला.
  बिहार
  विधानसभेमध्ये
  आज मांझी
  यांना बहुमत
  सिद्ध
  करावयाचे
  होते. मात्र
  त्याआधीच मांझी
  यांनी
  राजीनामा
  दिला. 
·     
  त्यानंतर राज्यपाल केशरीनाथ
  त्रिपाठी यांनी संयुक्त
  जनता दलाचे
  नेते नितीशकुमार
  यांना सरकार
  स्थापनेचे
  निमंत्रण दिले. ते २२
  फेब्रुवारीला
  बिहारच्या
  मुख्यमंत्रिपदाची
  शपथ घेतील. | 
  | 
·     
  मराठा
  समाजाच्या
  आरक्षणप्रकरणी
  न्यायालयाचा
  निर्णय
  लागेपर्यंत
  राखीव जागा
  भरणार नाही.  
·     
  शिक्षण
  व
  नोकऱ्यांमध्ये
  ज्या जागा
  भरल्या आहेत, त्यांना
  संरक्षण
  देण्याबाबतचे
  आदेश काढल्याची
  माहिती
  मुख्यमंत्री
  देवेंद्र
  फडणवीस यांनी
  किल्ले
  शिवनेरी (ता.
  जुन्नर) येथे
  बोलताना दिली. | 
  | 
·     
  अनिवासी
  भारतीयांना
  त्यांच्या
  तक्रारी ऑनलाइन
  नोंदविण्यासाठी
  आणि
  त्यांचे
  निवारण
  करण्यासाठी केंद्र
  सरकारने ‘मदद’ (मदत)
  या पोर्टलचे
  आज उद्घाटन
  केले.  
·     
  विदेशातील
  भारतीय
  नागरिकांच्या
  तक्रारींची
  पूर्ण
  जबाबदारीपूर्वक
  निवारण
  करण्यासाठी
  हे पोर्टल
  सुरू केल्याचे
  सरकारने
  सांगितले
  आहे. 
·     
  ‘मदद’ची
  वैशिष्ट्ये  
१. 
  योग्य
  व्यक्तीपर्यंत
  तक्रार
  पोचविणे. 
२. 
  तक्रार
  निवारणाचा
  वेग वाढवणे.  
३. 
  तक्रार
  निवारणाचा
  आढावा घेणे.  
४.  अधिकाऱ्यांवर
  जबाबदारी
  निश्चिती. | 
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा