चालू घडामोडी - २१ जानेवारी २०१५

·        २१ जानेवारी १९७२ : मणिपूर व मेघालय या राज्यांना स्वतंत्र राज्याचा दर्जा मिळाला.
·        विधानसभेसाठी तिकीट नाकारले म्हणून नाराज झालेले काँग्रेसच्या टेक्नोसॅव्ही कार्यकर्ता संजय पुरी यांनी पक्षाच्या दिल्लीDelhi Congress website विभागाची वेबसाइट आणि ऑनलाइन मुखपत्र संदेशचे पोर्टल बंद करुन पक्ष सोडला.
·        संजय पुरी मागील ३० वर्षापासून काँग्रेससाठी काम करत आहेत. टेक्नोसॅव्ही असल्यामुळे पक्षाने डिजिटल प्रचाराची जबाबदारी त्यांच्याकडे दिली होती.
·        संजय पुरी यांच्या बंडामुळे दिल्ली काँग्रेसची http://dpcc.co.in ही वेबसाइट आणि http://congresssandesh.com हे पोर्टल २० जानेवारी संध्याकाळपासून बंद आहे.
·        बेळगावमध्ये होणाऱ्या ९५व्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाचा कार्यक्रम जाहीर झाला आहे.
·        संमेलनाचे उद्‍घाटन ७ फेब्रुवारीला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते होणार आहे.
·        संमेलनस्थळाला बाळासाहेब ठाकरे नगरी असे नाव देण्यात येणार आहे, तर संमेलनाच्या मुख्य मंचाला स्मिता तळवलकर यांचे नाव देण्यात येणार आहे.
·        २६ जानेवारीला राजपथावरील प्रजासत्ताक दिनाच्या संचलनामध्ये प्रथमच तिन्ही सेना दलांमधील महिलांचे स्वतंत्र पथक सहभागी.
·        स्विस रिसॉर्टने सन २०१५ साठी जगातील सर्वांत विश्वासू व जबाबदार असणाऱ्या २७ देशांचे सर्वेक्षण केले आहे.
·        यामध्ये भारताने दुसऱ्या क्रमांकावर झेप घेतली आहे. यूएई, भारत, चीन व नेदरलॅन्ड असे पहिले चार विश्वासू देश आहेत. यानंतर जपान, रशिया, हॉंगकॉंग, दक्षिण आफ्रिका व इटली, ब्राझील, मलेशिया, फ्रान्स व अमेरिकेचा क्रमांक लागतो.
·        सर्वेक्षणादरम्यान सरकार, व्यवसाय, प्रसारमाध्यमे व सामाजिक संस्थांचा अभ्यास करण्यात आला.
·        भारताने १०० पैकी ७९ क्के गुण मिळवून दुस-या क्रमांक पटकावला. मागील वर्षी भारत या यादीमध्ये पाचव्या क्रमांकावर होता.
·        देशातील प्रत्येक कुटुंबाला बँकेची सेवा मिळावा या हेतूने केंद्र सरकारने सुरू केलेल्या जनधन योजनेला प्रचंड प्रतिसाद मिळाला असून आत्तापर्यंत ११.५ कोटी बँक खाती उघडण्यात आली आहेत.
·        दहा कोटींचे टार्गेटही बँकांनी पारPradhanmantri Jan Dhan Yojna केले असून देशातील ९९.७४ टक्के कुटुंबे म्हणजे जवळजवळ अवघा भारत बँकांशी जोडला गेला आहे.
·        जनधन खात्यात ९ हजार कोटी रुपये जमा झालेले असून या उपक्रमाची गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डनेही दखल घेतली आहे.
·        गेल्या वर्षी स्वातंत्र्य दिनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनधन योजनेची घोषणा केली.२६ जानेवारीपर्यंत साडेसात कोटी खाती उघडण्याचे टार्गेट सार्वजनिक बँकांना देण्यात आले. हे टार्गेट नंतर दहा कोटींपर्यंत वाढवण्यात आले.
·        सामाजिक सुरक्षा योजनांचे पैसे या खात्यात जमा होतील त्यामुळे खात्याचा वापर होत राहील.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा