चालू घडामोडी : २३ ऑगस्ट

निधन: ज्येष्ठ पत्रकार, लेखक मानवाधिकार कार्यकर्ते कुलदीप नय्यर

  • ज्येष्ठ पत्रकार, लेखक, शांततेसाठी काम करणारे मानवाधिकार कार्यकर्ते कुलदीप नय्यर यांचे २२ ऑगस्ट रोजी दिल्लीत वयाच्या ९५व्या वर्षी निधन झाले.
  • देशातल्या नामवंत वृत्तपत्रांसाठी त्यांनी स्तंभलेखन केले होते. आणीबाणीच्या काळात नय्यर हे तुरुंगातही गेले होते.
  • कुलदीप नय्यर यांचा जन्म १४ ऑगस्ट १९२३ रोजी पाकिस्तानच्या सियालकोट भागात झाला. लाहोरमध्ये त्यांनी एल.एल.बी.पर्यंतचे शिक्षण पूर्ण केले.
  • नॉर्थवेस्टर्न युनिव्हर्सिटीच्या मेडिल स्कूल ऑफ जर्नालिझममधून त्यांनी शिष्यवृत्तीवर पत्रकारितेचे शिक्षण घेतले.
  • ‘अंजाम’ नावाच्या एका उर्दू वृत्तपत्रातून आपल्या कारकीर्दीची सुरुवात केली आणि त्यानंतर त्यांनी इंग्रजी पत्रकारितेकडे आपली वाटचाल केली.
  • दिल्लीतील ‘द स्टेट्समन’या इंग्रजी वृत्तपत्रात संपादक म्हणून काम केल्यानंतर ते ‘इंडियन एक्स्प्रेस’मध्ये रुजू झाले आणि तेथेही संपादकपदही भूषवले.
  • ते पत्रकारितेच्या १९७५च्या आणीबाणी विरोधातील लढाईचे प्रतीक बनले होते. सरकारी हस्तक्षेपाविरोधात निदर्शनांचे नेतृत्व करणाऱ्या नय्यर यांना अंतर्गत सुरक्षा कायद्याखाली त्यावेळी तुरुंगात टाकण्यात आले होते.
  • १९९६मध्ये संयुक्त राष्ट्रात गेलेल्या भारताच्या प्रतिनिधीमंडळाचे ते सदस्य होते. ऑगस्ट त्यांची १९९७ साली राज्यसभेवर खासदार म्हणूनही नियुक्ती झाली होती.
  • १९९०मध्ये ब्रिटनमधील भारताचे उच्चायुक्त म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली होती.
  • इंडियन एक्स्प्रेससह डेक्कन हेराल्ड, द डेली स्टार, द संडे गार्डियन, द न्यूज तसेच पाकिस्तानमधील द एक्सप्रेस ट्रिब्युन, डॉन अशा १४ भाषेतील ८०हून अधिक वृत्तपत्रांसाठी त्यांनी स्तंभलेखन केले होते.
  • इंडिया आफ्टर नेहरु, इमर्जन्सी रिटोल्ड अशा राजकीय, सामाजिक विषयावरील विविध १५ पुस्तकांचे लेखन नय्यर यांनी केले आहे.
  • ‘बिटविन द लाइन्स’ हा त्यांचा सर्वांधिक वाचला जाणारा कॉलमही त्यांच्या अखेरच्या श्वासापर्यंत सुरू होता.
  • २०१५साली पत्रकारितेतील त्यांच्या देदीप्यमान कार्यासाठी इंडियन एक्स्प्रेस समूहाने रामनाथ गोयंका उत्कृष्ट पत्रकारितेचा जीवनगौरव पुरस्कार देऊन त्यांना सन्मानित केले.
  • सत्तेच्या दबावापुढे कधी मान न झुकविणारे, भारत-पाक शांतीपर्वासाठी अव्याहतपणे संघर्ष करणारे मानवतावादी, व्यासंगी आणि निर्भीड पत्रकार म्हणून ते कायम स्मरणात राहतील.
  • नय्यर यांची काही पुस्तके : बियाँड द लाइन्स, इंडिया - द क्रिटिकल इयर्स, डिस्टंट नेबर्स, सप्रेशन ऑफ जजेस, इंडिया आफ्टर नेहरू, द जजमेंट - इनसाइड स्टोरी ऑफ द इमर्जन्सी इन इंडिया, वॉल अॅट वाघा, विदाऊट फिअर: द लाइफ अँड ट्रायल ऑफ भगत सिंग.

भामला फाऊंडेशनच्या प्लास्टीकविरोधी मोहिमेची युनोकडून दखल

  • भामला फाऊंडेशनच्या ‘प्लास्टीक जनजागृती’विषयक मोहिमेला संयुक्त राष्ट्र संघटनेकडून ‘जागतिक स्तरावरील प्लास्टीक जनजागृतीविषयक मोहिम’ म्हणून घोषित करण्यात आले.
  • संयुक्त राष्ट्र संघटनेच्या न्यूयार्क (अमेरिका) येथील मुख्य कार्यालयात बोलावून भामला फाऊंडेशनला सन्मानित करण्यात आले.
  • त्याचबरोबर या प्रभावी सांगितिक मोहिमेला युनोने आपल्या पर्यावरण विषयक मोहिमेतही सामील करून घेतले आहे.
  • ‘टिक, टिक, प्लास्टिक टिक ना पाए रे…’ या यूटय़ूबवर गाजत असलेल्या गाण्याची निर्मिती भामला फाऊंडेशनच्या वतीने करण्यात आली होती.
  • या गाण्याचे ५ जून या पर्यावरण दिनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अनावरण करण्यात आले होते. या गाण्याला जगभरातून उत्तम प्रतिसाद मिळाला.
  • गाण्याच्या माध्यमातून प्लास्टिकच्या वापराबाबत जनजागृतीचा संदेश देण्यासाठी यामध्ये संगीत आणि बॉलीवूड क्षेत्रातील अनेक दिग्गज सहभागी झाले होते.
  • शक्य तिथे प्लास्टिकचा वापर टाळा आणि एका वेळेसच वापराच्या दर्जाच्या प्लास्टिकवर बंदी घाला, असा महत्त्वपूर्ण संदेश घेऊ न भामला फाऊंडेशनने या गाण्याची निर्मिती केली होती.
  • प्रसिद्ध संगीतकार शान यांनी या गाण्याला संगीत दिले असून गीतरचना स्वानंद किरकिरे यांनी केली आहे. तर शामक दावर यांनी नृत्यदिग्दर्शन केले आहे.
  • शंकर महादेवन, सोनू निगम, अरमान मलिक, सुनिधी चौहान, आयुषमान खुराणा, कनिका कपूर, नीती मोहन, शेखर रावजियानी आदी मान्यवर गायकांनी या गाण्यामध्ये प्रत्यक्ष सहभाग घेतला होता.
  • या सांगितिक मोहिमेला याआधी राष्ट्रीय पुरस्कारानेही (नॅशनल ग्रीन अवॉर्ड) सन्मानित करण्यात आले होते.
  • तसेच भारताच्या पर्यावरण खात्यानेही याच गाण्याला आपल्या पर्यावरणविषयक जनजागृती मोहिमेत सामील करून घेतले आहे. विविध राज्यांमध्ये आणि शाळांमध्ये ही सांगितिक मोहिम यशस्वी झाली आहे.
  • भामला फाऊंडेशनचे अध्यक्ष: आसिफ भामला

आशियाई क्रीडा स्पर्धा: पाचवा दिवस

  • नेमबाजी: १५ वर्षीय शार्दुल विहानला रौप्यपदक
  • भारताचा १५ वर्षीय युवा नेमबाज शार्दुल विहानला पुरुषांच्या डबल ट्रॅप प्रकारात सुवर्णपदकाने हुलकावणी दिली.
  • दक्षिण कोरियाच्या शिन ह्यूनहू याने विहानला पिछाडीवर टाकत सुवर्णपदक पटकावले. त्यामुळे विहानला रौप्यपदकावर समाधान मानावे लागले.
  • यासह शार्दुल विहान आशियाई स्पर्धांमध्ये पदक जिंकणारा तो भारताचा सर्वांत युवा नेमबाज ठरला आहे.
  • ११ जानेवारी २००३ रोजी जन्मलेला शार्दूल मूळ मेरठचा (उत्तर प्रदेश) आहे. सध्या तो नववी इयत्तेत शिकत आहे. आशियाई स्पर्धेत २ सुवर्णपदके जिंकलेल्या अन्वर सुलतान यांचा तो शिष्य आहे.
  • गेल्यावर्षी राष्ट्रीय शॉटगन नेमबाजी स्पर्धेच्यावेळी शार्दूल अवघा १४ वर्षांचा होता. त्या स्पर्धेत त्याने चार सुवर्णपदके पटकावली होती.
  • २०१७मध्ये पार पडलेल्या आयएसएसएफ वर्ल्ड शॉटगन चॅम्पियनशिपमध्ये सुवर्णपदक पटकावणाऱ्या ज्युनियर संघाचा तो सदस्य होता.
  • त्याने जर्मनी येथे पार पडलेल्या आंतरराष्ट्रीय ज्युनियर ग्रांप्रीमध्ये सुवर्णपदकाची कमाई केली आहे.
  • टेनिस: अंकिता रैनाला कांस्यपदक
  • भारताची टेनिसपटू अंकिता रैनाने महिलांच्या एकेरी स्पर्धेत कांस्यपदकाची कमाई केली. यासह ती टेनिसमध्ये पदक मिळवणारी दुसरी भारतीय महिला खेळाडू ठरली आहे.
  • यापूर्वी २००६साली सानिया मिर्झाने दोहा आशियाई स्पर्धेत रौप्य तर २०१०गोंझाऊ आशियाई स्पर्धेत कांस्यपदकाची कमाई केली होती.
  • अंकिता रैनाला उपांत्य फेरीच्या सामन्यात चीनच्या झ्यँग शुईकडून ४-६, ७-६ अशा पराभवाचा सामना करावा लागला.
  • कबड्डी: भारताचा धक्कादायक पराभव
  • सातवेळा आशियाई स्पर्धेचे विजेतेपद मिळवणाऱ्या भारताला इराणने उपांत्य फेरीच्या सामन्यात पराभवाचा धक्का दिला.
  • भक्कम बचावाच्या आधारावर इराणने भारतावर २७-१८ अशी ९ गुणांच्या फरकाने मात करत अंतिम फेरीत प्रवेश केला.
  • आशियाई स्पर्धेतील भारताचा हा ऐतिहासिक पराभव ठरला. कारण यापूर्वी भारताने सर्व आशियाई स्पर्धांमध्ये सुवर्णपदक पटकावले होते.
  • आशियाई क्रीडा स्पर्धेत कबड्डीला १९९०साली सुरुवात करण्यात आली, तेव्हापासून आतापर्यंत भारताने ७ सुवर्णपदके पटकावली होती.

झुलन गोस्वामीची टी-२० क्रिकेटमधून निवृत्ती

  • भारतीय महिला संघाची अनुभवी क्रिकेटपटू झुलन गोस्वामीने आंतरराष्ट्रीय टी-२० क्रिकेटमधून निवृत्ती स्विकारली आहे.
  • झुलनने आतापर्यंत ६८ टी-२०, १६८ वन-डे आणि १० कसोटी सामन्यांमध्ये भारताचे प्रतिनिधीत्व केले आहे.
  • झुलनने ६८ आंतरराष्ट्रीय टी-२० सामनन्यांमध्ये ५६ विकेट घेतल्या आहेत. वन-डे क्रिकेटमध्ये झुलनच्या नावावर १६९ सामन्यांत २०० विकेट जमा आहेत.
  • महिला वन-डे क्रिकेटच्या इतिहासात झुलनच्या नावावर सर्वाधिक बळींची नोंद आहे. २०१७साली इंग्लंडमध्ये झालेल्या महिला विश्वचषकातही झुलनने महत्वाची कामगिरी बजावली होती.
  • २००७साली झुलनने आयसीसीचा सर्वोत्कृष्ट महिला क्रिकेटपटूचा पुरस्कार पटकावला होता.
  • याव्यतिरीक्त अर्जुन पुरस्कार, पद्मश्री यासारखे मानाचे पुरस्कार झुलन गोस्वामीच्या खात्यात आहेत.

रिलायन्सचे बाजार भांडवल सुमारे ८ लाख कोटी

  • मुकेश अंबानी यांच्या रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडचे बाजार भांडवल सुमारे ८ लाख कोटींवर पोहोचले.
  • हा टप्पा ओलांडणारी रिलायन्स ही पहिली कंपनी बनली असून टीसीएस अद्याप २१ हजार कोटींनी मागे आहे.
  • रिलायन्सच्या जवळ असलेली कंपनी आयटी क्षेत्रातील टीसीएस ही एकमेव आहे. मात्र, रिलायन्स वेगाने पुढे सरकत आहे. टीसीएसचे बाजार मुल्य ७.७९ लाख कोटी रुपये आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा